शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

आठवडाभरात ४० तासांच्या वर सेवा

By admin | Updated: May 12, 2016 02:25 IST

यातील १४६ परिचारिका कार्यरत असून ३५ पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली ही पदे सात-आठ वर्षांपासून भरण्यात आली नाहीत.

वर्धा : यातील १४६ परिचारिका कार्यरत असून ३५ पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली ही पदे सात-आठ वर्षांपासून भरण्यात आली नाहीत. जानेवारी २०१३ मध्ये शासनाने पुन्हा ५४ पदांना मंजुरी प्रदान केली आहे; पण ही पदेही अद्याप भरली गेली नाहीत. यामुळे कार्यरत परिचारिकांवर कामाचा ताण वाढत आहे. एका परिचारिकेला आठवडाभरात ४० तास सेवा द्यावी लागते; पण रिक्त पदांमुळे अधिक वेळ सेवा द्यावी लागते. शिवाय आकस्मिक काळात परिचारिकांना सेवेकरिता तत्पर राहावे लागते. परिचारिकेला आरोग्य सेविका पदावर पदोन्नती दिली जाते; पण ही प्रक्रियाही थांबल्याचा आरोप संघटनांकडून केला जातो. रात्रपाळीतही सेवा द्यावी लागत असल्याने परिचारिका त्रस्त झाल्या आहेत. लसीकरण, साथरोग नियंत्रण यासह अन्य उपक्रमही परिचारिकांना राबवावे लागतात. या परिचारिकांच्या मदतीकरिता उर्वरित राज्यात अर्धवेळ परिचारिका तर वर्धा जिल्ह्यात ‘पार्टटाईम लेडी अटेंडन्ट’ असे पद मंजूर आहे; पण ती पदेही भरण्यात आलेली नाहीत. कंत्राटी पदे रिक्त असल्याने परिचारिकांना मदतीकरिता कुणीही राहत नसल्याचे चित्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये प्रसूतिच्या वेळी डॉक्टर नसतात. प्रसंगी परिचारिकांना ती कामेही करावी लागतात. १२ वर्षांची कालबद्ध पदोन्नती मिळत नसल्याने परिचारिकांना खितपत राहावे लागत असल्याचा आरोपही संघटनांकडून केला जात आहे. रिक्त असलेली पदे आणि पद भरतीवर असलेला थांबा यामुळे कार्यरत परिचारिकांना सातही दिवस २४ तास सेवा देण्याकरिता तत्पर राहावे लागत असल्याचे दिसून येत आहे. या परिचारिकांना दिलासा देण्याकरिता पदभरती करणे अगत्याचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)