शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विज्ञानाने जग जोडले, पण माणूस नाही

By admin | Updated: October 11, 2014 23:12 IST

महात्मा गांधी व विनोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गीताई मंदिरात पुज्य विनोबाजींनी गीताई मंदिराचे उद्घाटन केले. ३४ वर्षांपासून सातत्याने ही परंपरा सुरू आहे. ३५ व्या वर्धापन दिनाच्या

रामचंद्र देखणे : गीताई मंदिराचा वर्धापन दिनवर्धा : महात्मा गांधी व विनोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गीताई मंदिरात पुज्य विनोबाजींनी गीताई मंदिराचे उद्घाटन केले. ३४ वर्षांपासून सातत्याने ही परंपरा सुरू आहे. ३५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हजारो मुलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला. यावेळी संत साहित्याचे व्यासंगी पुणे येथील विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी गांधी विचार परिषदेचे निदेशक भरत महोदय होते.यावेळी डॉ. देखणे म्हणाले, माणसाला चंद्र, मंगळावर जाता आले व विज्ञानाने संपूर्ण जग जोडता येते हे सिद्ध झाले; परंतु माणूस अजूनही जोडता आला नाही. याची खंत व्यक्त करून अध्यात्म व शिक्षणामुळे माणूस जोडण्याकरिता आपण कमी पडतो. याला अनुसरून एक उदाहरण आपल्या भाषणातून मुलांना सांगताना डॉ. देखणे म्हणाले, मुलाला वडिलांनी जगाच्या नकाशाचे चित्र दिले व त्याचा सखोल अभ्यास करावयास सांगितले. मुलाने खूप प्रयत्न केला परंतु शेवटी कंटाळून नकाशा फाडून कचऱ्याच्या टोपलीत टाकला. वडिलांनी, नकाशाच्या अभ्यासाविषयी विचारले असता त्यांना उत्तर न देता फाडलेल्या नकाशाचे तुकडे त्यांच्यापुढे ठेवले, वडिलांनी रागावून तो संपूर्ण नकाशा व्यवस्थित करण्यास सांगितले. मुलाने प्रयत्न करून नकाशाच्या पाठीमागे असलेल्या एका आकृतीला जुळवून नकाशा पूर्वीसारखा वडीलांसमोर ठेवला. वडीलांनी विचारले नकाशा फाडल्यानंतर हे कसे शक्य झाले? मुलगा म्हणाला मी नकाशाच्या मागे चित्रित असलेला माणूस जोडला त्यामुळे जगाचा नकाशा सहजच तयार झाला. अशा पे्ररणादायी गोष्टीतून मार्गदर्शन केले. गीतेची निर्मिती ही विनोबाजीचे वास्तव्य धुळ्याच्या तुरुंगात असताना झाली. जमनालाल बजाज, ऋषभदास राका यांच्या आग्रहानी विनोबाजी प्रवचन करीत असत. त्यांचे १८ प्रवचन मातृहृदयी साने गुरूजींनी अक्षर नी अक्षर लिहून काढले. ही गीतेवरील विनोबांची सर्वोत्कृष्ट कृती आहे. वर्धा शहरातील गीताई मंदिर हे एक वैशिष्टपूर्ण मंदिर आहे.वर्षभर गीताईच्या कार्यात सहभागी शिक्षक व शिक्षिकाचा सूतमाला, शाल व श्रीफळ देऊन गौरव केला. यात यशवंत विद्यालय सेवाग्रामचे सुदाम लांबट, महिलाश्रम बुनियादीच्या संध्या केवलिया, दुष्यंत कांबळे, रत्नीबाई विद्यालयाच्या सुषमा पाखरे, न्यू इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य विजय व्यास, कस्तुरबा विद्यामंदिर सेवाग्राम येथील लक्ष्मी रेड्डी, सुशील हिंमतसिंगका विद्यालयाच्या ज्योती कुटे, कस्तुरबा विद्यालय, कारंजाच्या इंदिरा काळभूत, मांडव्याच्या बेबीताई पेटकर आदींचा समावेश आहे. संयोजक प्राचार्य अशोक मेहरे यांनी प्रास्ताविक केले.(स्थानिक प्रतिनिधी)