शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

साहेबांचा निरोप समारंभ; कर्मचारी काम सोडून हॉटेलात, अभ्यागतांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2022 14:14 IST

आरटीओ कार्यालयातील प्रकार, कर्मचारी म्हणाले आज काम होणार नाही

वर्धा : येथील आरटीओ कार्यालय कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. गुरुवारी दुपारी अडीच वाजता दरम्यान कार्यालयीन वेळेत येथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. एक-दोन कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. त्यांना विचारणा केली असता ‘आज साहेबांचा निरोप समारंभ आहे. त्यामुळे सर्व तिकडे गेले आहे, आज तुमचे काम होणार नाही.’ असे सांगण्यात आले. या कार्यक्रमामुळे कामानिमित्त आलेल्यांना आल्या पावलीच परत जावे लागल्याने रोष व्यक्त करण्यात आला.

येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे या महिन्यात सेवानिवृत्त होणार असल्याने बऱ्याच दिवसानंतर ते वर्ध्यात आले होते. त्यामुळे त्यांच्याकरिता एका हॉटेलमध्ये कार्यालयीन वेळेत निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला अधिकाऱ्यांच्या दालनात सत्कार समारंभ आटोपल्यानंतर सर्वच भोजनाकरिता हॉटेलात गेल्याची माहिती प्रशासकीय भवनातूनच प्राप्त झाली.

दुपारी १ वाजेपासून तर अडीच ते तीन वाजेपर्यंत या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. बोटावर मोजण्याइतकेच काही कर्मचारी होते. तेही आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होते. आलेल्यांना ‘आज साहेबांना निरोप समारंभ आहे, त्यामुळे आज काम होणार नाही.’ असे सांगून परतवून लावत होते. त्यामुळे वाहन परवाना, वाहन नोंदणी यासह इतरही कामानिमित्त आलेल्यांना परत जावे लागले. निरोप समारंभ सुटीच्या दिवशी किंवा कार्यालयीन कामकाज झाल्यानंतर घेणे अपेक्षित असताना ऐन कामकाजाच्या वेळीच कार्यालय रिकामे असल्याने कामानिमित्त आलेल्यांनी रोष व्यक्त केला.

कॅश काऊंटरही होते कुलूपबंद

उपप्रादेशिक परिवहन विभागामध्ये नियमित मोठ्या प्रमाणात महसूल गोळा होत असतो. त्यामुळे कार्यालयीन वेळेत येथील कॅश काऊंटर सुरु असणे बंधनकारक आहे. परंतु या कार्यक्रमानिमित्ताने दुपारी १ वाजतापासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत येथील कॅश काऊंटर बंद ठेवण्यात आल्याचे अभ्यागतांनी सांगितले. त्यामुळे निरोप समारंभाकरिता शासनाच्या महसुलावरही परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

रित्या खुर्च्यांना पंख्याची हवा अन् लाईटचा प्रकाश

अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमाला निघून गेल्यानंतर दालनातील आणि कार्यालयातील पंखे आणि लाईट बंद करणे आवश्यक होते. परंतु उत्साहामध्ये पंखे आणि लाईट खाली खुर्च्यांना हवा, प्रकाश देत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. या कार्यालयात मोठ्या प्रमाणात विजेची उधळपट्टी करण्यात आली.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्याकरिता छोटेखानी कार्यक्रम ठेवला होता. कार्यालयातील कामकाज नियमित सुरु होते. फक्त भोजन अवकाशामध्ये कर्मचारी भोजनाकरिता आले होते. त्यानंतर सर्व काम सुरळीत चाललं. कार्यालयाचे कामकाज कुठेही प्रभावित झाले नाही.

-समीर शेख, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसwardha-acवर्धा