शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

चुरीमुळे अपघाताची मालिका

By admin | Updated: January 21, 2016 02:06 IST

वर्धा - कानगाव, हिंगणघाट मार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या कामात मोठ्या प्रमाणात चुरीचा वापर होत आहे.

रस्त्याच्या कडेला चुरीचे ढीग : किरकोळ अपघात झाले नित्याचेवर्धा : वर्धा - कानगाव, हिंगणघाट मार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या कामात मोठ्या प्रमाणात चुरीचा वापर होत आहे. पण याच चुरीमुळे मार्गावर अपघाताची मालिका सुरू झाली आहे. यात आतापर्यंत एकास जीवही गमवावा लागला आहे. वर्धा- वायगाव तसेच कानगाव व हिंगणघाट हा मार्ग नेहमी वर्दळीचा आहे. या मार्गावर जिल्ह्यातील दोन मोठ्या कंपन्या, नवोदय विद्यालयासह अनेक शाळा महाविद्यालये आहेत. परिणामी हा मार्ग दिवसरात्र वर्दळीचा आहे. कंपन्यांमुळे अवजड वाहनेही येथे मोठ्या संख्येने धावतात. यामुळे गत काही वर्षांपासून वर्धा वायगाव वा पुढे हिंगणघाटपर्यंत जात असलेल्या मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली होती. परिणामी अपघाताची मालिका सुरू झाली होती. या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करावे यासाठी अनेक संघटनांद्वारे प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली. निवेदनांची व प्रवाश्यांना होत असलेली गैरसोय लक्षात घेत या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली. डाबरीकरणाचे काम अद्यापही सुरू आहे. पण सदर डांबरीकरण करताना खड्डे बुजविण्यासाठी बारीच चुरीचा वापर केला जात आहे. वाहनांमुळे सदर चुरी मार्गावर इतरत्र पसरते. यामुळे वाहने घसरून या मार्गावर नव्याने अपघाताची मालिका बळावली आहे. काहीच दिवसांपूर्वी एकास या मार्गावर जीव गमवावा लागला. त्यामुळे या मार्गावर चुरीचा वापर न करता चांगल्या प्रकारे रस्त्याचे डांबरीकरण करावे तसेच रस्त्याच्या कडेला साचलेल्या चुरीची विल्हेवाट लावण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)