शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग पूर्ण; आता वाहतुकीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 20:50 IST

हिंंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे वर्धा जिल्ह्यातील ५८ किमीचे काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्दे५८ किमीचा मार्ग, २ हजार ७६२ कोटींचा खर्च

वर्धा : हिंंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे वर्धा जिल्ह्यातील ५८ किमीचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाकरिता तीन तालुक्यांतील ७८२ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून, सर्व कामावर २ हजार ७६२ कोटींचा खर्च झाला आहे. महामार्ग पूर्ण झाला असून, केवळ वाहतुकीची प्रतीक्षा आहे.

समृद्धी महामार्गामुळे नागरिक मुंबई व नागपूर या महानगरांना जोडले जाणार आहेत. वर्ध्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यांतील ३४ गावांमधून हा महामार्ग गेला आहे. जिल्ह्यातून गेलेल्या या महामार्गाची लांबी ५८ किमी, तर रुंदी १२० मीटर असून, सहापदरी हा मार्ग आहे. ५ मोठ्या आणि २७ लहान पुलांसह विनाअडथळा वाहतूक होण्याकरिता ९ उड्डाणपूल व ३४ भुयारी मार्ग निर्माण करण्यात आले. त्यामध्ये वाहनांसाठी २२, तर पादचाऱ्यांकरिता १२ भुयारी मार्गांचा समावेश आहे. दोन रेल्वे उड्डाणपूलही उभारण्यात आले आहेत. येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेसही देण्यात आले आहेत. महामार्गाच्या वाहनांमुळे वन्यप्राणी विचलित होऊ नये, यासाठी दोन ठिकाणी उन्नत मार्ग राहणार आहेत.

दोन ठिकाणी उभारणार नवनगरे

समृद्धी महामार्गाकरिता तीन तालुक्यांतील जमिनी संपादित करण्यात आल्या. त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा आल्याने त्यांच्या जीवनमानातही बदल झाला आहे. यासोबतच इतरही शेतजमिनीचे भाव वाढले असून, गावेही महामार्गाशी जोडली गेली आहेत. या महामार्गालगत दोन ठिकाणी नवनगरे उभारण्यात येणार असून, त्याकरिता केळझर आणि विरुळ ही गावे निश्चित झाली आहेत. यासोबतच गणेशपूर व रेणकापूर येथे महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता सुविधा केंद्र राहणार आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग