शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी आलेल्या मळणी यंत्रासह कृषी साहित्य भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना विशिष्ट अनुदानावर वाटण्यासाठी कृषी विभागाकडे त्यावेळी थ्रेशर मशीन (मळणी यंत्र) आले. हे मळणी यंत्र निरुपयोगी असल्याने शेतकऱ्यांनी त्यावेळी ते घेतले नाही. कालांतराने उघड्यावर पडून असलेले हे साहित्य पाण्या-पावसात भंगार झाले. या मळणी यंत्रणासह ट्रॅक्टर व इतर साहित्यही तेथे पडून आहे. शासनाने हे निरूपयोगी साहित्य भंगारात विकण्याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे हे साहित्य उघडयावर भंगारस्थितीत पडून आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची डोळेझाक : तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारात सुमारे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी आलेले कृषी साहित्य भंगारात धुळखात पडून आहे. या यंत्राचा शेतकºयांना कवडीचाही फायदा झाला नसून मळणी यंत्र, ट्रॅक्टर व इतर साहित्य भंगार झाल्याचे चित्र आहे. मात्र, याकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांना विशिष्ट अनुदानावर वाटण्यासाठी कृषी विभागाकडे त्यावेळी थ्रेशर मशीन (मळणी यंत्र) आले. हे मळणी यंत्र निरुपयोगी असल्याने शेतकऱ्यांनी त्यावेळी ते घेतले नाही. कालांतराने उघड्यावर पडून असलेले हे साहित्य पाण्या-पावसात भंगार झाले.या मळणी यंत्रणासह ट्रॅक्टर व इतर साहित्यही तेथे पडून आहे. शासनाने हे निरूपयोगी साहित्य भंगारात विकण्याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे हे साहित्य उघडयावर भंगारस्थितीत पडून आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन भंगार विकल्यास या परिसराला मोकळा श्वास घेता येईल. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरजतालुका कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत जीर्ण झाली आहे. ही इमारत नव्याने बांधण्यासाठी यापूर्वी २० लाखांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, ते काम पूर्णत्त्वास गेले नाही. इमारत बांधकामासाठी मोठ्या निधीची गरज आहे. संपूर्ण तालुक्याचा कार्यभार पाहणाऱ्या या महत्त्वपूर्ण कार्यालयाची सर्व सोयीनियुक्त सुसज्ज इमारत बांधण्याची आवश्यकता आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधीने सामुहिकपणे सकारात्मक प्रयत्न केल्यास ही इमारत लवकरच बांधण्यात येऊ शकते.तालुक्याचा कारभार तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून चालतो. अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी ही इमारत जीर्ण झाल्याने नव्या इमारतीची गरज आहे. पण, इमारत जुनी असली तरी आमचे कामकाज नियमीत सुरू आहे. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन आम्ही विकासात्मक योजनांची त्यांना माहिती देत असतो.- राधिका बैरागी, तालुका कृषी अधिकारी, सेलू.

टॅग्स :agricultureशेती