शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सात दशकांपासून शहर उपेक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:22 IST

जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण व कामगार शहर म्हणून ओळख असलेले पुलगाव शहर विकासापासून वंचित राहिले. सात दशकांपासून परिसराच्या दृष्टीने येथील विकास झालेला नाही. यात भर म्हणून येथील वस्त्रोद्योग बंद पडला असून शकुंतला रेल्वे सद्यस्थितीत बंदिस्त आहे.

ठळक मुद्देविकास होण्याऐवजी मोठ्या उद्योगांसह शकुंतलाही बंदिस्त

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण व कामगार शहर म्हणून ओळख असलेले पुलगाव शहर विकासापासून वंचित राहिले. सात दशकांपासून परिसराच्या दृष्टीने येथील विकास झालेला नाही. यात भर म्हणून येथील वस्त्रोद्योग बंद पडला असून शकुंतला रेल्वे सद्यस्थितीत बंदिस्त आहे.येथे सर्व भौगोलिक सुविधा उपलब्ध असतानाही मागील सात दशकांत हा परिसर विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिला आहे. कधी ताई तर कधी भाऊ यांच्या प्रतिष्ठेत विकास होणे तर दुरच वादामुळे शहराचे नुकसानच झाले. इंग्रजांच्या कार्यकाळात सुरू झालेला पुलगाव कॉटन मिल हा वस्त्रोद्योग बंद झाला. पुलगाव-आर्वी शकुंतला रेल्वेगाडी बंद झाली आहे. सत्ता परिवर्तनानंतरही एकमात्र असलेला बीईसी खत कारखानाही दोन वर्षापासून बंद पडलेला आहे. त्यामुळे येथे बेरोजगारीची समस्या आहे.राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकारणात महत्वाचे स्थान मिळविणारे सक्षम नेतृत्व या शहराने दिले. मंत्रीपदही शहराला मिळाले. परंतु राजकीय क्षेत्रातील वर्चस्वाच्या कुरघोडीत सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली. कॉँग्रेसचे खासदार वसंत साठे यांनी अनेक वर्षे प्रतिनिधीत्व केले. लोहपुरुष म्हणून त्यांची ख्याती होती. मात्र त्यावेळी शहरात येणारा रेल्वे कोच कारखाना हरियाणा राज्यात गेला अशी खंत पुलगावकर व्यक्त करतात.शहराला तालुक्याचा दर्जा व औद्योगीक वसाहतीचा प्रश्न आजही खितपत आहे. तालुक्याचा दर्जा व औद्योगिक वसाहत मात्र देवळी शहराला देण्यात आला. या शहराच्या सिमेवरून वर्धा नदी वाहते. शहरातून मुंबई-हावडा रेल्वे मार्ग नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग हैद्राबाद-भोपाल महामार्ग अशी दळणवळणाची सुविधा आहे. कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात होते म्हणून इंग्रज शासनाने नागपूरचे उद्योगपती बुटी यांच्या माध्यमातून १८८९ मध्ये मोठा वस्त्रोद्योग सुरू केला. आष्टी, वरूड, आर्वी भागातील कापूस व संत्र्याची बाजारपेठ पाहून पुलगाव, आर्वी ही मीटर गेज रेल्वेगाडी सुरू केली. सर्व भौगोलिक सुविधांचा विचार करून इंग्रज शासनाने १९४२ साली पुलगाव येथे दारूगोळा भांडाराची स्थापना केली. इतकेच नव्हे तर इंग्रज शासनाला या ब्रीज टाऊनचे भौगोलीक व औद्योगिक महत्व वाटले म्हणून त्यांनी परिसरातील कवठा (रेल्वे) येथे जिल्ह्याचे मुख्य प्रशासन आणून कवठा (रे.) जिल्ह्याचा दर्जा दिला. त्यांना या परिसराचे महत्व कळले परंतु देशाच्या सत्तेत असणाऱ्या लोक प्रतिनिधींना या शहराचे महत्व कळू नये ही शोकांतिकाच आहे.इंग्रजाच्या कार्यकाळात सुरू झालेला ३५०० कामगारांना रोजगार देणारा वस्त्रोद्योग मार्च २००३ मध्ये तर पुलगाव, आर्वी शकुतंला आॅगस्ट २००८ मध्ये बंद झाली. त्यामुळे शहराच्या विकासाच्या वाटा बंद झाल्या. २०० कामगारांना रोजगार देणारा विदर्भ सुपर फॉस्फेट कारखाना बंद झाला. त्यानंतर बीईसी फर्टिलाइझर हा खत कारखानाही दोन वर्षापासून बंद आहे. पुलगाव-आर्वी मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रुपांतर व्हावे व हा मार्ग आमलापर्यंत वाढविण्याच्यादृष्टीने मागणी आहे.पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा देण्याचा प्रश्न खितपत आहे. येथील औद्योगिक वसाहतीचा प्रश्नही शासन दरबारी रेटला व अनेक कार्यक्रमातून पुलगाव शहराला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याची घोषणाही लोकप्रतिनिधींनी केली. यामुळे शहरवासियाच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला खरा पण, याची अंमलबजावणी करण्याची गरज शहरवासी व्यक्त करतात.तालुक्याची प्रतीक्षा२०१४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपा राज्य व केंद्रात सत्तेवर आली. येथे भाजपाचे खासदार आहे. त्यांनी चार वर्षाच्या कार्यशाळात काही रेल्वे गाड्यांच्या येथे थांबा मिळवून दिला. सदर प्रलंबित प्रश्न सोडवून मतदारांच्या मनात विकासाची आशा निर्माण केली आहे.