शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

चरखागृहात उभारले जाणार बापू, विनोबांचे शिल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST

चरखागृहात चरखा आणि ग्रामीण जीवन, उद्योग यावर प्रकाश टाकणारी चित्रे असून ऑडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार असल्याने पर्यटकांना गांधींचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य, विचार आणि परंपरागत भारतातील व्यवसाय समजून घेता येईल. दोन सिमेंटचे चबुतरे तयार आहेत. सोमवारपासून दोन्ही शिल्पाचे भाग चरखागृह परिसरात आणण्यास प्रारंभ झाला आहे. याच ठिकाणी ते जोडून उभे करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसोमवारपासून वाहतूक : नऊ महिने तज्ज्ञ, विद्यार्थ्यांनी घेतले परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जागतिकस्तरावर आजपर्यंत भंगारातून शिल्प तयार केल्या गेलेले नाही. महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचे पहिलेच आणि सर्वात मोठे वैशिष्टयपूर्ण शिल्प असून याची स्थापना अण्णासागर तलावाजवळ जवळ न करता ते चरखागृह परिसरात करण्यात येणार असल्याची माहिती तज्ज्ञ समितीतील सर जे.जे.स्कूल ऑफ आटर््सचे प्रा.विजय बोंदर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.प्रा.बोंदर यांनी सुरूवातीला अण्णा सागर ही जागा दोन्ही शिल्प उभारण्यासाठी निवडली होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे ती जागा रद्द करून चरखागृहाची जागा निश्चित करण्यात आली. सेवाग्राम-वर्धा हा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. रस्त्याच्या दिशेने शिल्प उभारण्यात येणार असल्याने ये- जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारे ठरणार आहे. याच ठिकाणी जागतिक दर्जाचा चरखा आहे. चरखागृहात चरखा आणि ग्रामीण जीवन, उद्योग यावर प्रकाश टाकणारी चित्रे असून ऑडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार असल्याने पर्यटकांना गांधींचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य, विचार आणि परंपरागत भारतातील व्यवसाय समजून घेता येईल. दोन सिमेंटचे चबुतरे तयार आहेत. सोमवारपासून दोन्ही शिल्पाचे भाग चरखागृह परिसरात आणण्यास प्रारंभ झाला आहे. याच ठिकाणी ते जोडून उभे करण्यात येणार आहे. जवळपास नऊ महिने विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम करून शिल्प तयार केले आहे.यासाठी पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मे. अडारकर असोसिएट मुंबई, सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सचे निर्मिती विभाग, तज्ज्ञ समितीचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे, असे सांगितले. यावेळी अधिव्याख्याता विजय सकपाळ यांनी नीलपंख या पक्षाच्या निर्मितीविषयी माहिती दिली.दोन्ही महामानवांचे जीवन व कार्य राष्ट्र आणि मानवतेसाठी राहिले आहेत. दोघांचेही विचार मूल्य आजही जगाच्या कल्याणासाठी असल्याचे जगाने मान्य केले आहे. सेवाग्राम विकास आराखडयाअंतर्गत चरखागृह आणि शिल्पाचे काम करण्यात येत असून वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे.भंगार साहित्यातून शिल्पनिर्मितीबा-बापू यांचे १५० वी जयंती वर्ष आहे. सेवाग्राम-वर्धा बापूंची कर्मभूमी, प्रयोगभूमी असल्याने त्यांच्या विचार व कार्याच्या स्मृती जोपासण्यात याव्या, जागतिक दर्जाचे वैशिष्टयपूर्ण कार्य स्मारकाच्या माध्यमातून व्हावे या दृष्टिकोनातून चरखागृह, मेटल स्कॅ्रपमधून शिल्प निर्माण करण्यात आले आहे.

टॅग्स :Vinoba Bhaveविनोबा भावेMahatma Gandhiमहात्मा गांधी