शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

बालकांचे चारित्र्य घडविण्याचे काम साने गुरुजींनी केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:34 IST

गांधी, विनोबाजींचे साने गुरुजी शिष्य होते. साने गुरूजी मुलांचेच नव्हे तर सर्वांचे होते. कथारूपाने गुरुजींना सर्वांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असून बालकांचे चारित्र्य घडविण्याचे काम गुरुजींनी केले. यामुळे कार्यकर्ता प्रशिक्षण व प्रकल्प तयार करण्याचे आवाहन कथामालेचे अध्यक्ष अवधूत म्हमाणे यांनी केले.

ठळक मुद्देअवधूत म्हमाणे : साने गुरूजी कथामाला अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : गांधी, विनोबाजींचे साने गुरुजी शिष्य होते. साने गुरूजी मुलांचेच नव्हे तर सर्वांचे होते. कथारूपाने गुरुजींना सर्वांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असून बालकांचे चारित्र्य घडविण्याचे काम गुरुजींनी केले. यामुळे कार्यकर्ता प्रशिक्षण व प्रकल्प तयार करण्याचे आवाहन कथामालेचे अध्यक्ष अवधूत म्हमाणे यांनी केले.गांधी १५० मध्ये साने गुरुजी कथामालेचे अधिवेशन आयोजित केले आहे. यावेळी ते बोलत होते. अ.भा. साने गुरूजी कथामाला कार्यकर्ता प्रशिक्षणाचा समारोप शुक्रवारी झाला. यावेळी अवधूत म्हमाणे, डॉ. उल्हास जाजू, रवींद्र रूख्मिणी पंढरीनाथ व सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष जयवंत मठकर उपस्थित होते.म्हमाणे पूढे म्हणाले की, गुरूजींनी ज्या गोष्टी लिहिल्या, त्या सर्व वैचारिक व प्रेरणादायी आहे. आज त्या सर्व बालक, युवकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. डॉ. जाजू यांनी गांधी विचार व गोष्टी सांगण्याच्या नव्हे तर समजून घेण्याची गरज आहे. पर्यावरणाचा प्रश्न आज निर्माण झाला; पण तो होऊ नये यासाठी गांधीजींनी जो कार्यक्रम दिला, तो समजण्याची गरज आहे, असे सांगितले. रवींद्र रूख्मिनी पंढरीनाथ म्हणाले की, मी साने गुरूजींच्या गोष्टी सांगत असे; पण आज या गोष्टी सांगताना गांधीजींच्या विचारांच्या पे्रमात पडलो. आजही गांधीजींविषयी विष पसरविले जाते. खरा गांधी सांगून अमृत पसरविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. गांधीजींना चरखा, स्वच्छता यात बंदीस्त करण्यात आले. वास्तवात तर गांधी त्यापलीकडे आहे. गांधींना मारण्यासाठी ३२ वर्षांपासून प्रयत्न सुरू होता. गांधीजींनी देशातील सर्व स्तरातील लोकांना जोडले, म्हणून त्या काळी काँग्रेसमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकतेने राहिले. काँग्रेसचा जनाधार वाढला. संघाचा तर स्वातंत्र्य लढाईत कुठेच सहभाग नव्हता. उलट विरोध होता. यातूनच गांधी हत्या झाली. गुरूजींच्या कथा सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. यवतमाळचे बाळ सरोदे यांनी भक्तातील वेगळेपणा पाहिल्यास मूळ पुरूष गांधीजी दिसते. मनातील विरोधात्मक भिंती पाडा, गांधीजी व साने गुरुजींना समजून घ्या, असा आग्रह त्यांनी धरला. प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी तर संचालन डॉ. शोभा बेलखोडे यांनी केले.