शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून ५० वर तक्रारींचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:30 IST

देशातील शहरांसह प्रत्येक गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. सदर मिशन तथा स्वच्छ व सुंदर वर्धा हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन शहरातील अस्वच्छतेबाबत प्राप्त तक्रारींचा निपटारा वर्धा न.प.द्वारे ‘स्वच्छता एमओएचयूए’ या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून केला जात आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांतील कामगिरी : वर्धा न.प.चे स्वच्छतेच्या दिशेने पडतेय पाऊल

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील शहरांसह प्रत्येक गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. सदर मिशन तथा स्वच्छ व सुंदर वर्धा हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन शहरातील अस्वच्छतेबाबत प्राप्त तक्रारींचा निपटारा वर्धा न.प.द्वारे ‘स्वच्छता एमओएचयूए’ या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून केला जात आहे. अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत या अ‍ॅपच्या माध्यमातून ५० पेक्षा अधिक तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.‘स्वच्छता एमओएचयूए’ हे मोबाईल अ‍ॅप प्रत्येक स्मार्ट फोनच्या प्ले-स्टोअरमधून नागरिकांना ‘इन्स्टॉल’ करता येते. अ‍ॅपचे इंस्टॉलेशन होताना पडताळणीसाठी मोबाईल क्रमांकाची विचारणा केली जाते. भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविताच चार अंकी ओटीपी क्रमांक प्राप्त होतो. तो आवश्यक त्या ठिकाणी नोंदविताच मोबाईल सिस्टीमशी जुळत सदर मोबाईल धारकाचे लोकेशन ट्रेस होते. त्यानंतर इंस्टॉल झालेल्या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या नागरिकांना छायाचित्रासह अस्वच्छतेबाबत तक्रार नोंदविता येते. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर काही सेकंदात त्याची माहिती आॅनलाईन पद्धतीने वर्धा नगर पालिकेतील कर्मचाºयांपर्यंत पोहोचते. त्या तक्रारींचा निपटारा दोन दिवसांत करणे क्रमप्राप्त असून सध्या वर्धा न.प. प्रशासन प्रत्येक तक्रार आठ तासांतच निकाली काढत आहे. परिणामी, वर्धा न.प. ची ही कामगिरी स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल ठरत आहे. ‘स्वच्छता एमओएचयूए’ या अ‍ॅपच्या माध्यमातून वर्धा न.प.ला दोन महिन्यांत एकूण ५८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पैकी ५१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून उर्वरित सात तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी प्रक्रियेत असल्याचे सांगण्यात आले.अवघ्या आठ तासांत तक्रारींचा निपटारामोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून प्राप्त तक्रारींचा निपटारा ४८ तासांत करणे क्रमप्राप्त आहे, अशा वरिष्ठांच्या सूचना आहेत; पण स्वच्छ, सुंदर व हरित वर्धा शहराचे उद्दिष्ट उराशी बाळगणाऱ्या वर्धा नगर पालिकेच्यावतीने प्राप्त तक्रारी अवघ्या आठ तासांतच निकाली काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.अभिप्राय नोंदविण्याची सुविधाशहरातील प्रत्येक प्रभागासाठी स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक पालिकेद्वारे करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त होताच न.प.तील संगणक अभियंता अनूप अग्रवाल ती त्या प्रभागातील स्वच्छता निरीक्षकाला वळती करतात. अवघ्या आठ तासांत त्यावर कार्यवाही करीत स्वच्छता निरीक्षक झालेल्या कार्यवाहीची माहिती छायाचित्रासह अपलोड करतात. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारकर्त्याला आपला अभिप्राय देता येत असल्याचे सांगण्यात आले.केंद्र सरकारचा हा उपक्रम आहे. अस्वच्छतेबाबतची तक्रार या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या करता येते. शिवाय तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीबाबतही अभिप्राय नोंदविता येतो. अधिकाधिक नागरिकांनी स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी होण्यासाठी तथा न.प.च्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोबाईल अ‍ॅप आपल्या स्मार्ट फोनमध्ये इन्स्टॉल करावा.- अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी, न.प. वर्धा.