शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शाळेच्या इमारती संरक्षक भिंतीविना

By admin | Updated: December 31, 2014 23:29 IST

गत १० वर्षात जिल्हा परिषद मार्फत राज्य शासनाद्वारे सर्व शिक्षा अभियान उपक्रम राबविण्यात आले. यांतर्गत नवीन सुसज्ज इमारतीत शाळा सुरू झाल्या असल्या तरी तालुक्यातील बहुतांश

सेलू : गत १० वर्षात जिल्हा परिषद मार्फत राज्य शासनाद्वारे सर्व शिक्षा अभियान उपक्रम राबविण्यात आले. यांतर्गत नवीन सुसज्ज इमारतीत शाळा सुरू झाल्या असल्या तरी तालुक्यातील बहुतांश शाळांना अजूनही संरक्षक भिंतच नसल्याचे दिसून येत आहे. घोराड येथील कन्या शाळेला संरक्षक भिंत नसल्याने बाभळीची झाडे संरक्षकाचे काम करीत आहे.भिंत नसल्याने रस्त्याच्या कडेला व परिसरात सरपणाचे ढीग लावले जात आहे. मोही येथील शाळेला बोरधरण रस्त्यालगत एकच संरक्षक भिंत आहे. संपूर्ण परिसराला भिंतीची गरज आहे. परिसरातच लहान मुले येथेच शौचालयास बसत असल्याने दुर्गंधीचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. रेहकी येथील शाळेला वर्दळीच्या रस्त्याकडून तारांचे कुंपण असले तरी वर्षभरापूर्वी प. स. चे तत्कालीन उपसभापती उल्हास रणनवरे यांनी शाळेच्या समारंभात येथील संरक्षक भिंतीकरिता २ लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले. परंतु अजूनही निधी मिळाला नसल्याचे बोलल्या जात आहे. जूनगड, ब्राह्मणी आदी शाळेच्या इमारतीसुद्धा सुरक्षा भिंतीविनाच असल्याने शाळा सुटल्यानंतर या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत आहे. जि.प. व प.स. च्या सदस्यांनी या कामासाठी गत काही वर्षापासून लक्षच दिले नसल्याची ओरड पालक व ग्रामस्थ करीत आहे. शाळेच्या संरक्षक भिंतीकडे आता खरोखरच लोकप्रतिनिधी लक्ष देणार काय याकडे पालकांच्या नजर लागल्या आहे.(शहर प्रतिनिधी).