शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शाळेच्या इमारती संरक्षक भिंतीविना

By admin | Updated: December 31, 2014 23:29 IST

गत १० वर्षात जिल्हा परिषद मार्फत राज्य शासनाद्वारे सर्व शिक्षा अभियान उपक्रम राबविण्यात आले. यांतर्गत नवीन सुसज्ज इमारतीत शाळा सुरू झाल्या असल्या तरी तालुक्यातील बहुतांश

सेलू : गत १० वर्षात जिल्हा परिषद मार्फत राज्य शासनाद्वारे सर्व शिक्षा अभियान उपक्रम राबविण्यात आले. यांतर्गत नवीन सुसज्ज इमारतीत शाळा सुरू झाल्या असल्या तरी तालुक्यातील बहुतांश शाळांना अजूनही संरक्षक भिंतच नसल्याचे दिसून येत आहे. घोराड येथील कन्या शाळेला संरक्षक भिंत नसल्याने बाभळीची झाडे संरक्षकाचे काम करीत आहे.भिंत नसल्याने रस्त्याच्या कडेला व परिसरात सरपणाचे ढीग लावले जात आहे. मोही येथील शाळेला बोरधरण रस्त्यालगत एकच संरक्षक भिंत आहे. संपूर्ण परिसराला भिंतीची गरज आहे. परिसरातच लहान मुले येथेच शौचालयास बसत असल्याने दुर्गंधीचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. रेहकी येथील शाळेला वर्दळीच्या रस्त्याकडून तारांचे कुंपण असले तरी वर्षभरापूर्वी प. स. चे तत्कालीन उपसभापती उल्हास रणनवरे यांनी शाळेच्या समारंभात येथील संरक्षक भिंतीकरिता २ लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले. परंतु अजूनही निधी मिळाला नसल्याचे बोलल्या जात आहे. जूनगड, ब्राह्मणी आदी शाळेच्या इमारतीसुद्धा सुरक्षा भिंतीविनाच असल्याने शाळा सुटल्यानंतर या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत आहे. जि.प. व प.स. च्या सदस्यांनी या कामासाठी गत काही वर्षापासून लक्षच दिले नसल्याची ओरड पालक व ग्रामस्थ करीत आहे. शाळेच्या संरक्षक भिंतीकडे आता खरोखरच लोकप्रतिनिधी लक्ष देणार काय याकडे पालकांच्या नजर लागल्या आहे.(शहर प्रतिनिधी).