शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाच्या पतीकडून सदस्याला मारहाण

By admin | Updated: June 24, 2014 00:02 IST

समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच महिलेच्या पतीने ग्रा.पं. सदस्यास मारहाण केली. या विरोधात तक्रार दाखल केली असता अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.

वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच महिलेच्या पतीने ग्रा.पं. सदस्यास मारहाण केली. या विरोधात तक्रार दाखल केली असता अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. यानंतर ग्रा. पं. सदस्यास शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याने जीवितास धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याची औपचारिकताच पूर्ण केल्याने अद्याप कारवाई झाली नसल्याने ग्रा. पं. सदस्य रोशन लामसोंगे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले.निवेदनानुसार, जाम येथे रिना जांगडेकर या सरपंच पदावर असून तिचा पती अमोल जांगडेकर हा पत्नीच्या सरपंचपदाचा गैरवापर करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. अमोल आधी रॉकेलचा धंदा करीत होता. त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहे. ९ जून रोजी १२.३० वाजता ग्रा. पं. कार्यालयात वार्ड नं. १ मध्ये पाण्याची समस्या असल्यामुळे ग्रा.पं. सदस्य रोशन लामसोंगे हे सचिवाला भेटायला गेले. यावेळी अमोलने आपण सरपंच असल्याचे म्हणत सचिवाला कशाला विचारता, जे विचारायचे आहे ते मला विचारा असे म्हणत एकाऐकी रोशनला लाथाबुक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यात त्याच्या डोळ्याला जबर जखम झाली. हा प्रकार सचिवासमोर घडला असताना त्यांनीही कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रा.प.सदस्य लामसोंगे यांनी घटनेची तक्रार ९ जून रोजी समुद्रपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी जांगडेकर विरुद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला. व अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असल्याने आपणास कोर्टात जाण्याची समज देण्यात येते. अशी एन.सी. पावती पोलिसांनी दिली. परंतु अद्यापही जांगडेकर विरोधात कठोर पावले उचलण्यात आलेली नाही. त्यामुळे पत्नीच्या सरपंचपदाचा पदाचा गैरवापर करीत असलेल्या अमोल जांगडेकरविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी लामसोंगे यांनी केली आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी निवेदन सादर करण्यात आले आहे. तसेच निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी एन. नवीन सोना आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय चौधरी यांना देण्यात आली आहे. पदाचा असा गैरवापर करीत असलेल्या गुंंड प्रवृतीच्या इसमावर कठोर पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)