शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

मुद्रांक विक्रीस विक्रेत्यांचा नकार

By admin | Updated: April 2, 2017 00:51 IST

विविध कामांसाठी लागणारे मुद्रांक विकताना विक्रेत्यांना जटील लेखी प्रक्रिया पार पाडाव्या लागतात.

लेखी प्रक्रियेचा ससेमिरा : सामान्यांच्या वाढणार अडचणी रोहणा : विविध कामांसाठी लागणारे मुद्रांक विकताना विक्रेत्यांना जटील लेखी प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. १०, २०, ५० व १०० रुपयांच्या मुद्रांकांसाठी ही प्रक्रिया व त्यासाठी शासनाकडून काहीच मिळत नसल्याने केवळ हमाली ठरत असल्याचा सूर उमटत आहे. परिणामी, राज्यातील मुद्रांक विक्रेते विक्री बंद करणार आहे. स्टॅम्प व्हेंडर पदाचा ते राजीनामा देणार असल्याचेही समजते. मुद्रांक विक्री थांबविली तर सामान्यांच्या अडचणीत वाढ होणार असून नवीनच डोकेदुखी निर्माण होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी वित्तीय संस्था, राष्ट्रीयकृत बँका आणि खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील इसारचिठ्ठी यासाठी विविध मूल्यांच्या मुद्रांक शुल्काच्या पेपरची आवश्यकता असते. याशिवाय ज्या प्रमाणपत्रे व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्काची आवश्यकता नसते, त्यासाठीही अधिकारी स्टॅम्प पेपरची सक्ती करीत असल्याचे दिसते. परिणामी, तहसील कार्यालये, न्यायालये व इतर ठिकाणी मुद्रांक शुल्काच्या पेपरची खरेदी-विक्री वाढलेली आहे. सध्या ग्राहकांना असे मुद्रांक पेपर मुद्रांक विक्रेत्याकरवी छापील किंमतीवर मिळतात. हे विकत घेताना ग्राहकांना ओळखपत्र सादर करावे लागते. कोणत्या कामासाठी खरेदी करीत आहोत, हे सांगणे बंधनकारक आहे. शिवाय विक्रेत्यांना या सर्व बाबींची लेखी नोंद ठेवावी लागत आहे. यासाठी विक्रेत्यांना आवश्यक व मिळकतीचे काम सोडून मधेच यासाठी वेळ द्यावा लागतो. हे काम करण्यासाठी विक्रेत्यांना शासन वेगळे मानधन देत नसल्याची मुद्रांक विक्रेत्यांची तक्रार आहे. शासनाचे हे काम करणे म्हणजे निव्वळ हमाली आहे, अशी मुद्रांक विक्रेत्यांची भावना झाली आहे. यामुळे मुद्रांक विक्रेते त्यांच्याजवळ मुद्रांक असतानाही आताच संपले, अशी लोणकढी थाप मारतात. कधी चार नंतर या असे सांगून टाळतात. या प्रकारांमुळे ग्राहकांच्या अडचणी वाढतात. शिवाय वेळ व पुन्हा जाण्या-येण्याचा खर्च वाढतो. याबाबत अधिक चौकशी केली असता राज्यातील सर्व मुद्रांक विक्रेते एप्रिल महिन्यात सदर विक्री थांबविणार असून मुद्रांक विक्रेता या पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते. मुद्रांक विक्रेत्यांनी दिलेली ही धमकी जर त्यांनी खरी ठरविली तर सामान्य नागरिकांना दैनंदिन कामकाजात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या समस्येतून शासनाने सन्मानजनक तोडगा काढावा, अशी मागणी विक्रेते तथा ग्राहकांनी केली आहे.(वार्ताहर)