शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून ५० वर तक्रारींचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:30 IST

देशातील शहरांसह प्रत्येक गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. सदर मिशन तथा स्वच्छ व सुंदर वर्धा हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन शहरातील अस्वच्छतेबाबत प्राप्त तक्रारींचा निपटारा वर्धा न.प.द्वारे ‘स्वच्छता एमओएचयूए’ या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून केला जात आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांतील कामगिरी : वर्धा न.प.चे स्वच्छतेच्या दिशेने पडतेय पाऊल

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील शहरांसह प्रत्येक गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. सदर मिशन तथा स्वच्छ व सुंदर वर्धा हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन शहरातील अस्वच्छतेबाबत प्राप्त तक्रारींचा निपटारा वर्धा न.प.द्वारे ‘स्वच्छता एमओएचयूए’ या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून केला जात आहे. अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत या अ‍ॅपच्या माध्यमातून ५० पेक्षा अधिक तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.‘स्वच्छता एमओएचयूए’ हे मोबाईल अ‍ॅप प्रत्येक स्मार्ट फोनच्या प्ले-स्टोअरमधून नागरिकांना ‘इन्स्टॉल’ करता येते. अ‍ॅपचे इंस्टॉलेशन होताना पडताळणीसाठी मोबाईल क्रमांकाची विचारणा केली जाते. भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविताच चार अंकी ओटीपी क्रमांक प्राप्त होतो. तो आवश्यक त्या ठिकाणी नोंदविताच मोबाईल सिस्टीमशी जुळत सदर मोबाईल धारकाचे लोकेशन ट्रेस होते. त्यानंतर इंस्टॉल झालेल्या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या नागरिकांना छायाचित्रासह अस्वच्छतेबाबत तक्रार नोंदविता येते. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर काही सेकंदात त्याची माहिती आॅनलाईन पद्धतीने वर्धा नगर पालिकेतील कर्मचाºयांपर्यंत पोहोचते. त्या तक्रारींचा निपटारा दोन दिवसांत करणे क्रमप्राप्त असून सध्या वर्धा न.प. प्रशासन प्रत्येक तक्रार आठ तासांतच निकाली काढत आहे. परिणामी, वर्धा न.प. ची ही कामगिरी स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल ठरत आहे. ‘स्वच्छता एमओएचयूए’ या अ‍ॅपच्या माध्यमातून वर्धा न.प.ला दोन महिन्यांत एकूण ५८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पैकी ५१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून उर्वरित सात तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी प्रक्रियेत असल्याचे सांगण्यात आले.अवघ्या आठ तासांत तक्रारींचा निपटारामोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून प्राप्त तक्रारींचा निपटारा ४८ तासांत करणे क्रमप्राप्त आहे, अशा वरिष्ठांच्या सूचना आहेत; पण स्वच्छ, सुंदर व हरित वर्धा शहराचे उद्दिष्ट उराशी बाळगणाऱ्या वर्धा नगर पालिकेच्यावतीने प्राप्त तक्रारी अवघ्या आठ तासांतच निकाली काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.अभिप्राय नोंदविण्याची सुविधाशहरातील प्रत्येक प्रभागासाठी स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक पालिकेद्वारे करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त होताच न.प.तील संगणक अभियंता अनूप अग्रवाल ती त्या प्रभागातील स्वच्छता निरीक्षकाला वळती करतात. अवघ्या आठ तासांत त्यावर कार्यवाही करीत स्वच्छता निरीक्षक झालेल्या कार्यवाहीची माहिती छायाचित्रासह अपलोड करतात. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारकर्त्याला आपला अभिप्राय देता येत असल्याचे सांगण्यात आले.केंद्र सरकारचा हा उपक्रम आहे. अस्वच्छतेबाबतची तक्रार या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या करता येते. शिवाय तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीबाबतही अभिप्राय नोंदविता येतो. अधिकाधिक नागरिकांनी स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी होण्यासाठी तथा न.प.च्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोबाईल अ‍ॅप आपल्या स्मार्ट फोनमध्ये इन्स्टॉल करावा.- अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी, न.प. वर्धा.