शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
3
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
4
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
5
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
6
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
8
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
9
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
10
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
11
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
12
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
13
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
14
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
15
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
16
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
17
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
18
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
19
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
20
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?

बालकांचे चारित्र्य घडविण्याचे काम साने गुरुजींनी केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:34 IST

गांधी, विनोबाजींचे साने गुरुजी शिष्य होते. साने गुरूजी मुलांचेच नव्हे तर सर्वांचे होते. कथारूपाने गुरुजींना सर्वांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असून बालकांचे चारित्र्य घडविण्याचे काम गुरुजींनी केले. यामुळे कार्यकर्ता प्रशिक्षण व प्रकल्प तयार करण्याचे आवाहन कथामालेचे अध्यक्ष अवधूत म्हमाणे यांनी केले.

ठळक मुद्देअवधूत म्हमाणे : साने गुरूजी कथामाला अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : गांधी, विनोबाजींचे साने गुरुजी शिष्य होते. साने गुरूजी मुलांचेच नव्हे तर सर्वांचे होते. कथारूपाने गुरुजींना सर्वांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असून बालकांचे चारित्र्य घडविण्याचे काम गुरुजींनी केले. यामुळे कार्यकर्ता प्रशिक्षण व प्रकल्प तयार करण्याचे आवाहन कथामालेचे अध्यक्ष अवधूत म्हमाणे यांनी केले.गांधी १५० मध्ये साने गुरुजी कथामालेचे अधिवेशन आयोजित केले आहे. यावेळी ते बोलत होते. अ.भा. साने गुरूजी कथामाला कार्यकर्ता प्रशिक्षणाचा समारोप शुक्रवारी झाला. यावेळी अवधूत म्हमाणे, डॉ. उल्हास जाजू, रवींद्र रूख्मिणी पंढरीनाथ व सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष जयवंत मठकर उपस्थित होते.म्हमाणे पूढे म्हणाले की, गुरूजींनी ज्या गोष्टी लिहिल्या, त्या सर्व वैचारिक व प्रेरणादायी आहे. आज त्या सर्व बालक, युवकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. डॉ. जाजू यांनी गांधी विचार व गोष्टी सांगण्याच्या नव्हे तर समजून घेण्याची गरज आहे. पर्यावरणाचा प्रश्न आज निर्माण झाला; पण तो होऊ नये यासाठी गांधीजींनी जो कार्यक्रम दिला, तो समजण्याची गरज आहे, असे सांगितले. रवींद्र रूख्मिनी पंढरीनाथ म्हणाले की, मी साने गुरूजींच्या गोष्टी सांगत असे; पण आज या गोष्टी सांगताना गांधीजींच्या विचारांच्या पे्रमात पडलो. आजही गांधीजींविषयी विष पसरविले जाते. खरा गांधी सांगून अमृत पसरविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. गांधीजींना चरखा, स्वच्छता यात बंदीस्त करण्यात आले. वास्तवात तर गांधी त्यापलीकडे आहे. गांधींना मारण्यासाठी ३२ वर्षांपासून प्रयत्न सुरू होता. गांधीजींनी देशातील सर्व स्तरातील लोकांना जोडले, म्हणून त्या काळी काँग्रेसमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकतेने राहिले. काँग्रेसचा जनाधार वाढला. संघाचा तर स्वातंत्र्य लढाईत कुठेच सहभाग नव्हता. उलट विरोध होता. यातूनच गांधी हत्या झाली. गुरूजींच्या कथा सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. यवतमाळचे बाळ सरोदे यांनी भक्तातील वेगळेपणा पाहिल्यास मूळ पुरूष गांधीजी दिसते. मनातील विरोधात्मक भिंती पाडा, गांधीजी व साने गुरुजींना समजून घ्या, असा आग्रह त्यांनी धरला. प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी तर संचालन डॉ. शोभा बेलखोडे यांनी केले.