शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगार हा बेरोजगारीवर मात करण्यासाठी पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 23:33 IST

जीवनात यशस्वी कोण? हे ठरवावं लागेल. युवकांनी सकारात्मक विचार व संस्कार आत्मसात केले तरच आपण यशस्वी होऊ शकू. आपण जर नैतिक मुल्यावर आधारीत जीवन जगत असाल तर आपण यशस्वी आहात.

ठळक मुद्देशैलेश नवाल : जिल्हास्तरीय युवा संमेलन, उल्लेखनीय कार्य करणाºयांना केले सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जीवनात यशस्वी कोण? हे ठरवावं लागेल. युवकांनी सकारात्मक विचार व संस्कार आत्मसात केले तरच आपण यशस्वी होऊ शकू. आपण जर नैतिक मुल्यावर आधारीत जीवन जगत असाल तर आपण यशस्वी आहात. युवा पिढीने आपल्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी स्वयंरोजगार हा पर्याय निवडला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.भारत सरकारच्या युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय अंतर्गत येणाºया नेहरू युवा केंद्र वर्धातर्फे स्थानिक विकास भवन येथे जिल्हास्तरीय युवा संमेलन घेण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक मेहरे तर प्रमुख अतिथी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब गावंडे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, मुरलीधर बेलखोडे, पोलीस उपनिरीक्षक दाभाडे, संजय माटे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवाल पुढे म्हणाले, ज्यात उत्पन्न काढता येते तो रोजगार, शेतीवर आधारलेले अनेक उद्योग युवकांना उभारता येतील. त्यासाठी लागणारी सर्व मदत शासन करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अशोक मेहरे यांनी युवकांनी महत्वाकांक्षी असावे. शिवाय ती महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे. तरच आपण जीवनात यशस्वी होवू शकू असे सांगितले. युवकांना मार्गदर्शन करताना गावंडे म्हणाले की, युवकांनी विकासात्मक कामाकडे लक्ष देवून त्यात पारदर्शकता कशी आणता येईल यासाठी कार्य केले पाहिजे, असे विचार मांडले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला संजय माटे यांनी २०१६-१७ चा उत्कृष्ट जिल्हा युवा मंडळ पुरस्कार जाहीर केला. यावर्षी हा पुरस्कार आर्वी तालुक्यातील पिपंळगाव (भोसले) येथील धरणग्रस्त बहुउद्देशीय युवा मंडळ यांना प्राप्त झाला. हा पुरस्कार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते संबंधितांना देऊन त्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी नेहरू युवा केंद्र वर्धातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेचे प्रमाणपत्र ही वितरीत करण्यात आले. भाषण स्पर्धेत प्रथम बक्षीस राधा राजेशकुमार तिवारी, द्वितीय क्रमांक अताउब हैदरअली अन्सारी तसेच तृतीय पुरस्कार शमा रऊफ शेख हिला देण्यात आला. जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रिया गजानन वडेकर, द्वितीय मंगला मारोती चौधरी, तृतीय किर्ती परशुराम सोनाये यांना प्राप्त झाला. तसेच जिल्हास्तरीय शॉर्ट फिल्म स्पर्धेचा प्रथम पुरस्कार अक्षय राजेश अहिव यांना प्राप्त झाला. निसर्ग सेवा समितीचा निसर्ग सेवेला वाहून घेतलेल्या कार्यकर्ता विठ्ठल गेडाम यांचा यावेळी जिल्हाधिकाºयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रज्ञा ब्राह्मणकर यांनी केले तर आभार अतुल कातरकर यांनी मानले. कार्यक्रमाला दयाराम रामटेके, अतुल कातरकर सतीश इंगोले, संजय अवचट, राहुल लाखे, सतीश काळे, राहुल दुरतकर, संदीप रघाटाटे, संदीप सुपटकर, किशोर ठाकरे उपस्थित होते. यशस्वीसाठी मंगेश डुबे, अमोल चवरे, सुरज राऊत, ममता नासरे, प्रिया पिसुर्डे, माधुरी नागपुरे, शितल महाकाळकर, दीक्षा सहारे, रूपाली मानकर, विकास आसुटकर, कोमल तायडे, प्रवीण कडू, स्वप्नील कडू आदींनी सहकार्य केले.