शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

साहेबांचा निरोप समारंभ; कर्मचारी काम सोडून हॉटेलात, अभ्यागतांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2022 14:14 IST

आरटीओ कार्यालयातील प्रकार, कर्मचारी म्हणाले आज काम होणार नाही

वर्धा : येथील आरटीओ कार्यालय कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. गुरुवारी दुपारी अडीच वाजता दरम्यान कार्यालयीन वेळेत येथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. एक-दोन कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. त्यांना विचारणा केली असता ‘आज साहेबांचा निरोप समारंभ आहे. त्यामुळे सर्व तिकडे गेले आहे, आज तुमचे काम होणार नाही.’ असे सांगण्यात आले. या कार्यक्रमामुळे कामानिमित्त आलेल्यांना आल्या पावलीच परत जावे लागल्याने रोष व्यक्त करण्यात आला.

येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे या महिन्यात सेवानिवृत्त होणार असल्याने बऱ्याच दिवसानंतर ते वर्ध्यात आले होते. त्यामुळे त्यांच्याकरिता एका हॉटेलमध्ये कार्यालयीन वेळेत निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला अधिकाऱ्यांच्या दालनात सत्कार समारंभ आटोपल्यानंतर सर्वच भोजनाकरिता हॉटेलात गेल्याची माहिती प्रशासकीय भवनातूनच प्राप्त झाली.

दुपारी १ वाजेपासून तर अडीच ते तीन वाजेपर्यंत या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. बोटावर मोजण्याइतकेच काही कर्मचारी होते. तेही आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होते. आलेल्यांना ‘आज साहेबांना निरोप समारंभ आहे, त्यामुळे आज काम होणार नाही.’ असे सांगून परतवून लावत होते. त्यामुळे वाहन परवाना, वाहन नोंदणी यासह इतरही कामानिमित्त आलेल्यांना परत जावे लागले. निरोप समारंभ सुटीच्या दिवशी किंवा कार्यालयीन कामकाज झाल्यानंतर घेणे अपेक्षित असताना ऐन कामकाजाच्या वेळीच कार्यालय रिकामे असल्याने कामानिमित्त आलेल्यांनी रोष व्यक्त केला.

कॅश काऊंटरही होते कुलूपबंद

उपप्रादेशिक परिवहन विभागामध्ये नियमित मोठ्या प्रमाणात महसूल गोळा होत असतो. त्यामुळे कार्यालयीन वेळेत येथील कॅश काऊंटर सुरु असणे बंधनकारक आहे. परंतु या कार्यक्रमानिमित्ताने दुपारी १ वाजतापासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत येथील कॅश काऊंटर बंद ठेवण्यात आल्याचे अभ्यागतांनी सांगितले. त्यामुळे निरोप समारंभाकरिता शासनाच्या महसुलावरही परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

रित्या खुर्च्यांना पंख्याची हवा अन् लाईटचा प्रकाश

अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमाला निघून गेल्यानंतर दालनातील आणि कार्यालयातील पंखे आणि लाईट बंद करणे आवश्यक होते. परंतु उत्साहामध्ये पंखे आणि लाईट खाली खुर्च्यांना हवा, प्रकाश देत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. या कार्यालयात मोठ्या प्रमाणात विजेची उधळपट्टी करण्यात आली.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्याकरिता छोटेखानी कार्यक्रम ठेवला होता. कार्यालयातील कामकाज नियमित सुरु होते. फक्त भोजन अवकाशामध्ये कर्मचारी भोजनाकरिता आले होते. त्यानंतर सर्व काम सुरळीत चाललं. कार्यालयाचे कामकाज कुठेही प्रभावित झाले नाही.

-समीर शेख, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसwardha-acवर्धा