शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

धुऱ्यावरील झाडांची शेतकऱ्यांकडून विक्री

By admin | Updated: February 29, 2016 01:46 IST

नापिकीने शेतकरी खचला आहे. धुऱ्यावरचे वृक्ष विकून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

शेतसीमा संकटात : रस्त्यावरील झाडांची कत्तलअनिल रिठे  (श्या.पं.)नापिकीने शेतकरी खचला आहे. धुऱ्यावरचे वृक्ष विकून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे आगामी काळात शेताचे धुरेही संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात वृक्षकटाईची मोहीम सुरू आहे. मोठ्या वृक्षांच्या फांद्या तोडण्याच्या नावाने वृक्षकटाई केली जात आहे. याकडे महसूल, वन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे दिसते.चिस्तुर ते भारसवाडा, किन्हाळा ते अंतोरा, खंबीत, बेलोरा यासह परिसरातील अनेक रस्त्यांच्या कडेला असलेली मोठी झाडे खोडासह बेपत्ता झाल्याचे दिसून येत आहे. शेतातील अनेक धुऱ्यांचीही तशीच अवस्था आहे. प्रथम झाडांच्या फांद्या कापण्यात येतात वा साल काढली जाते. काही वेळेला खोडाला छिद्र करून त्यात विस्तव वा चुना, सल्फेट टाकण्यात येते. काही दिवसांनी ती झाडे वाळून जातात. यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करीत ती झाडे कापली जातात. शेतकरी आपल्या शेताच्या धुरऱ्यावर असलेली एक-दोन झाडे संबंधित कंत्राटदाराला विकतात. सदर कंत्राटदार शेताजवळील रस्त्यालगतची झाडे संबंधित अधिकाऱ्याला चिरीमिरी देऊन कापून काढतात. झाडांची कत्तल करण्याची ही मोहीम आष्टी तालुक्यात सुरू झाली आहे. सोयाबीन, कापूस ही पिके हातची गेली. संत्रा गळाला, नापिकीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, रानकटाई मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आष्टी, धाडी, सारवाडी, आर्वी येथील काही आरामशीनवर बाभूळ तसेच आडजात लाकडांचे ढीग आहेत. याकडे वन व महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक टंचाई भागविण्यासाठी शेताच्या धुऱ्यावरील वृक्ष विकण्याचा सपाटा लावला आहे. यात बाभूळ, कडूनिंब, आंबा आदी वृक्षांचा समावेश आहे. आनंदवाडी ते खंबीत बेलोरा या मार्गावरील काही शेतातील बाभळी कंत्राटरारांनी विकत घेतल्या. कोणत्याही महसूल वा अन्य कोणत्याही विभागाची परवानगी न घेता शेतातील वृक्ष कापले. सोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चिरीमिरी देत शेताजवळील रस्त्याच्या हद्दीत येत असलेली बाभळीची झाडेही कटर मशीनद्वारे कापली. प्रत्येक रस्त्यावर अशीच वृक्षकटाई सुरू राहिली तर रस्ते उजाड झाल्याशिवाय राहणार नाही. एकेकाळी शेतीच्या धुऱ्यावर आंबा, बोर, सीताफळे आदी झाडे दिसत होती. ती इतिहासजमा झालीत. धुऱ्यावरील झाडांमुळे शेताची सीमा बांधली जात होती. शेतकऱ्यांत वादही होत नव्हते. शिवाय वृक्षांमुळे सुपिकता कायम राहत होती; पण ही झाडे कापली जात असल्याने धुरा नष्ट होत वादाला तोंड फुटल्याचे दिसते.पक्षी व प्राण्यांचे जीवनही धोक्यातपर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्ची घालत आहे. नेमके या विरूद्ध काम तालुक्यात सुरू आहे. प्रत्येक रस्त्यावरील वृद्वांची कत्तल केली जात आहे. धुऱ्यावरील वृक्षही कापले जात असल्याने धुरे नष्ट होत वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय वृक्षतोडीमुळे पक्ष्यांना घरटे राहणार नाही. ही कत्तल अशीच सुरू राहिली तर काही वर्षांनी झाडेच राहणार नाही. परिणामी, पशु-पक्षीही धोक्यात येण्याची शक्यता आहे.