शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
2
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
3
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
4
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
5
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
6
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
7
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
8
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
9
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
10
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
11
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
12
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
14
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
15
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
16
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
17
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
18
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
19
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
20
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”

मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून ५० वर तक्रारींचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:30 IST

देशातील शहरांसह प्रत्येक गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. सदर मिशन तथा स्वच्छ व सुंदर वर्धा हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन शहरातील अस्वच्छतेबाबत प्राप्त तक्रारींचा निपटारा वर्धा न.प.द्वारे ‘स्वच्छता एमओएचयूए’ या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून केला जात आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांतील कामगिरी : वर्धा न.प.चे स्वच्छतेच्या दिशेने पडतेय पाऊल

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील शहरांसह प्रत्येक गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. सदर मिशन तथा स्वच्छ व सुंदर वर्धा हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन शहरातील अस्वच्छतेबाबत प्राप्त तक्रारींचा निपटारा वर्धा न.प.द्वारे ‘स्वच्छता एमओएचयूए’ या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून केला जात आहे. अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत या अ‍ॅपच्या माध्यमातून ५० पेक्षा अधिक तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.‘स्वच्छता एमओएचयूए’ हे मोबाईल अ‍ॅप प्रत्येक स्मार्ट फोनच्या प्ले-स्टोअरमधून नागरिकांना ‘इन्स्टॉल’ करता येते. अ‍ॅपचे इंस्टॉलेशन होताना पडताळणीसाठी मोबाईल क्रमांकाची विचारणा केली जाते. भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविताच चार अंकी ओटीपी क्रमांक प्राप्त होतो. तो आवश्यक त्या ठिकाणी नोंदविताच मोबाईल सिस्टीमशी जुळत सदर मोबाईल धारकाचे लोकेशन ट्रेस होते. त्यानंतर इंस्टॉल झालेल्या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या नागरिकांना छायाचित्रासह अस्वच्छतेबाबत तक्रार नोंदविता येते. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर काही सेकंदात त्याची माहिती आॅनलाईन पद्धतीने वर्धा नगर पालिकेतील कर्मचाºयांपर्यंत पोहोचते. त्या तक्रारींचा निपटारा दोन दिवसांत करणे क्रमप्राप्त असून सध्या वर्धा न.प. प्रशासन प्रत्येक तक्रार आठ तासांतच निकाली काढत आहे. परिणामी, वर्धा न.प. ची ही कामगिरी स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल ठरत आहे. ‘स्वच्छता एमओएचयूए’ या अ‍ॅपच्या माध्यमातून वर्धा न.प.ला दोन महिन्यांत एकूण ५८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पैकी ५१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून उर्वरित सात तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी प्रक्रियेत असल्याचे सांगण्यात आले.अवघ्या आठ तासांत तक्रारींचा निपटारामोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून प्राप्त तक्रारींचा निपटारा ४८ तासांत करणे क्रमप्राप्त आहे, अशा वरिष्ठांच्या सूचना आहेत; पण स्वच्छ, सुंदर व हरित वर्धा शहराचे उद्दिष्ट उराशी बाळगणाऱ्या वर्धा नगर पालिकेच्यावतीने प्राप्त तक्रारी अवघ्या आठ तासांतच निकाली काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.अभिप्राय नोंदविण्याची सुविधाशहरातील प्रत्येक प्रभागासाठी स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक पालिकेद्वारे करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त होताच न.प.तील संगणक अभियंता अनूप अग्रवाल ती त्या प्रभागातील स्वच्छता निरीक्षकाला वळती करतात. अवघ्या आठ तासांत त्यावर कार्यवाही करीत स्वच्छता निरीक्षक झालेल्या कार्यवाहीची माहिती छायाचित्रासह अपलोड करतात. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारकर्त्याला आपला अभिप्राय देता येत असल्याचे सांगण्यात आले.केंद्र सरकारचा हा उपक्रम आहे. अस्वच्छतेबाबतची तक्रार या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या करता येते. शिवाय तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीबाबतही अभिप्राय नोंदविता येतो. अधिकाधिक नागरिकांनी स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी होण्यासाठी तथा न.प.च्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोबाईल अ‍ॅप आपल्या स्मार्ट फोनमध्ये इन्स्टॉल करावा.- अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी, न.प. वर्धा.