शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

शालेय मैदान बनले मद्यपींचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:12 IST

शाळा हे संस्कारांचे केंद्र असते. शाळेच्या मैदानावर खेळाडू तयार होतात. मात्र ज्या शाळेच्या मैदानावर मद्याच्या शिश्या आणि तत्सम साहित्य आढळत असेल तर तेथील विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.

ठळक मुद्देपोलिसांचे अभय : विद्यार्थ्यांसह शिक्षकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शाळा हे संस्कारांचे केंद्र असते. शाळेच्या मैदानावर खेळाडू तयार होतात. मात्र ज्या शाळेच्या मैदानावर मद्याच्या शिश्या आणि तत्सम साहित्य आढळत असेल तर तेथील विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. शाळा सुटल्यावर हमदापूर येथील शाळेचे मैदान मद्यपींचा ठिय्या बनले असते. शिक्षकांनी वारंवार तक्रार करूनही या मद्यपींचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना अपयश आले.हमदापूर ही परिसरातील गावांची मुख्य बाजारपेठ आहे. शाळेचे येथे मोठे मैदान असून रस्त्याच्या बाजूलाच चहा, नाश्ताच्या टपऱ्या आहेत. येथे प्रवाशांची कायम गर्दी असते. शाळेचे मैदान सुद्धा दिवसा व सायंकाळी विद्यार्थी व खेळाडूंनी भरलेले असते. सायंकाळी खेळाडूंचा सराव झाल्यानंतर मैदान रिकामे होते. यानंतर आंबटशौकीनांचा येथे ठिय्या असतो. थंडीच्या काळात तर मद्यपींची येथे मैफल रंगते. मद्य रिचविल्यानंतर वस्तू उचलून ठेवण्याचे भान सुद्धा त्यांना नसते. दुसऱ्या दिवशी मात्र विद्यार्थ्यांची पंचाईत होते. ठिकठिकाणी रिकामे पॅकेट्स, कागद, शिश्या, प्लास्टिक ग्लास पडून असतात. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक या वस्तुंचा परिचय होतो. त्यांचा जिज्ञासा वाढताना दिसते, बरेचदा काचाच्या शिश्या फुटलेल्या असतात. त्यामुळे खेळताना विद्यार्थी जखमी होण्याचा धोका असतो. खेळाडूंना अनेकदा काचेचे तुकडे उचलावे लागतात.शाळेत शिक्षण, खेळ, कला याचे ज्ञान मिळावे मात्र मैदानावरील हा प्रकार त्यांना बालवयातच वाममार्गाला लावणारा ठरतो अशी तक्रार पालक करतात. यावर कोणाचाच वचक नसल्याचे दिसते.विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार होण्याची भीतीशाळा, महाविद्यालयांमध्ये सध्या व्यसनमुक्तीचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात असले तरी विद्येचे मंदिर असे संबोधल्या जाणाऱ्या शाळा परिसराच सध्या काही समाजकंटक दारू ढोसण्यासाठी बसत असल्याने व दारूच्या रिकाम्या शिश्या व इतर साहित्य तेथेच टाकून जात असल्याने विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार होण्याची भीती बळावत आहे. आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचे सुजान नागरिक असल्याने त्यांच्यावर कुठलेही वाईट संस्कार होऊ नयेत या हेतूने सुजान ग्रामस्थांनी एकत्र येत शाळा परिसरात दारूपिणाऱ्या मद्यपींना धडा शिकविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. शिवाय गावातील लोकप्रतिनिधींनीही एकत्र येत याकडे लक्ष देण्याची गरज आहे.