शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

पाण्याअभावी रोपटे मरणासन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 22:24 IST

शहरातील सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारत परिसरात मोठा गाजावाजा करीत विविध प्रजातींची रोपटे लावण्यात आली;पण सध्या त्यांना साधे पाणी देण्याकडेही दुर्लक्ष केल्या जात असल्याने ही रोपटे शेवटची घटीका मोजत आहेत.

ठळक मुद्देवृक्षसंवर्धनाच्या उद्देशाला खो : प्रशासकीय इमारत परिसरातील प्रकार

आॅनलाईन लोकमतवर्धा : शहरातील सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारत परिसरात मोठा गाजावाजा करीत विविध प्रजातींची रोपटे लावण्यात आली;पण सध्या त्यांना साधे पाणी देण्याकडेही दुर्लक्ष केल्या जात असल्याने ही रोपटे शेवटची घटीका मोजत आहेत. हा प्रकार वृक्षसंवर्धनाच्या उद्देशाला खो देणारा ठरत असल्याने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत त्वरित योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारत परिसरात विविधा केंद्रासह कामगार न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय, जिल्हा भूमी अभिलेख, राज्य उत्पादन शुल्क विभाग आदी कार्यालये आहेत. त्यामुळे कार्यालयीन दिवसांमध्ये येथे जिल्ह्यातील गावागावातून विविध कामानिमित्त येणाºया नागरिकांची गर्दी असते. गत दोन वर्षांपासून वृक्षाचे महत्त्व ओळखून शासनस्तरावरूनही वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोठा गाजावाजा करीत प्रशासकीय इमारत परिसरात विविध प्रजातींची रोपटे लावण्यात आली. परंतु, रोपटे व वृक्ष संवर्धन कठडे लावूनच शासकीय सोपस्कार आटोपण्यात आल्याचे सध्या फेरफटका मारल्यावर दिसून येते.सदर परिसरात लावण्यात आलेली अनेक रोपटे पाण्याअभावी करपल्याचे दिसून येतात. तर काही रोपटे पाण्याअभावी शेवटची घटीका मोजत आहेत. हरित वर्धा या उद्देशालाच या प्रकारामुळे पाठ दाखविल्या जात असल्याने याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी शहरातील वृक्षप्रेमींची आहे.परिसराचे सौंदर्यीकरण केव्हा?प्रशासकीय इमारत परिसर हरितमय करण्यासाठी काही विशिष्ट जागा आरक्षीत करण्यात आली आहे. परंतु, गत अनेक वर्षांपासून तेथे एकही वृक्ष लावण्यात आले नसल्याचे नागरिक सांगतात. प्रशासकीय इमारत परिसराचे सौंदर्यीकरण केव्हा होणार, असा प्रश्न शहरातील सुजान नागरिकांकडून विचारला जात आहे.हरित वर्धेकडे पाठ४सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारत परिसरात रोपटे पाण्याअभावी करपत आहेत. त्याकडे देखभालीची जबाबदारी असलेल्या कर्मचाºयांचेही दुर्लक्ष होत असल्याने सुंदर व हरित वर्धेच्या उद्देशाकडेच पाठ दाखविल्या जात आहे. त्यामुळे याकडे लक्ष देत कार्यवाहीची गरज आहे.