शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग पूर्ण; आता वाहतुकीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 20:50 IST

हिंंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे वर्धा जिल्ह्यातील ५८ किमीचे काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्दे५८ किमीचा मार्ग, २ हजार ७६२ कोटींचा खर्च

वर्धा : हिंंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे वर्धा जिल्ह्यातील ५८ किमीचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाकरिता तीन तालुक्यांतील ७८२ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून, सर्व कामावर २ हजार ७६२ कोटींचा खर्च झाला आहे. महामार्ग पूर्ण झाला असून, केवळ वाहतुकीची प्रतीक्षा आहे.

समृद्धी महामार्गामुळे नागरिक मुंबई व नागपूर या महानगरांना जोडले जाणार आहेत. वर्ध्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यांतील ३४ गावांमधून हा महामार्ग गेला आहे. जिल्ह्यातून गेलेल्या या महामार्गाची लांबी ५८ किमी, तर रुंदी १२० मीटर असून, सहापदरी हा मार्ग आहे. ५ मोठ्या आणि २७ लहान पुलांसह विनाअडथळा वाहतूक होण्याकरिता ९ उड्डाणपूल व ३४ भुयारी मार्ग निर्माण करण्यात आले. त्यामध्ये वाहनांसाठी २२, तर पादचाऱ्यांकरिता १२ भुयारी मार्गांचा समावेश आहे. दोन रेल्वे उड्डाणपूलही उभारण्यात आले आहेत. येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेसही देण्यात आले आहेत. महामार्गाच्या वाहनांमुळे वन्यप्राणी विचलित होऊ नये, यासाठी दोन ठिकाणी उन्नत मार्ग राहणार आहेत.

दोन ठिकाणी उभारणार नवनगरे

समृद्धी महामार्गाकरिता तीन तालुक्यांतील जमिनी संपादित करण्यात आल्या. त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा आल्याने त्यांच्या जीवनमानातही बदल झाला आहे. यासोबतच इतरही शेतजमिनीचे भाव वाढले असून, गावेही महामार्गाशी जोडली गेली आहेत. या महामार्गालगत दोन ठिकाणी नवनगरे उभारण्यात येणार असून, त्याकरिता केळझर आणि विरुळ ही गावे निश्चित झाली आहेत. यासोबतच गणेशपूर व रेणकापूर येथे महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता सुविधा केंद्र राहणार आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग