शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
4
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
5
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
6
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
7
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
8
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
9
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
10
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
11
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
12
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
13
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
14
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
15
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
16
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
18
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
19
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
20
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

वर्धिनीमुळे उभारली स्वयंसहाय्यता गटाची चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:30 IST

दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक राज्यामध्ये समूदाय संसाधन व्यक्तीची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे.

ठळक मुद्देनितीन मडावी : उमेद अंतर्गत वर्धिनीचे स्रेहसंमेलन व स्वयंसहाय्यता गटाच्या उत्पादनाची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक राज्यामध्ये समूदाय संसाधन व्यक्तीची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. वर्धा येथील उमेद अंतर्गत वर्धिनी या सामाजिक समावेशन संस्थात्मक बांधणीमध्ये महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वर्धा जिल्ह्यातील वर्धिनी या १५ दिवस ते ४५ दिवस घराबाहेर राहून कामकरीत असून काम करण्यात अग्रेसर आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्याचे नाव होत आहे. जिल्ह्यात स्वयंसहायता गटाची चळवळ निर्माण झाली. यामुळे प्रत्येक महिलेने उद्योगशील व्हावे, असे प्रतिपादन, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी केले.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत वर्धिनी स्रेहसंमेलन व स्वयंसहाय्यता गटातील तयार करण्यात येणारे प्रोडक्ट व खाद्य पदार्थ विक्रीच्या तीन दिवसीय प्रदर्शनीचे नियोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वर्धाद्वारे आयोजित करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, शिक्षण सभापती जयश्री गफाट, कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, समाजकल्याण सभापती निता गजाम, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, प्रकल्प अधिकारी संचालक डॉ. करूणा जुईकर, राज्य अभियान व्यवस्थापक सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी वैशाली ठाकूर, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, वर्धिनी कक्ष प्रमुख अमोलसिंग रोटेले उपस्थित होते.राज्यातील सामाजिक समावेशनाचे कार्य १३ जिल्ह्यातील वर्धिनी म्हणून वर्धेमार्फत यवतमाळ, गोंदीया, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, जालना, अमरावती येथे करण्यात आले आहे. वर्ष २०१५-१६ मध्ये ४,९६८ तर वर्ष २०१६-१७ मध्ये ४,६३५ असे एकूण स्वयंसहाय्यता गट ९,६०३ बांधणी संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आली. गरीबातील गरीब घटकांना त्यांची जागा मिळून देण्यासाठी कार्य करताना वर्धिनीच्या माध्यमातून गरीबीच्या दुचक्रातून बाहेर निघण्याचे मार्ग त्यांचे अधिकार या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांना फक्त स्वयंसहाय्यता समूहामध्ये सहभागी होणे असून हे त्यांच्या स्वत:चा विकास व कुटुंबाचा विकास योग्य पद्धतीने करीत आहे. या कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वर्धिनींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. वर्धिनीद्वारे २०१६-१७ मध्ये केलेल्या कामाचे पुस्तक तयार करण्यात आले असून याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.