शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

आपल्या मुलांचं शिक्षण वाचवा

By admin | Updated: December 1, 2014 22:58 IST

खासगीकरणातून महागड्या झालेल्या शिक्षणामुळे सामान्य माणसाच्या उत्पन्नातून २५ टक्के खर्च शिक्षणावर होतो़ शिक्षण हे त्याच्या अवाक्याबाहेर होण्याची प्रक्रिया तीव्र झाली असताना सत्ताधारी

शिक्षण जागर सभेचा सूर : अ़भा़ शिक्षा अधिकार मंचाची यात्रावर्धा : खासगीकरणातून महागड्या झालेल्या शिक्षणामुळे सामान्य माणसाच्या उत्पन्नातून २५ टक्के खर्च शिक्षणावर होतो़ शिक्षण हे त्याच्या अवाक्याबाहेर होण्याची प्रक्रिया तीव्र झाली असताना सत्ताधारी धर्मनिरपेक्ष मुल्यांना छेद देणारा विषमतापोषक अभ्यासक्रम लागू करण्यात व समायोजनाचा खेळ करण्यात गुंग आहेत. अशा स्थितीत आपल्या मुलांचं शिक्षण व भवितव्य वाचविण्यासाठी सर्वांनी आपल्यापरीने संघर्षरत होणे गरजेचे असल्याचा सूर शिक्षण जागर सभेतून उमटला.भारतातील १०८ संघटनांच्या सहभागातून गठित अखिल भारतीय शिक्षा अधिकार मंचाद्वारे शिक्षणाचे खासगी व सांप्रदायिकीकरणाच्या विरोधात तसेच समान शाळा पद्धतीची मागणी करीत शिक्षण संघर्ष यात्रा भारतभर फिरत आहे. ही यात्रा वर्धेत आली असताना तिचे रूपांतर शिक्षण जागर सभेत झाले. प्रा. दत्तानंद इंगोले यांच्या अध्यक्षतेत घांगळे लॉन येथे झालेल्या सभेत यात्रेचे विदर्भ संयोजक रमेश बिजेकर, नुतन माळवी, राजकुमार मून, नंदकुमार धाबर्डे, अरुण हर्षबोधी, हिमांशू खोब्रागडे आदी सहभागी झाले होते. यावेळी भूमिका मांडताना बिजेकर यांनी प्राचीन ते आजच्या शिक्षण सक्तीच्या कायद्यापर्यंतचा आढावा घेत भारतीय अभ्यासक्रमांची रचना व आशय पूर्णपणे विषमतावादी असल्याचे सांगितले़ ० ते ६ वयोगट कायद्यातून वगळण्यामागील अर्थकारण स्पष्ट केले. एकट्या मुंबईत खासगी नर्सरी शाळांचा व्यवसाय हा दोन हजार कोटींचा असल्याचे ते म्हणाले. शिक्षण वास्तव स्पष्ट करताना प्रा. मून यांनी कोठारी आयोगानुसार शिक्षण खर्च सहा टक्के असायला हवा; पण तो केवळ दोन टक्केच आहे. पहिली ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी गळती ७० टक्के एवढी भीषण असल्याचे सांगितले. हिमांशू यांनी परदेशी व भारतीय शिक्षणातील मुलभूत फरक स्पष्ट केला. प्रारंभी शैलेश जनबंधू यांनी कविता वाचली. संचालन श्रीराम मेंढे यांनी केले तर आभार मीरा इंगोले यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)