शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कामधेनू दत्तकग्रामसाठी चार गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 21:58 IST

शेतीला पुरक व्यवसायाची जोड म्हणून विविध योजना शासन राबविते. त्याचाच एक भाग म्हणून कामधेनू दत्तकग्राम योजना राबविली जाते. दुग्ध व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने यंदाच्यावर्षी चार गावांची निवड करून तेथे कामधेनू दत्तकग्राम योजना एकूण दहा टप्प्यात राबविली जाणार आहे.

ठळक मुद्देदहा टप्प्यात अंमलबजावणी : दुग्ध व्यवसायाला चालना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतीला पुरक व्यवसायाची जोड म्हणून विविध योजना शासन राबविते. त्याचाच एक भाग म्हणून कामधेनू दत्तकग्राम योजना राबविली जाते. दुग्ध व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने यंदाच्यावर्षी चार गावांची निवड करून तेथे कामधेनू दत्तकग्राम योजना एकूण दहा टप्प्यात राबविली जाणार आहे.देशातील ग्रामीण जनतेचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीसोबतच पशुसंवर्धन या पुरक व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी वळणे ही काळाची गरज आहे. पशुसंवर्धनामधील दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुकुटपालन हे तीन प्रमुख व्यवसाय शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारेच आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धनाच्या विकासाला वाव निर्माण झाला आहे. सोबतच वर्धा जिल्ह्यातील ५ तालुक्यांमध्ये विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत मदर डेअरीच्या माध्यमातून दुधाला चांगले दर मिळत असल्याने शेतकरी व पशुपालकांचा पशुसंवर्धनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलला आहे. पशुपालक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा पशुसंवर्धनाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून जि.प. पशुसंवर्धन विभागाकडून कामधेनू दत्तकग्राम योजना गत पाच वर्षांपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना आतापर्यंत या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी कामधेनू दत्तकग्राम योजनेसाठी चार गावांची निवड करण्यात आली आहे. त्यात आर्वी तालुक्यातील गौरखेडा, चोरांबा, काकडधरा ही ३ गावे मिळून एक दत्तकग्राम, आष्टी तालुक्यातील वाघोली, नरसापूर ही दोन गावे मिळून एक दत्तकग्राम, कारंजा (घा.) तालुक्यातील सारवाडी मध्ये एक दत्तकग्राम आणि जसापूर, किन्हाळा ही दोन गावे मिळून एक दत्तकग्राम तयार करण्यात आले आहे. या योजनेची अंमलबजावणी सदर गावांमध्ये एकूण दहा टप्प्यात होणार असल्याचे सांगण्यात आले. सदर योजना पशुपालकांसाठी फाद्याची ठरणारीच आहे.विविध उपक्रम राबविणारज्या गावांची निवड कामधेनू दत्तकग्रामसाठी करण्यात आली आहे तेथे पशुपालक मंडळ स्थापन करणे, अभ्यास सहलीचे आयोजन करणे, जंतनाशक शिबिराचे आयोजन, खनिजद्रव्ये मिश्रण व जिवनसत्वांचा पुरवठा करणे, गोचिड, गोमाशी निर्मूलन शिबिराचे आयोजन, वंधत्व निदान व उपचार शिबिराचे आयोजन, वैरण विकास कार्यक्रम राबविण्यासाठी वैरण बियाणे वितरण करणे, निकृष्ट चारा सकस करणे, नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे, जनावरांचे मलमूत्र व वाया गेलेल्या चाऱ्याचे खत व्यवस्थापन करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.योजना सफल करण्यासाठी आणि पशुसंवर्धनाचे माध्यमातून आर्थिक विकासाकडे वाटचाल करण्यासाठी सदर गावातील पशुपालकांनी नजीकच्या पशु वैद्यकीय दवाखान्याशी तसेच पशुधन विकास अधिकारी पं.स. आर्वी, आष्टी, कारंजा यांच्याशी संपर्क करावा.- डॉ. प्रज्ञा गुल्हाणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि प. वर्धा.