शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग पूर्ण; आता वाहतुकीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 20:50 IST

हिंंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे वर्धा जिल्ह्यातील ५८ किमीचे काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्दे५८ किमीचा मार्ग, २ हजार ७६२ कोटींचा खर्च

वर्धा : हिंंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे वर्धा जिल्ह्यातील ५८ किमीचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाकरिता तीन तालुक्यांतील ७८२ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून, सर्व कामावर २ हजार ७६२ कोटींचा खर्च झाला आहे. महामार्ग पूर्ण झाला असून, केवळ वाहतुकीची प्रतीक्षा आहे.

समृद्धी महामार्गामुळे नागरिक मुंबई व नागपूर या महानगरांना जोडले जाणार आहेत. वर्ध्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यांतील ३४ गावांमधून हा महामार्ग गेला आहे. जिल्ह्यातून गेलेल्या या महामार्गाची लांबी ५८ किमी, तर रुंदी १२० मीटर असून, सहापदरी हा मार्ग आहे. ५ मोठ्या आणि २७ लहान पुलांसह विनाअडथळा वाहतूक होण्याकरिता ९ उड्डाणपूल व ३४ भुयारी मार्ग निर्माण करण्यात आले. त्यामध्ये वाहनांसाठी २२, तर पादचाऱ्यांकरिता १२ भुयारी मार्गांचा समावेश आहे. दोन रेल्वे उड्डाणपूलही उभारण्यात आले आहेत. येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेसही देण्यात आले आहेत. महामार्गाच्या वाहनांमुळे वन्यप्राणी विचलित होऊ नये, यासाठी दोन ठिकाणी उन्नत मार्ग राहणार आहेत.

दोन ठिकाणी उभारणार नवनगरे

समृद्धी महामार्गाकरिता तीन तालुक्यांतील जमिनी संपादित करण्यात आल्या. त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा आल्याने त्यांच्या जीवनमानातही बदल झाला आहे. यासोबतच इतरही शेतजमिनीचे भाव वाढले असून, गावेही महामार्गाशी जोडली गेली आहेत. या महामार्गालगत दोन ठिकाणी नवनगरे उभारण्यात येणार असून, त्याकरिता केळझर आणि विरुळ ही गावे निश्चित झाली आहेत. यासोबतच गणेशपूर व रेणकापूर येथे महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता सुविधा केंद्र राहणार आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग