शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचारी नियुक्तीसाठी पदनिर्मिती प्रस्ताव पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:32 IST

सफाई कर्मचाºयांची नियुक्ती ही लोकसंख्येच्या आधारावर करण्याचा शासनाचा निर्णय आहे.

ठळक मुद्देरामू पवार यांचे निर्देश : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सफाई कर्मचाºयांची नियुक्ती ही लोकसंख्येच्या आधारावर करण्याचा शासनाचा निर्णय आहे. मात्र अपुºया सफाई कर्मचाºयांमुळे शहराची व्यवस्थित साफसफाई होत नाही. पर्यायाने घाणीचे साम्राज्य वाढून रोगराई पसरते. सफाई कर्मचाºयांची संख्या वाढवण्यासाठी नवीन पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे निर्देश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचाºयांसाठी राबविण्यात येणाºया योजना व इतर प्रश्नांसंदर्भात शुक्रवारी बैठक घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, नगर परिषद मुख्याधिकारी, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी अजय डवले, जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी, सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.सफाई कर्मचारी निवृत्त झाला असेल किंवा मरण पावला असले तर रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या वारसदाराला नियुक्ती देण्याची शिफारस लाड-पागे समितीने केली. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद तसेच अन्य विभागांनी अशी प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावी. हक्कदाराला न्याय द्यावा, असे निर्देश त्यांनी दिलेत. वारसदाराला नोकरी मिळण्यासाठी जागा रिक्त नसेल तर अस्थायी पदावर नियुक्ती करुन नवीन पद निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. कालबद्ध पदोन्नतीसह शैक्षणिक अहर्ताप्रमाणे वर्ग तीन व चार मध्ये पद भरताना त्यांना प्राधान्य द्यावे. महानगरपालिका आणि नगरपालिका कायद्यातच सफाई कर्मचाºयांना घर बांधून देण्याची योजना आहे. मात्र अद्याप कोणत्याच नगरपालिकेने या योजनेची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे येत्या सहा महिन्यात आराखडा तयार करुन या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच श्रमसाफल्य योजनेंतर्गत २५ वर्ष सेवा झालेल्या कर्मचाºयांना घर बांधणी येजना प्राथमिकतेने सुरू करावी. सफाई कर्मचाºयांना सफाई काम करण्यासाठी मूलभूत साधन सामग्री उपलब्ध करुन देण्यासोबतच धुलाई भत्ता व घाण भत्ता देणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.सफाई कर्मचारी राहत असलेल्या वस्त्यांमध्ये विद्युत दिवे, पाणी, समाजमंदिर व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. नगर परिषद व ग्रामीण भागात दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत प्रस्ताव पाठवावेत असेही त्यांनी सुचविले. बैठकीची पूर्व सूचना देऊनही उपस्थित नसणाºया नगर परिषद मुख्याधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिलेत.