शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
3
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
4
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
5
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
6
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
7
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
8
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
9
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
10
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
11
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
12
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
13
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
14
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
15
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
16
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
17
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
18
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
19
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
20
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल

राज्यभरातील वाळूघाट बंदी उठविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 11:31 IST

राज्यभरातील वाळूघाटावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे वाळू घाटधारक, गवंडी कामगार आणि शासनही अडचणीत सापडले होते. अखेर ६ जून रोजी या याचिकेवर सुनावणी झाली असून ही याचिका खारीज करण्यात आली.

ठळक मुद्देन्यायालयात याचिका खारीजअटी व शर्तीच्या अधीन राहून करावा लागेल उपसा

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याने वर्षभारानंतर सुरु झालेल्या राज्यभरातील वाळूघाटावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे वाळू घाटधारक, गवंडी कामगार आणि शासनही अडचणीत सापडले होते. अखेर ६ जून रोजी या याचिकेवर सुनावणी झाली असून ही याचिका खारीज करण्यात आली. त्यामुळे ही वाळुघाट बंदी उठल्याने आता शासकीय कामासह इतरही बांधकामांना गती येणार असल्याने घाटधारकांचीही चिंता मिटली. पण, अटी व शर्तीचा ससेमिरा कायम आहे.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २०१८ मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आल्याने राज्यभरातील वाळूघाट लिलावावर बंदी घालण्यात आली. परिणामी, वर्षभर सर्व घटकांवर याचा परिणाम होऊन अनेकांवर उपसमारीचीही वेळ आली. चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक होत असल्याने सर्वसामान्यांना वाळू खरेदी करणे अवाक्याच्या बाहेर होते. त्यामुळे अनेकांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. ७ डिसेंबर २०१८ च्या आदेशानुसार ही बंदी उठवून २०१८-१९ करिता वाळूघाट लिलावाला मुभा देण्यात आली. तसेच ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत वाळूघाटांचे लिलाव करण्याचीही न्यायालयाने अनुमती दिली होती. यातून शासनाला कोट्यवधीचा महसुल मिळाला. लोकसभेची आचार संहिता संपताच विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी मंजूर केलेली कामे पुर्ण करण्याच्या तयारीत असतानाच पुन्हा याचिका दाखल केल्याने लिलाव झालेल्या वाळुघाटावरुन उपसा करण्यास स्थगिती दिली. यामुळे वाळूअभावी विकास कामांना खिळ बसली तसेच ज्यांनी घाट खरेदी केले तेही अडचणीत आले. या याचिकेवर ६ जूनला सुनावणी होऊन ही याचिका खारीज करुन स्थगिती हटविली आहे. तसेच १ नोव्हेंबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत वाळुघाट लिलाव करण्यासाठी अनुमती दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील इतरही वाळुघाटांचे लिलाव होणार असून शासनाच्या महसुलात वाढ होण्यासोबतच वाळूही उपलब्ध होणार आहे.

नवीन वाळू धोरण लांबणीवर२०१८ मध्ये दाखल झालेल्या याचिकेसंदर्भात ३ व १७ आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या आदेशावरून २०१८-१९ च्या वाळू लिलावाला स्थगिती दिली होती. मात्र, ७ डिसेंबर २०१८ रोजीच्या सुनावणीत शासनाच्यावतीने नवीन वाळू निर्गती धोरण तयार करून मे २०१९ च्या पहिल्या आठवड्यात उच्च न्यायालयात दाखल करण्याचे आश्वासित केले होते. याच पार्श्वभूमीवर वाळूघाट लिलाव करण्याची परवानगी देण्यात आली. पण, पुन्हा याचिका दाखल केल्याने वाळू उपस्याला स्थगिती दिली होती. त्यावर सुरुवातील ४ जून रोजी सुनावणी होणार असल्याचे यादरम्यान शासनाने दिलेल्या शब्दानुसार छत्तीसगड आणि मध्यप्रदेशप्रमाणे नवीन वाळू निर्गती धोरण जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र ६ जूनला झालेल्या सुनावणीत ही स्थगिती उठविण्यात आली. तसेच १ आॅक्टोबर २०१९ नंतर नवीन धोरणानुसार वाळूघाटाचे लिलाव होईल.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील याचिकेमुळे लिलाव झालेल्या वाळू घाटातून उपसा करण्यास स्थगिती देण्यात आली होती. ६ जूनच्या आदेशानुसार ही स्थगिती उठविण्यात आली आहे. तसेच ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील वाळूघाटांचा लिलाव करण्याचेही आदेश दिले आहे. त्यामुळे आता बंदीच्या काळात घाटाची परिस्थिती काय झाली याचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.-डॉ. इम्रान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा.

या अर्टी व शर्ती आहे कायमन्यायालयाच्या आदेशानुसार वाळूघाटात सिसीटिव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे. तसेच मोठी वाहने घाटात न टाकता लहान वाहनांने डेपोत जमा करायची आहे. हा डेपो मुख्य मार्गापासून तर वाळूघाटदरम्यानच्या तयार करायचा आहे. वाळूचा उपसाकरण्यासाठी बोट, पोकलॅण्ड अशा कोणत्याही यंत्राचा वापर करता येणार नाही. त्यामुळे वाळूघाटधारकांचा वाळू उपश्याचा प्रश्न सुटला असला तरी अर्टी व शर्तीची पुर्तता करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे.

टॅग्स :Governmentसरकार