शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांचा तुटवडा, उगवणशक्तीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

जिल्ह्यात यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनचे नियोजन आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत कपाशीचे क्षेत्र घटले असून सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये ३२ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने पुरेशा बियाण्यांची गरज होती. मात्र, गेल्यावर्षी दीर्घकाळ राहिलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या बियाण्यांची उपलब्धता कमी झाली.

ठळक मुद्देसोयाबीन उत्पादकांची कोंडी : पावसाच्या दडीने दुबार पेरणीचे संकट, कृषी विभागाच्या उंटावरून शेळ्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कापूस विक्रीकरिता आलेल्या अडचणी आणि कवडीमोल भाव मिळाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीत वाढ केली आहे. अशात सोयाबीनच्या बियाण्यांचा असलेला तुटवडा आणि बियाण्यांतील उगवण शक्तीचा अभाव, यामुळे सोयाबीन उत्पादकांची हंगामाच्या सुरुवातीलाच आर्थिक कोंडी झाली आहे. वरुणराजाही कोपल्याने आता दुबार पेरणीची सावट कायम आहे.जिल्ह्यात यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनचे नियोजन आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत कपाशीचे क्षेत्र घटले असून सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये ३२ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने पुरेशा बियाण्यांची गरज होती. मात्र, गेल्यावर्षी दीर्घकाळ राहिलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या बियाण्यांची उपलब्धता कमी झाली. यावर्षीच्या हंगामाकरिता जिल्ह्यात ७२ हजार ९७५ क्विंटल बियाण्यांची मागणी असताना सध्यास्थितीत जिल्ह्याला ६७ हजार ५०० क्विंटलच बियाणे प्राप्त झाले आहे. यामध्ये विविध कंपनींचे प्रमाणित आणि अप्रमाणित बियाणे बाजारात आले आहे. काही कृषीकेंद्र संचालकांनी अप्रमाणित बियाणेच शेतकऱ्यांच्या माथी मारले आहे.सोयाबीन अप्रमाणित बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी होत असल्याने या बियाण्यांमध्ये उगवण शक्तीचा अभाव असल्याचे बोलले जात आहे. सोबतच पावसानेही दडी मारल्याने सोयाबीन उत्पादक हंगामाच्या सुरुवातीलाच मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांची सोयाबीनच्या बियाण्यांमध्ये मोठी फसगत झाली असतानाही, कृषी विभागाकडून केवळ उंटावरुन शेळ्या हाकत असल्याची ओरड शेतकºयांकडून होत आहे.ईगल एक्सलंट-प्लसच्या तक्रारी अधिककाही कृषी केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांना इगल एक्सलंट-प्लस या अप्रमाणित (सिंगल लेबल) बियाणे घेण्याचा आग्रह करण्यात आला. शेतकºयांनी जवळपास अडीच हजार रुपये मोजून या बियाण्याची बॅग खरेदी केली आहे. पण, पेरल्यानंतर उगविलेच नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी केंद्र संचालकाला विचारणा केल्यास आम्ही जबाबदार नाही, तुमचे तुम्ही बघा, असे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. बोगस बियाण्यामुळे आलेली मोड आणि हंगामातील निघून गेलेले महत्त्वाचे दिवस यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.यासंदर्भात कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर कृषी विभागाकडून शेताची पाहणी करुन तो अहवाल शासनाला पाठविला जातो. तसेच शेतकऱ्याला ग्राहक मंचात दाद मागण्याचा सल्ला दिल्या जातो.पण, आता लागवडीच्या दिवसात शेतकºयाला या गोष्टी करणे अशक्य होत आहे. कारवाईबाबत असलेल्या अधांतरी धोरणामुळे शेतकरी पिचला जात असून कंपन्यांची मुजोरी वाढत आहे.कृषी विभागाच्या लेखी १७ टक्केच पेरण्याजिल्ह्यात मृगाच्या पावसाने हजेरी लावताच शेतकऱ्यांनी पेरणी लगबग सुरु केली. मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कपाशी व तुरीची लागवड केली आहे. जिल्ह्यात जवळपास ३० टक्केवर शेतकºयांनी लागवड केली असताना कृषी विभागाच्या लेखी १७ टक्केच लागवड झाल्याची नोंद आहे. विशेषत: पावसाने दडी मारल्यामुळे बहूतांश शेतकऱ्यांचे पीके उगविलीच नसून दुबार पेरणीची वेळ आली आहे.कृषी केंद्रांची भेट अडीच हजारांचीहंगामाच्या दिवसात खतांचा व बियाण्यांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कृषी केंद्राची तपासणी केली जाते. कृषी केंद्रातील स्टॉक बुक व उपलब्ध साठा तपासल्या जातो. पण, या तपासणीसाठी गेल्यानंतर काही अधिकारी व कर्मचारी कृषी केंद्र संचालकांकडून दोन ते अडीच हजार रुपये वसूल करीत असल्याचीही बाब आता काही पुढे आली आहे. जिल्ह्यात ४०० वर कृषी केंद्र असल्याने हा प्रकार लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांचे हित जोपासणार की कृषी केंद्र संचालकाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. बियाण्यांची सर्व जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे बियाणे उगविले नसल्यास कृषी विभागाकडे लेखी तक्रार करावी. तक्रारीच्या आधारे तालुकास्तरीय कमिटी शेताची पाहणी केली जाते. त्यानंतर अहवाल तयार करुन तो शासनास पाठविला जातो. सोबतच शेतकऱ्याला ग्राहक मंचामध्ये दाद मागण्यास सांगितले जाते.संजय बमनोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जि.प.,वर्धा.

टॅग्स :agricultureशेती