शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त कर्मचाºयांचा लक्ष्मीपूजनाला आत्मक्लेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:36 IST

जिल्हा भूविकास बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना शासनाने अद्याप हक्काची रक्कम दिली नाही. याबाबत पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी सत्याग्रह सुरू केला.

ठळक मुद्देज्येष्ठांचा लढा : समस्या सोडविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जिल्हा भूविकास बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना शासनाने अद्याप हक्काची रक्कम दिली नाही. याबाबत पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी सत्याग्रह सुरू केला. आठव्या दिवशी बैठा सत्याग्रह सेवाग्राम आश्रम परिसरात सुरू आहे. अद्याप आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नसून लक्षीपूजनाच्या दिवशी आत्मक्लेष आंदोलन करणार येणार आहे.सेवाग्राम आश्रमासमोर असंघटीत सर्व जिल्हा भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत सत्याग्रहाला प्रारंभ केला आहे. त्याचा आज आठवा दिवस आहे. २००७-०८ पासून सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांची देय ग्रॅज्युटी अधिक रजेचे वेतन, प्रलंबित अतिरिक्त भत्ता न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरित अदा करावा, २०१० पासून स्वेच्छा निवृत्ती, नियमित सेवानिवृत्ती, राज्य शासनाच्या ३ आॅगस्टच्या निर्णयानुसार कार्यमुक्त केलेल्या सेवानिवृत्तांची ग्रॅज्युटी, रजेचे वेतन, प्रलंबित अतिरिक्त निर्देशांक महागाई भत्ता, प्रलंबित नियमित वेतन, स्वेच्छा निवृत्तीची नुकसान भरपाई तसेच २००१ ते २००९ या कालावधीतील महागाई भत्ता त्वरित द्यावा आदी मागण्यांसाठी जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात सदर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सतीश काळे, अशोक मगर, सागर कुत्तरमारे, मधुकर प्रांजळे, सुरेश रहाटे, वानखेडे, चित्रकला रहाटे आदी सहभागी झाले आहेत. तसेच तोडगा निघाला नसल्याने गुरूवारी आत्मक्लेष करणार आहे.लक्ष्मीपूजनाला विदर्भातील अनेक सहकारी सहभागी होणार१९ आॅक्टोबरला सकाळी १० वाजतापासून प्रारंभ होणाºया आत्मक्लेष आंदोलनात विदर्भातील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहचारिणी व कुटुंबासह सहभागी होतील. राज्यकर्त्यांनी सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर आर्थिक देण्याबाबत निर्णायक पाऊल उचलून सकारात्मक कार्यवाही न केल्यास, शासनाची ही कृती बेजवाबदार ठरेल असा खेद व्यक्त केला.जीवन-मरणाचा प्रश्न ऐरणीवर असताना पारदर्शक शासन मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा खेद आंदोलनकर्त्यांना व्यक्त केला. दिवाळी सणाच्या दिवशी १९ आॅक्टोबरला रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. सकारात्मक निर्णय होईपर्यंत सत्याग्रह अखंड चालूच राहणार असा निर्धार कृती समितीने व्यक्त केला आहे.