शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

शालेय मैदान बनले मद्यपींचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:12 IST

शाळा हे संस्कारांचे केंद्र असते. शाळेच्या मैदानावर खेळाडू तयार होतात. मात्र ज्या शाळेच्या मैदानावर मद्याच्या शिश्या आणि तत्सम साहित्य आढळत असेल तर तेथील विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.

ठळक मुद्देपोलिसांचे अभय : विद्यार्थ्यांसह शिक्षकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शाळा हे संस्कारांचे केंद्र असते. शाळेच्या मैदानावर खेळाडू तयार होतात. मात्र ज्या शाळेच्या मैदानावर मद्याच्या शिश्या आणि तत्सम साहित्य आढळत असेल तर तेथील विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. शाळा सुटल्यावर हमदापूर येथील शाळेचे मैदान मद्यपींचा ठिय्या बनले असते. शिक्षकांनी वारंवार तक्रार करूनही या मद्यपींचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना अपयश आले.हमदापूर ही परिसरातील गावांची मुख्य बाजारपेठ आहे. शाळेचे येथे मोठे मैदान असून रस्त्याच्या बाजूलाच चहा, नाश्ताच्या टपऱ्या आहेत. येथे प्रवाशांची कायम गर्दी असते. शाळेचे मैदान सुद्धा दिवसा व सायंकाळी विद्यार्थी व खेळाडूंनी भरलेले असते. सायंकाळी खेळाडूंचा सराव झाल्यानंतर मैदान रिकामे होते. यानंतर आंबटशौकीनांचा येथे ठिय्या असतो. थंडीच्या काळात तर मद्यपींची येथे मैफल रंगते. मद्य रिचविल्यानंतर वस्तू उचलून ठेवण्याचे भान सुद्धा त्यांना नसते. दुसऱ्या दिवशी मात्र विद्यार्थ्यांची पंचाईत होते. ठिकठिकाणी रिकामे पॅकेट्स, कागद, शिश्या, प्लास्टिक ग्लास पडून असतात. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक या वस्तुंचा परिचय होतो. त्यांचा जिज्ञासा वाढताना दिसते, बरेचदा काचाच्या शिश्या फुटलेल्या असतात. त्यामुळे खेळताना विद्यार्थी जखमी होण्याचा धोका असतो. खेळाडूंना अनेकदा काचेचे तुकडे उचलावे लागतात.शाळेत शिक्षण, खेळ, कला याचे ज्ञान मिळावे मात्र मैदानावरील हा प्रकार त्यांना बालवयातच वाममार्गाला लावणारा ठरतो अशी तक्रार पालक करतात. यावर कोणाचाच वचक नसल्याचे दिसते.विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार होण्याची भीतीशाळा, महाविद्यालयांमध्ये सध्या व्यसनमुक्तीचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात असले तरी विद्येचे मंदिर असे संबोधल्या जाणाऱ्या शाळा परिसराच सध्या काही समाजकंटक दारू ढोसण्यासाठी बसत असल्याने व दारूच्या रिकाम्या शिश्या व इतर साहित्य तेथेच टाकून जात असल्याने विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार होण्याची भीती बळावत आहे. आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचे सुजान नागरिक असल्याने त्यांच्यावर कुठलेही वाईट संस्कार होऊ नयेत या हेतूने सुजान ग्रामस्थांनी एकत्र येत शाळा परिसरात दारूपिणाऱ्या मद्यपींना धडा शिकविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. शिवाय गावातील लोकप्रतिनिधींनीही एकत्र येत याकडे लक्ष देण्याची गरज आहे.