शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना वर्ग एकचा सातबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:09 IST

निम्न वर्धा प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाबाबत जिल्हा पुनर्वसन समितीचे अशासकीय सदस्य माणिक मलिये यांच्या पोर्टलवरील तक्रारीची नोंद घेत त्यावर चर्चा झाली. या चर्चेअंती आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे), अल्लीपूर व सालोड तसेच अन्य पुनर्वसित गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना वर्ग दोनचा सातबारा रद्द करून वर्ग एकचा सातबारा वाटप करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सोमवारी लोकशाही दिनी मुख्यमंत्री सचिवालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी दिल्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कआर्र्वी : निम्न वर्धा प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाबाबत जिल्हा पुनर्वसन समितीचे अशासकीय सदस्य माणिक मलिये यांच्या पोर्टलवरील तक्रारीची नोंद घेत त्यावर चर्चा झाली. या चर्चेअंती आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे), अल्लीपूर व सालोड तसेच अन्य पुनर्वसित गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना वर्ग दोनचा सातबारा रद्द करून वर्ग एकचा सातबारा वाटप करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सोमवारी लोकशाही दिनी मुख्यमंत्री सचिवालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिले.निम्न वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या या निर्णयाने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. या गावातील नागरिकांना वर्ग एकचा सातबारा मिळण्यासाठी माजी आमदार दादाराव केचे यांनी प्रकल्पग्रस्तांची बाजू शासनाकडे मांडली होती. प्रकल्प ग्रस्तांच्या या मागणीला प्रशासकीय स्तरावर तर्कवितर्क लढवून फेटाळून लावले होते.प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी व घरे राष्ट्रहिताकरिता दिल्यामुळे त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता त्यांचे फायदे त्यांना मिळू द्या, असेही मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना बजावले. मुख्यमंत्र्यांच्या यांच्या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला असून भूखंडाची मालकी मिळाली आहे. या निर्णयामुळे जमिनीच्या व्यवहारांना दिलासा मिळाला आहे.कायद्यानेच दिला अधिकारजिल्हा पुनर्वसन समितीचे अशासकीय सदस्य माणिक मलिये यांनी महाराष्ट्र प्रकल्पबाधीत व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९ मधील कलम १६ उपकलम १ खंड ब मधील तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्तांची जुन्या गावठाणात जी भोगवट स्थिती होती त्याच स्थितीत पुनर्वसित गावठाणात भूखंड देण्यात यावे, तथापी जिल्हा प्रशासन ही बाब दुर्लक्षित करून भूखंड वाटप केल्यापासून दहा वर्षांचा काळ लोटल्या शिवाय वर्ग एकचे सातबारा देता येत नाही, असे सांगून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर मुख्यमंत्रयांनी जिल्हाधिकारी यांचे म्हणणे फेटाळून लावत प्रकल्पातील सर्व गावठाणांना दहा वर्ष पूर्ण होण्याची वाट न पाहता लगेचच वर्ग एकचा सातबारा देण्यात यावे, असे आदेशीत केले.