शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

सात दशकांपासून शहर उपेक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:22 IST

जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण व कामगार शहर म्हणून ओळख असलेले पुलगाव शहर विकासापासून वंचित राहिले. सात दशकांपासून परिसराच्या दृष्टीने येथील विकास झालेला नाही. यात भर म्हणून येथील वस्त्रोद्योग बंद पडला असून शकुंतला रेल्वे सद्यस्थितीत बंदिस्त आहे.

ठळक मुद्देविकास होण्याऐवजी मोठ्या उद्योगांसह शकुंतलाही बंदिस्त

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण व कामगार शहर म्हणून ओळख असलेले पुलगाव शहर विकासापासून वंचित राहिले. सात दशकांपासून परिसराच्या दृष्टीने येथील विकास झालेला नाही. यात भर म्हणून येथील वस्त्रोद्योग बंद पडला असून शकुंतला रेल्वे सद्यस्थितीत बंदिस्त आहे.येथे सर्व भौगोलिक सुविधा उपलब्ध असतानाही मागील सात दशकांत हा परिसर विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिला आहे. कधी ताई तर कधी भाऊ यांच्या प्रतिष्ठेत विकास होणे तर दुरच वादामुळे शहराचे नुकसानच झाले. इंग्रजांच्या कार्यकाळात सुरू झालेला पुलगाव कॉटन मिल हा वस्त्रोद्योग बंद झाला. पुलगाव-आर्वी शकुंतला रेल्वेगाडी बंद झाली आहे. सत्ता परिवर्तनानंतरही एकमात्र असलेला बीईसी खत कारखानाही दोन वर्षापासून बंद पडलेला आहे. त्यामुळे येथे बेरोजगारीची समस्या आहे.राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकारणात महत्वाचे स्थान मिळविणारे सक्षम नेतृत्व या शहराने दिले. मंत्रीपदही शहराला मिळाले. परंतु राजकीय क्षेत्रातील वर्चस्वाच्या कुरघोडीत सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली. कॉँग्रेसचे खासदार वसंत साठे यांनी अनेक वर्षे प्रतिनिधीत्व केले. लोहपुरुष म्हणून त्यांची ख्याती होती. मात्र त्यावेळी शहरात येणारा रेल्वे कोच कारखाना हरियाणा राज्यात गेला अशी खंत पुलगावकर व्यक्त करतात.शहराला तालुक्याचा दर्जा व औद्योगीक वसाहतीचा प्रश्न आजही खितपत आहे. तालुक्याचा दर्जा व औद्योगिक वसाहत मात्र देवळी शहराला देण्यात आला. या शहराच्या सिमेवरून वर्धा नदी वाहते. शहरातून मुंबई-हावडा रेल्वे मार्ग नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग हैद्राबाद-भोपाल महामार्ग अशी दळणवळणाची सुविधा आहे. कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात होते म्हणून इंग्रज शासनाने नागपूरचे उद्योगपती बुटी यांच्या माध्यमातून १८८९ मध्ये मोठा वस्त्रोद्योग सुरू केला. आष्टी, वरूड, आर्वी भागातील कापूस व संत्र्याची बाजारपेठ पाहून पुलगाव, आर्वी ही मीटर गेज रेल्वेगाडी सुरू केली. सर्व भौगोलिक सुविधांचा विचार करून इंग्रज शासनाने १९४२ साली पुलगाव येथे दारूगोळा भांडाराची स्थापना केली. इतकेच नव्हे तर इंग्रज शासनाला या ब्रीज टाऊनचे भौगोलीक व औद्योगिक महत्व वाटले म्हणून त्यांनी परिसरातील कवठा (रेल्वे) येथे जिल्ह्याचे मुख्य प्रशासन आणून कवठा (रे.) जिल्ह्याचा दर्जा दिला. त्यांना या परिसराचे महत्व कळले परंतु देशाच्या सत्तेत असणाऱ्या लोक प्रतिनिधींना या शहराचे महत्व कळू नये ही शोकांतिकाच आहे.इंग्रजाच्या कार्यकाळात सुरू झालेला ३५०० कामगारांना रोजगार देणारा वस्त्रोद्योग मार्च २००३ मध्ये तर पुलगाव, आर्वी शकुतंला आॅगस्ट २००८ मध्ये बंद झाली. त्यामुळे शहराच्या विकासाच्या वाटा बंद झाल्या. २०० कामगारांना रोजगार देणारा विदर्भ सुपर फॉस्फेट कारखाना बंद झाला. त्यानंतर बीईसी फर्टिलाइझर हा खत कारखानाही दोन वर्षापासून बंद आहे. पुलगाव-आर्वी मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रुपांतर व्हावे व हा मार्ग आमलापर्यंत वाढविण्याच्यादृष्टीने मागणी आहे.पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा देण्याचा प्रश्न खितपत आहे. येथील औद्योगिक वसाहतीचा प्रश्नही शासन दरबारी रेटला व अनेक कार्यक्रमातून पुलगाव शहराला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याची घोषणाही लोकप्रतिनिधींनी केली. यामुळे शहरवासियाच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला खरा पण, याची अंमलबजावणी करण्याची गरज शहरवासी व्यक्त करतात.तालुक्याची प्रतीक्षा२०१४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपा राज्य व केंद्रात सत्तेवर आली. येथे भाजपाचे खासदार आहे. त्यांनी चार वर्षाच्या कार्यशाळात काही रेल्वे गाड्यांच्या येथे थांबा मिळवून दिला. सदर प्रलंबित प्रश्न सोडवून मतदारांच्या मनात विकासाची आशा निर्माण केली आहे.