शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

साहेबांचा निरोप समारंभ; कर्मचारी काम सोडून हॉटेलात, अभ्यागतांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2022 14:14 IST

आरटीओ कार्यालयातील प्रकार, कर्मचारी म्हणाले आज काम होणार नाही

वर्धा : येथील आरटीओ कार्यालय कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. गुरुवारी दुपारी अडीच वाजता दरम्यान कार्यालयीन वेळेत येथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. एक-दोन कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. त्यांना विचारणा केली असता ‘आज साहेबांचा निरोप समारंभ आहे. त्यामुळे सर्व तिकडे गेले आहे, आज तुमचे काम होणार नाही.’ असे सांगण्यात आले. या कार्यक्रमामुळे कामानिमित्त आलेल्यांना आल्या पावलीच परत जावे लागल्याने रोष व्यक्त करण्यात आला.

येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे या महिन्यात सेवानिवृत्त होणार असल्याने बऱ्याच दिवसानंतर ते वर्ध्यात आले होते. त्यामुळे त्यांच्याकरिता एका हॉटेलमध्ये कार्यालयीन वेळेत निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला अधिकाऱ्यांच्या दालनात सत्कार समारंभ आटोपल्यानंतर सर्वच भोजनाकरिता हॉटेलात गेल्याची माहिती प्रशासकीय भवनातूनच प्राप्त झाली.

दुपारी १ वाजेपासून तर अडीच ते तीन वाजेपर्यंत या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. बोटावर मोजण्याइतकेच काही कर्मचारी होते. तेही आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होते. आलेल्यांना ‘आज साहेबांना निरोप समारंभ आहे, त्यामुळे आज काम होणार नाही.’ असे सांगून परतवून लावत होते. त्यामुळे वाहन परवाना, वाहन नोंदणी यासह इतरही कामानिमित्त आलेल्यांना परत जावे लागले. निरोप समारंभ सुटीच्या दिवशी किंवा कार्यालयीन कामकाज झाल्यानंतर घेणे अपेक्षित असताना ऐन कामकाजाच्या वेळीच कार्यालय रिकामे असल्याने कामानिमित्त आलेल्यांनी रोष व्यक्त केला.

कॅश काऊंटरही होते कुलूपबंद

उपप्रादेशिक परिवहन विभागामध्ये नियमित मोठ्या प्रमाणात महसूल गोळा होत असतो. त्यामुळे कार्यालयीन वेळेत येथील कॅश काऊंटर सुरु असणे बंधनकारक आहे. परंतु या कार्यक्रमानिमित्ताने दुपारी १ वाजतापासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत येथील कॅश काऊंटर बंद ठेवण्यात आल्याचे अभ्यागतांनी सांगितले. त्यामुळे निरोप समारंभाकरिता शासनाच्या महसुलावरही परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

रित्या खुर्च्यांना पंख्याची हवा अन् लाईटचा प्रकाश

अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमाला निघून गेल्यानंतर दालनातील आणि कार्यालयातील पंखे आणि लाईट बंद करणे आवश्यक होते. परंतु उत्साहामध्ये पंखे आणि लाईट खाली खुर्च्यांना हवा, प्रकाश देत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. या कार्यालयात मोठ्या प्रमाणात विजेची उधळपट्टी करण्यात आली.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्याकरिता छोटेखानी कार्यक्रम ठेवला होता. कार्यालयातील कामकाज नियमित सुरु होते. फक्त भोजन अवकाशामध्ये कर्मचारी भोजनाकरिता आले होते. त्यानंतर सर्व काम सुरळीत चाललं. कार्यालयाचे कामकाज कुठेही प्रभावित झाले नाही.

-समीर शेख, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसwardha-acवर्धा