शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

सेवानिवृत्त कर्मचाºयांचा लक्ष्मीपूजनाला आत्मक्लेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:36 IST

जिल्हा भूविकास बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना शासनाने अद्याप हक्काची रक्कम दिली नाही. याबाबत पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी सत्याग्रह सुरू केला.

ठळक मुद्देज्येष्ठांचा लढा : समस्या सोडविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जिल्हा भूविकास बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना शासनाने अद्याप हक्काची रक्कम दिली नाही. याबाबत पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी सत्याग्रह सुरू केला. आठव्या दिवशी बैठा सत्याग्रह सेवाग्राम आश्रम परिसरात सुरू आहे. अद्याप आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नसून लक्षीपूजनाच्या दिवशी आत्मक्लेष आंदोलन करणार येणार आहे.सेवाग्राम आश्रमासमोर असंघटीत सर्व जिल्हा भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत सत्याग्रहाला प्रारंभ केला आहे. त्याचा आज आठवा दिवस आहे. २००७-०८ पासून सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांची देय ग्रॅज्युटी अधिक रजेचे वेतन, प्रलंबित अतिरिक्त भत्ता न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरित अदा करावा, २०१० पासून स्वेच्छा निवृत्ती, नियमित सेवानिवृत्ती, राज्य शासनाच्या ३ आॅगस्टच्या निर्णयानुसार कार्यमुक्त केलेल्या सेवानिवृत्तांची ग्रॅज्युटी, रजेचे वेतन, प्रलंबित अतिरिक्त निर्देशांक महागाई भत्ता, प्रलंबित नियमित वेतन, स्वेच्छा निवृत्तीची नुकसान भरपाई तसेच २००१ ते २००९ या कालावधीतील महागाई भत्ता त्वरित द्यावा आदी मागण्यांसाठी जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात सदर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सतीश काळे, अशोक मगर, सागर कुत्तरमारे, मधुकर प्रांजळे, सुरेश रहाटे, वानखेडे, चित्रकला रहाटे आदी सहभागी झाले आहेत. तसेच तोडगा निघाला नसल्याने गुरूवारी आत्मक्लेष करणार आहे.लक्ष्मीपूजनाला विदर्भातील अनेक सहकारी सहभागी होणार१९ आॅक्टोबरला सकाळी १० वाजतापासून प्रारंभ होणाºया आत्मक्लेष आंदोलनात विदर्भातील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहचारिणी व कुटुंबासह सहभागी होतील. राज्यकर्त्यांनी सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर आर्थिक देण्याबाबत निर्णायक पाऊल उचलून सकारात्मक कार्यवाही न केल्यास, शासनाची ही कृती बेजवाबदार ठरेल असा खेद व्यक्त केला.जीवन-मरणाचा प्रश्न ऐरणीवर असताना पारदर्शक शासन मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा खेद आंदोलनकर्त्यांना व्यक्त केला. दिवाळी सणाच्या दिवशी १९ आॅक्टोबरला रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. सकारात्मक निर्णय होईपर्यंत सत्याग्रह अखंड चालूच राहणार असा निर्धार कृती समितीने व्यक्त केला आहे.