शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

बियाण्यांचा तुटवडा, उगवणशक्तीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

जिल्ह्यात यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनचे नियोजन आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत कपाशीचे क्षेत्र घटले असून सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये ३२ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने पुरेशा बियाण्यांची गरज होती. मात्र, गेल्यावर्षी दीर्घकाळ राहिलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या बियाण्यांची उपलब्धता कमी झाली.

ठळक मुद्देसोयाबीन उत्पादकांची कोंडी : पावसाच्या दडीने दुबार पेरणीचे संकट, कृषी विभागाच्या उंटावरून शेळ्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कापूस विक्रीकरिता आलेल्या अडचणी आणि कवडीमोल भाव मिळाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीत वाढ केली आहे. अशात सोयाबीनच्या बियाण्यांचा असलेला तुटवडा आणि बियाण्यांतील उगवण शक्तीचा अभाव, यामुळे सोयाबीन उत्पादकांची हंगामाच्या सुरुवातीलाच आर्थिक कोंडी झाली आहे. वरुणराजाही कोपल्याने आता दुबार पेरणीची सावट कायम आहे.जिल्ह्यात यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनचे नियोजन आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत कपाशीचे क्षेत्र घटले असून सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये ३२ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने पुरेशा बियाण्यांची गरज होती. मात्र, गेल्यावर्षी दीर्घकाळ राहिलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या बियाण्यांची उपलब्धता कमी झाली. यावर्षीच्या हंगामाकरिता जिल्ह्यात ७२ हजार ९७५ क्विंटल बियाण्यांची मागणी असताना सध्यास्थितीत जिल्ह्याला ६७ हजार ५०० क्विंटलच बियाणे प्राप्त झाले आहे. यामध्ये विविध कंपनींचे प्रमाणित आणि अप्रमाणित बियाणे बाजारात आले आहे. काही कृषीकेंद्र संचालकांनी अप्रमाणित बियाणेच शेतकऱ्यांच्या माथी मारले आहे.सोयाबीन अप्रमाणित बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी होत असल्याने या बियाण्यांमध्ये उगवण शक्तीचा अभाव असल्याचे बोलले जात आहे. सोबतच पावसानेही दडी मारल्याने सोयाबीन उत्पादक हंगामाच्या सुरुवातीलाच मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांची सोयाबीनच्या बियाण्यांमध्ये मोठी फसगत झाली असतानाही, कृषी विभागाकडून केवळ उंटावरुन शेळ्या हाकत असल्याची ओरड शेतकºयांकडून होत आहे.ईगल एक्सलंट-प्लसच्या तक्रारी अधिककाही कृषी केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांना इगल एक्सलंट-प्लस या अप्रमाणित (सिंगल लेबल) बियाणे घेण्याचा आग्रह करण्यात आला. शेतकºयांनी जवळपास अडीच हजार रुपये मोजून या बियाण्याची बॅग खरेदी केली आहे. पण, पेरल्यानंतर उगविलेच नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी केंद्र संचालकाला विचारणा केल्यास आम्ही जबाबदार नाही, तुमचे तुम्ही बघा, असे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. बोगस बियाण्यामुळे आलेली मोड आणि हंगामातील निघून गेलेले महत्त्वाचे दिवस यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.यासंदर्भात कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर कृषी विभागाकडून शेताची पाहणी करुन तो अहवाल शासनाला पाठविला जातो. तसेच शेतकऱ्याला ग्राहक मंचात दाद मागण्याचा सल्ला दिल्या जातो.पण, आता लागवडीच्या दिवसात शेतकºयाला या गोष्टी करणे अशक्य होत आहे. कारवाईबाबत असलेल्या अधांतरी धोरणामुळे शेतकरी पिचला जात असून कंपन्यांची मुजोरी वाढत आहे.कृषी विभागाच्या लेखी १७ टक्केच पेरण्याजिल्ह्यात मृगाच्या पावसाने हजेरी लावताच शेतकऱ्यांनी पेरणी लगबग सुरु केली. मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कपाशी व तुरीची लागवड केली आहे. जिल्ह्यात जवळपास ३० टक्केवर शेतकºयांनी लागवड केली असताना कृषी विभागाच्या लेखी १७ टक्केच लागवड झाल्याची नोंद आहे. विशेषत: पावसाने दडी मारल्यामुळे बहूतांश शेतकऱ्यांचे पीके उगविलीच नसून दुबार पेरणीची वेळ आली आहे.कृषी केंद्रांची भेट अडीच हजारांचीहंगामाच्या दिवसात खतांचा व बियाण्यांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कृषी केंद्राची तपासणी केली जाते. कृषी केंद्रातील स्टॉक बुक व उपलब्ध साठा तपासल्या जातो. पण, या तपासणीसाठी गेल्यानंतर काही अधिकारी व कर्मचारी कृषी केंद्र संचालकांकडून दोन ते अडीच हजार रुपये वसूल करीत असल्याचीही बाब आता काही पुढे आली आहे. जिल्ह्यात ४०० वर कृषी केंद्र असल्याने हा प्रकार लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांचे हित जोपासणार की कृषी केंद्र संचालकाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. बियाण्यांची सर्व जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे बियाणे उगविले नसल्यास कृषी विभागाकडे लेखी तक्रार करावी. तक्रारीच्या आधारे तालुकास्तरीय कमिटी शेताची पाहणी केली जाते. त्यानंतर अहवाल तयार करुन तो शासनास पाठविला जातो. सोबतच शेतकऱ्याला ग्राहक मंचामध्ये दाद मागण्यास सांगितले जाते.संजय बमनोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जि.प.,वर्धा.

टॅग्स :agricultureशेती