० दिवस लोटूनही गाडी मालकाचा पत्ता नाहीतळेगाव (श्या.पं.) : आष्टी मार्गावरील शिरकुटनी फाट्याजवळ २८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास कार व मोटर सायकल यांच्यात झालेल्या अपघातातील कार मालकाचा अद्यापही शोध लागला नाही. शिवाय अपघाताला दहा दिवसांचा कालावधी लोटला असताना ती कार कशी जळाली, याचाही शोध लागू शकला नाही. यामुळे पोलिसांच्या एकूण तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील तीन युवक गंभीररित्या जखमी झाले होते. अपघातानंतर काही वेळातच क्षतिग्रस्त कार जळालेल्या अवस्थेमध्ये आढळून आली. या कारमध्ये कोण होते, याचा शोध अद्यापही लागलेला नाही. एम.एच. १६ ए.बी. ११८१ असा अपघातग्रस्त कारचा क्रमांक असून पोलीस वर्धा आरटीओमधून शोध घेऊन आलेत; पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. अपघातानंतर जमावाने ती गाडी पेटवल्याची चर्चा परिसरात आहे; पण त्यासही पोलीस दुजोरा देऊ शकत नसल्याचेच दिसते.(वार्ताहर)
‘त्या’ जळालेल्या कारचे रहस्य कायम
By admin | Updated: February 10, 2016 02:45 IST