शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

चरखागृहात उभारले जाणार बापू, विनोबांचे शिल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST

चरखागृहात चरखा आणि ग्रामीण जीवन, उद्योग यावर प्रकाश टाकणारी चित्रे असून ऑडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार असल्याने पर्यटकांना गांधींचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य, विचार आणि परंपरागत भारतातील व्यवसाय समजून घेता येईल. दोन सिमेंटचे चबुतरे तयार आहेत. सोमवारपासून दोन्ही शिल्पाचे भाग चरखागृह परिसरात आणण्यास प्रारंभ झाला आहे. याच ठिकाणी ते जोडून उभे करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसोमवारपासून वाहतूक : नऊ महिने तज्ज्ञ, विद्यार्थ्यांनी घेतले परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जागतिकस्तरावर आजपर्यंत भंगारातून शिल्प तयार केल्या गेलेले नाही. महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचे पहिलेच आणि सर्वात मोठे वैशिष्टयपूर्ण शिल्प असून याची स्थापना अण्णासागर तलावाजवळ जवळ न करता ते चरखागृह परिसरात करण्यात येणार असल्याची माहिती तज्ज्ञ समितीतील सर जे.जे.स्कूल ऑफ आटर््सचे प्रा.विजय बोंदर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.प्रा.बोंदर यांनी सुरूवातीला अण्णा सागर ही जागा दोन्ही शिल्प उभारण्यासाठी निवडली होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे ती जागा रद्द करून चरखागृहाची जागा निश्चित करण्यात आली. सेवाग्राम-वर्धा हा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. रस्त्याच्या दिशेने शिल्प उभारण्यात येणार असल्याने ये- जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारे ठरणार आहे. याच ठिकाणी जागतिक दर्जाचा चरखा आहे. चरखागृहात चरखा आणि ग्रामीण जीवन, उद्योग यावर प्रकाश टाकणारी चित्रे असून ऑडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार असल्याने पर्यटकांना गांधींचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य, विचार आणि परंपरागत भारतातील व्यवसाय समजून घेता येईल. दोन सिमेंटचे चबुतरे तयार आहेत. सोमवारपासून दोन्ही शिल्पाचे भाग चरखागृह परिसरात आणण्यास प्रारंभ झाला आहे. याच ठिकाणी ते जोडून उभे करण्यात येणार आहे. जवळपास नऊ महिने विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम करून शिल्प तयार केले आहे.यासाठी पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मे. अडारकर असोसिएट मुंबई, सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सचे निर्मिती विभाग, तज्ज्ञ समितीचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे, असे सांगितले. यावेळी अधिव्याख्याता विजय सकपाळ यांनी नीलपंख या पक्षाच्या निर्मितीविषयी माहिती दिली.दोन्ही महामानवांचे जीवन व कार्य राष्ट्र आणि मानवतेसाठी राहिले आहेत. दोघांचेही विचार मूल्य आजही जगाच्या कल्याणासाठी असल्याचे जगाने मान्य केले आहे. सेवाग्राम विकास आराखडयाअंतर्गत चरखागृह आणि शिल्पाचे काम करण्यात येत असून वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे.भंगार साहित्यातून शिल्पनिर्मितीबा-बापू यांचे १५० वी जयंती वर्ष आहे. सेवाग्राम-वर्धा बापूंची कर्मभूमी, प्रयोगभूमी असल्याने त्यांच्या विचार व कार्याच्या स्मृती जोपासण्यात याव्या, जागतिक दर्जाचे वैशिष्टयपूर्ण कार्य स्मारकाच्या माध्यमातून व्हावे या दृष्टिकोनातून चरखागृह, मेटल स्कॅ्रपमधून शिल्प निर्माण करण्यात आले आहे.

टॅग्स :Vinoba Bhaveविनोबा भावेMahatma Gandhiमहात्मा गांधी