शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

पालिकेकडून भाजीविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 22:19 IST

पालिकेच्यावतीने बाजाराचा विकास साधण्यात येत असून यात भाजीविक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याचा आरोप करीत भाजीविक्रेत्यांनी बंद पुकारला. याचा नागरिकांना त्रास होत आहे. तो टाळण्याकरिता गुरुवारपासून पालिकेच्यावतीने जुन्या बसस्थानक परिसरात भाजीची दुकाने लावण्यात आलीत.

ठळक मुद्देभाजीबाजार बंद असल्याने नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : पालिकेच्यावतीने बाजाराचा विकास साधण्यात येत असून यात भाजीविक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याचा आरोप करीत भाजीविक्रेत्यांनी बंद पुकारला. याचा नागरिकांना त्रास होत आहे. तो टाळण्याकरिता गुरुवारपासून पालिकेच्यावतीने जुन्या बसस्थानक परिसरात भाजीची दुकाने लावण्यात आलीत.भाजी विक्रेत्यांचा बंद कायम आहे. आज येथील आठवडी बाजाराचा दिवस असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आठवडी बाजार व बांधकामाच्या मुद्यावर पालिका प्रशासन व भाजीविक्रेते आपापल्या प्रश्नावर ठाम राहिले. मागील चार दिवसांपासून सुरू असलेला भाजीपाला व्यावसायिकांचा संप आर्वीत सध्या चिघळला आहे. यात शहरातील नागरिकांना मात्र आर्वीत चढ्या भावाने व बाहेर गावाहून भाजीपाला आणावा लागत असल्याचे चित्र आहे.आर्वीतील आठवडी बाजारात ३३० भाजीविक्रेते व्यावसायिक आहेत. यात आर्वी पालिकेने आठवडी बाजारातील अर्ध्या जागेवर वाहनतळ व उर्वरित जागेवर ओटे तयार करण्याचे सुरू केले होते. त्यामुळे या जागेवर भाजीविक्री करणाऱ्या या छोट्या व्यावसायिकांनी पालिकेच्या या कामाला विरोध करून बेमुदत संपाची हाक दिली. पाालिकेच्यावतीने करण्यात येणाºया बाजार ओटे बांधकामाला विरोध केला. यासंदर्भात भाजी विक्रेत्यांनी आ. अमर काळे व माजी आमदार दादाराव केचे यांच्या चर्चा करून यावर तोडगा काढण्याची मागणी आहे.आज चौथ्या दिवशीही भाजीविके्रते व पालिका प्रशासन यांच्यात कुठलाही तोडगा न निघाल्याने भाजी विके्रत्यांचा बंद सुरुच राहणार आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर आर्वी पालिकेने पुढाकार घेत सर्व न.प. सदस्यांच्या उपस्थितीत सामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी आर्वीतील जुन्या बसस्थानकासमोर भाजीविक्रीची दुकाने लावली. येथून ग्र्राहकांनी मोठ्या प्रमाणात भाजी खरेदी केली. मात्र दुपारनंतर तालुक्यातून आर्वी शहरात येणाºया गावकºयांना भाजी मिळाली नाही. या बंदवर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.अमरावती येथून मागविला भाजीपालाआर्वीत गत चार दिवसांपासून भाजी विक्रेत्यांचा बंद सुरू आहे. यात नागरिकांची धावपळ होत असल्याने माजी आमदार दादाराव केचे यांनी थेट अमरावती येथून भाजीपाला मागवून योग्य दराने उपलब्ध करून दिला. आर्वी नगर पालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, सभापती, भाजपचे सर्व पधादिकारी यांनी एकत्रित येऊन गुरुवारी भाजी विक्री केली. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. गुरुवार आठवडी बाजार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे म्हणाले, सौंदर्यीकरनाच्या शासकीय बांधकामात अडथळा आणून हे काही व्यावसायिक राजकारण करीत आहेत. दोन दिवसांत सावतामाळी बाजार आम्ही नागरिकांसाठी सुरू करीत आहोत. भाजी व्यावसायिक, दलाल यांची मध्यस्थी बंद होईल आणि शेतकºयांचा भाजीपाला सरळ नागरिकांना योग्य भावात मिळेल.आर्वी पालिकेने आठवडी बाजाराचे बांधकाम करण्यापूर्वी भाजीविक्रेता व इतरांना विश्वासात घेणे गरजेचे होते. यामुळे बाजार बंद ठेवण्याची वेळ आली नसती व नागरिकांची गैरसोय टाळता आली असती. पालिकेने यावर तातडीने तोडगा काढावा.- अमर काळे, आमदार, आर्वी.शासनाने मंजूर केलेल्या प्रस्तावाप्रमाणे आर्वी शहराचा विकास होत आहे. आठवडी बाजाराचे बांधकाम होईल. यात भाजीविक्रेते व इतर कोणत्याही व्यावसायिकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.- दादाराव केचे, माजी आमदार, आर्वी.