शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

चुरीमुळे अपघाताची मालिका

By admin | Updated: January 21, 2016 02:06 IST

वर्धा - कानगाव, हिंगणघाट मार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या कामात मोठ्या प्रमाणात चुरीचा वापर होत आहे.

रस्त्याच्या कडेला चुरीचे ढीग : किरकोळ अपघात झाले नित्याचेवर्धा : वर्धा - कानगाव, हिंगणघाट मार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या कामात मोठ्या प्रमाणात चुरीचा वापर होत आहे. पण याच चुरीमुळे मार्गावर अपघाताची मालिका सुरू झाली आहे. यात आतापर्यंत एकास जीवही गमवावा लागला आहे. वर्धा- वायगाव तसेच कानगाव व हिंगणघाट हा मार्ग नेहमी वर्दळीचा आहे. या मार्गावर जिल्ह्यातील दोन मोठ्या कंपन्या, नवोदय विद्यालयासह अनेक शाळा महाविद्यालये आहेत. परिणामी हा मार्ग दिवसरात्र वर्दळीचा आहे. कंपन्यांमुळे अवजड वाहनेही येथे मोठ्या संख्येने धावतात. यामुळे गत काही वर्षांपासून वर्धा वायगाव वा पुढे हिंगणघाटपर्यंत जात असलेल्या मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली होती. परिणामी अपघाताची मालिका सुरू झाली होती. या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करावे यासाठी अनेक संघटनांद्वारे प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली. निवेदनांची व प्रवाश्यांना होत असलेली गैरसोय लक्षात घेत या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली. डाबरीकरणाचे काम अद्यापही सुरू आहे. पण सदर डांबरीकरण करताना खड्डे बुजविण्यासाठी बारीच चुरीचा वापर केला जात आहे. वाहनांमुळे सदर चुरी मार्गावर इतरत्र पसरते. यामुळे वाहने घसरून या मार्गावर नव्याने अपघाताची मालिका बळावली आहे. काहीच दिवसांपूर्वी एकास या मार्गावर जीव गमवावा लागला. त्यामुळे या मार्गावर चुरीचा वापर न करता चांगल्या प्रकारे रस्त्याचे डांबरीकरण करावे तसेच रस्त्याच्या कडेला साचलेल्या चुरीची विल्हेवाट लावण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)