शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी अनुदानाचा दुसरा टप्पा अप्राप्तच

By admin | Updated: June 20, 2015 02:27 IST

जानेवारी १५ ते मार्च २०१५ दरम्यान महाराष्ट्रात वादळी पाऊस, अतिवृष्टी व गारपिटीने थैमान घातले होते.

रोहणा : जानेवारी १५ ते मार्च २०१५ दरम्यान महाराष्ट्रात वादळी पाऊस, अतिवृष्टी व गारपिटीने थैमान घातले होते. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने अनुदानाची ४० टक्के रक्कम पीडितांना वाटली पण अनुदानाचा ६० टक्क्याचा दुसरा टप्पा खरीपाच्या पेरण्या सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे या दुसऱ्या टप्प्याचे अनुदान केव्हा मिळणार, असा प्रश्न जिल्हातील शेतकरी उपस्थित करीत आहे.जानेवारी ते मार्च २०१५ या काळात महाराष्ट्रासह जिल्ह्यात वादळी पावसाने तसेच गारपिटीने मोठे नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांचे खरीप व व रबी पिकांसह संत्रा, पपई व भाजीपाले पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानीचा सर्व्हे करून अहवाल तयार केला. केंद्र शासनाच्या चमूने देखील नुकसानीचा आढावा घेतला. राज्यशासनाने पाच हजार कोटी पैकी पहिल्या टप्प्यातील दोन हजार कोटीचे म्हणजेच ४० टक्के निधीचे वितरण केले. उर्वरित ६० टक्क्याचा दूसरा हप्ता लवकरच नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा करू असे आश्वासन शासनाकडून देण्यात आले होते. परंतु ते आश्वासनही हवेतच विरले.तीन महिन्यांचा काळ लोटला पण शासनाने याबाबत कोणतीच तरतूद केली नाही. लोकप्रतिनिधींनी देखील याची आठवण शासनाला करून दिली नाही, अशी तक्रार शेतकरी वारंवार करीत आहे. आता खरीपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीयकृत बँक शेतकऱ्यांना कर्ज देण्यात उदासिन आहे. त्यांच्या दृष्टीने शेतकरी हा घटक काळ्या यादी आहे. शेतकरी बी-बियाणे व खते यांची जुळवणी करताना डबघाईस आला आहे. त्यामुळे शासनाने देऊ केलेल्या अतिवृष्टी अनुदानाचा ६० टक्क्याचा दुसरा हप्ता त्वरित वितरित करून बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)