शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

विज्ञानाने जग जोडले, पण माणूस नाही

By admin | Updated: October 11, 2014 23:12 IST

महात्मा गांधी व विनोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गीताई मंदिरात पुज्य विनोबाजींनी गीताई मंदिराचे उद्घाटन केले. ३४ वर्षांपासून सातत्याने ही परंपरा सुरू आहे. ३५ व्या वर्धापन दिनाच्या

रामचंद्र देखणे : गीताई मंदिराचा वर्धापन दिनवर्धा : महात्मा गांधी व विनोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गीताई मंदिरात पुज्य विनोबाजींनी गीताई मंदिराचे उद्घाटन केले. ३४ वर्षांपासून सातत्याने ही परंपरा सुरू आहे. ३५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हजारो मुलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला. यावेळी संत साहित्याचे व्यासंगी पुणे येथील विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी गांधी विचार परिषदेचे निदेशक भरत महोदय होते.यावेळी डॉ. देखणे म्हणाले, माणसाला चंद्र, मंगळावर जाता आले व विज्ञानाने संपूर्ण जग जोडता येते हे सिद्ध झाले; परंतु माणूस अजूनही जोडता आला नाही. याची खंत व्यक्त करून अध्यात्म व शिक्षणामुळे माणूस जोडण्याकरिता आपण कमी पडतो. याला अनुसरून एक उदाहरण आपल्या भाषणातून मुलांना सांगताना डॉ. देखणे म्हणाले, मुलाला वडिलांनी जगाच्या नकाशाचे चित्र दिले व त्याचा सखोल अभ्यास करावयास सांगितले. मुलाने खूप प्रयत्न केला परंतु शेवटी कंटाळून नकाशा फाडून कचऱ्याच्या टोपलीत टाकला. वडिलांनी, नकाशाच्या अभ्यासाविषयी विचारले असता त्यांना उत्तर न देता फाडलेल्या नकाशाचे तुकडे त्यांच्यापुढे ठेवले, वडिलांनी रागावून तो संपूर्ण नकाशा व्यवस्थित करण्यास सांगितले. मुलाने प्रयत्न करून नकाशाच्या पाठीमागे असलेल्या एका आकृतीला जुळवून नकाशा पूर्वीसारखा वडीलांसमोर ठेवला. वडीलांनी विचारले नकाशा फाडल्यानंतर हे कसे शक्य झाले? मुलगा म्हणाला मी नकाशाच्या मागे चित्रित असलेला माणूस जोडला त्यामुळे जगाचा नकाशा सहजच तयार झाला. अशा पे्ररणादायी गोष्टीतून मार्गदर्शन केले. गीतेची निर्मिती ही विनोबाजीचे वास्तव्य धुळ्याच्या तुरुंगात असताना झाली. जमनालाल बजाज, ऋषभदास राका यांच्या आग्रहानी विनोबाजी प्रवचन करीत असत. त्यांचे १८ प्रवचन मातृहृदयी साने गुरूजींनी अक्षर नी अक्षर लिहून काढले. ही गीतेवरील विनोबांची सर्वोत्कृष्ट कृती आहे. वर्धा शहरातील गीताई मंदिर हे एक वैशिष्टपूर्ण मंदिर आहे.वर्षभर गीताईच्या कार्यात सहभागी शिक्षक व शिक्षिकाचा सूतमाला, शाल व श्रीफळ देऊन गौरव केला. यात यशवंत विद्यालय सेवाग्रामचे सुदाम लांबट, महिलाश्रम बुनियादीच्या संध्या केवलिया, दुष्यंत कांबळे, रत्नीबाई विद्यालयाच्या सुषमा पाखरे, न्यू इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य विजय व्यास, कस्तुरबा विद्यामंदिर सेवाग्राम येथील लक्ष्मी रेड्डी, सुशील हिंमतसिंगका विद्यालयाच्या ज्योती कुटे, कस्तुरबा विद्यालय, कारंजाच्या इंदिरा काळभूत, मांडव्याच्या बेबीताई पेटकर आदींचा समावेश आहे. संयोजक प्राचार्य अशोक मेहरे यांनी प्रास्ताविक केले.(स्थानिक प्रतिनिधी)