शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

अतिवृष्टी अनुदानाचा दुसरा टप्पा अप्राप्तच

By admin | Updated: June 20, 2015 02:27 IST

जानेवारी १५ ते मार्च २०१५ दरम्यान महाराष्ट्रात वादळी पाऊस, अतिवृष्टी व गारपिटीने थैमान घातले होते.

रोहणा : जानेवारी १५ ते मार्च २०१५ दरम्यान महाराष्ट्रात वादळी पाऊस, अतिवृष्टी व गारपिटीने थैमान घातले होते. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने अनुदानाची ४० टक्के रक्कम पीडितांना वाटली पण अनुदानाचा ६० टक्क्याचा दुसरा टप्पा खरीपाच्या पेरण्या सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे या दुसऱ्या टप्प्याचे अनुदान केव्हा मिळणार, असा प्रश्न जिल्हातील शेतकरी उपस्थित करीत आहे.जानेवारी ते मार्च २०१५ या काळात महाराष्ट्रासह जिल्ह्यात वादळी पावसाने तसेच गारपिटीने मोठे नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांचे खरीप व व रबी पिकांसह संत्रा, पपई व भाजीपाले पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानीचा सर्व्हे करून अहवाल तयार केला. केंद्र शासनाच्या चमूने देखील नुकसानीचा आढावा घेतला. राज्यशासनाने पाच हजार कोटी पैकी पहिल्या टप्प्यातील दोन हजार कोटीचे म्हणजेच ४० टक्के निधीचे वितरण केले. उर्वरित ६० टक्क्याचा दूसरा हप्ता लवकरच नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा करू असे आश्वासन शासनाकडून देण्यात आले होते. परंतु ते आश्वासनही हवेतच विरले.तीन महिन्यांचा काळ लोटला पण शासनाने याबाबत कोणतीच तरतूद केली नाही. लोकप्रतिनिधींनी देखील याची आठवण शासनाला करून दिली नाही, अशी तक्रार शेतकरी वारंवार करीत आहे. आता खरीपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीयकृत बँक शेतकऱ्यांना कर्ज देण्यात उदासिन आहे. त्यांच्या दृष्टीने शेतकरी हा घटक काळ्या यादी आहे. शेतकरी बी-बियाणे व खते यांची जुळवणी करताना डबघाईस आला आहे. त्यामुळे शासनाने देऊ केलेल्या अतिवृष्टी अनुदानाचा ६० टक्क्याचा दुसरा हप्ता त्वरित वितरित करून बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)