शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

सेवानिवृत्त कर्मचाºयांचा लक्ष्मीपूजनाला आत्मक्लेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:36 IST

जिल्हा भूविकास बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना शासनाने अद्याप हक्काची रक्कम दिली नाही. याबाबत पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी सत्याग्रह सुरू केला.

ठळक मुद्देज्येष्ठांचा लढा : समस्या सोडविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जिल्हा भूविकास बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना शासनाने अद्याप हक्काची रक्कम दिली नाही. याबाबत पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी सत्याग्रह सुरू केला. आठव्या दिवशी बैठा सत्याग्रह सेवाग्राम आश्रम परिसरात सुरू आहे. अद्याप आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नसून लक्षीपूजनाच्या दिवशी आत्मक्लेष आंदोलन करणार येणार आहे.सेवाग्राम आश्रमासमोर असंघटीत सर्व जिल्हा भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत सत्याग्रहाला प्रारंभ केला आहे. त्याचा आज आठवा दिवस आहे. २००७-०८ पासून सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांची देय ग्रॅज्युटी अधिक रजेचे वेतन, प्रलंबित अतिरिक्त भत्ता न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरित अदा करावा, २०१० पासून स्वेच्छा निवृत्ती, नियमित सेवानिवृत्ती, राज्य शासनाच्या ३ आॅगस्टच्या निर्णयानुसार कार्यमुक्त केलेल्या सेवानिवृत्तांची ग्रॅज्युटी, रजेचे वेतन, प्रलंबित अतिरिक्त निर्देशांक महागाई भत्ता, प्रलंबित नियमित वेतन, स्वेच्छा निवृत्तीची नुकसान भरपाई तसेच २००१ ते २००९ या कालावधीतील महागाई भत्ता त्वरित द्यावा आदी मागण्यांसाठी जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात सदर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सतीश काळे, अशोक मगर, सागर कुत्तरमारे, मधुकर प्रांजळे, सुरेश रहाटे, वानखेडे, चित्रकला रहाटे आदी सहभागी झाले आहेत. तसेच तोडगा निघाला नसल्याने गुरूवारी आत्मक्लेष करणार आहे.लक्ष्मीपूजनाला विदर्भातील अनेक सहकारी सहभागी होणार१९ आॅक्टोबरला सकाळी १० वाजतापासून प्रारंभ होणाºया आत्मक्लेष आंदोलनात विदर्भातील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहचारिणी व कुटुंबासह सहभागी होतील. राज्यकर्त्यांनी सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर आर्थिक देण्याबाबत निर्णायक पाऊल उचलून सकारात्मक कार्यवाही न केल्यास, शासनाची ही कृती बेजवाबदार ठरेल असा खेद व्यक्त केला.जीवन-मरणाचा प्रश्न ऐरणीवर असताना पारदर्शक शासन मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा खेद आंदोलनकर्त्यांना व्यक्त केला. दिवाळी सणाच्या दिवशी १९ आॅक्टोबरला रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. सकारात्मक निर्णय होईपर्यंत सत्याग्रह अखंड चालूच राहणार असा निर्धार कृती समितीने व्यक्त केला आहे.