शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

माध्यमिक शिक्षकांचा ठिय्या

By admin | Updated: April 17, 2016 02:04 IST

मराठी माध्यमांच्या शाळेबाबत शासनाची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठी शाळांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

शिक्षक आमदार : मराठी माध्यमांच्या शाळांबाबत शासनाची भूमिका दुटप्पीवर्धा : मराठी माध्यमांच्या शाळेबाबत शासनाची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठी शाळांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे. समाजाला दिशा देणाऱ्या शिक्षकांना वारंवार रस्त्यावर उतरण्यास बाध्य करणे हे समर्पक नसून शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण करणारी असल्याचा आरोप शिक्षक आ. नागो गाणार यांनी केला. येथील जिल्हा परिषदेच्या आवारात शिक्षकांनी शनिवारी विविध मागण्यांकरिता ठिय्या आंदोलन केले. यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शैक्षणिक सत्र २०१५-१६ ची संच मान्यता वितरीत करण्याचे काम जिल्हास्तरावर सुरू आहे. त्यामध्ये पटसंख्या ९०/१०० पेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापकाचे पदच दिसून येत नाही. ही बाब एम.ई.पी.एस. १९८१ च्या नियमावली व माध्यमिक शाळा संहितेला छेद देणारी असल्याचा आरोप करण्यात आला. जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये सरसकट वर्ग ५ ते ८ जोडण्याची नियमबाह्य कृती सुरू आहे. त्यामुळे माध्यमिक शाळेबाबत शासनाची ही भूमिका अन्यायकारक असून आर.टी.ई. च्या कायद्याची भंग करणारी असल्याचा आरोप करण्यात आला. गत १५ वर्षांपासून विना अनुदानित शाळांचा प्रश्न निकाली निघाला नाही. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या गत अनेक वर्षांपासून खितपत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या तक्रार निवारण समितीच्यावतीने विविध मागण्या करण्यात आल्या. यात आरटीई मधील तरतुदी लक्षात घेता प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत सरसकट चवथीच्या शाळांना पाचवा वर्ग व सातवीच्या शाळांना आठवा वर्ग सर्व ठिकाणी जोडण्यात येत आहे. या कृतीवर आळा घालण्याची मागणी करण्यात आली. पात्र विना अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन सुरू करणे व अपात्र शाळांना तात्काळ पात्र घोषित करण्याची मागणीही करण्यात आली. १ नोव्हेबर २००५ रोजी विना अनुदानित/अशंत: अनुदानित शाळेत नियुक्त सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे. नियुक्त सर्व शिक्षण सेवकांना सेवा संरक्षण देवून वैयक्तिक मान्यता देण्याबाबत शिबिराचे आयोजन करणे, आश्रम शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत काम नाही, वेतन नाही या संदर्भातला सामाजिक न्याय विभागाचा आदेश रद्द करण्यात यावा. यासह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या तातडीने निकाली काढणे. जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदे तातडीने भरणे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)