शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध बांधवांची महामानवाला मानवंदना

By admin | Updated: April 15, 2016 02:33 IST

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ चा शतकोत्तर रौप्य जयंती

भीममय वातावरण : विविध वॉर्डावॉर्डातून निघालेल्या मिरवणुकांनी वर्धा दुमदुमलेवर्धा : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ चा शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून असंख्य आंबेडकरी जनतेनी महामानवाला अभिवादन केले. बाबासाहेबांची शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव जिल्ह्यात सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरण आणि शांततेत पार पडला. वर्धेसह जिल्ह्यातील काही शहरांमध्ये ‘जय भीम’चा नारा देत ‘जबतक सुरज चाँद रहेगा, बाबासाहेब तुम्हारा नाम रहेगा’च्या घोषणा देत निळे झेंडे व पंचशील ध्वज हातात घेऊन निघालेल्या बाईक रॅली नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या, तर सायंकाळी वॉर्डावॉर्डातून मिरवणुकीच्या माध्यमातून बौद्ध बांधवांनी बाबासाहेबांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. याप्रसंगी वातावरण निळाईने व्यापून गेले होते. वर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने डॉ. आंबेडकर चौकातील पोलीस ग्राऊंड येथे सतत चार दिवस प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. सकाळपासूनच वर्धेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनेतेची रीघ लागली होती. रखरखते उन्हं असतानाही दिवसभर ही गर्दी कायम होती. दरम्यान, खा. रामदास तडस, जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार व विवेक इलमे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांनीही बाबासाहेबांना अभिवादन केले. जयंती महोत्सवानिमित्त डॉ. आंबेडकर पुतळा चौकाला निळ्या पताकांनी आकर्षक सजविण्यात आले होते. पुतळ्याच्या चबुतऱ्याला निळ्या व पांढऱ्या फुग्यांच्या कमानी लक्षवेधत होत्या. सभोवताल विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटनाच्यावतीने आंबेडकरी जनतेसाठी विविध स्टॉल लावण्यात आले होते. शहरातील मुख्य मार्गावर स्वागतद्वार आणि पताका लावल्याने शहरातील वातावरण भीममय झाले होते. सायंकाळी शहरातील व सभोवतालच्या गावांमध्ये निघालेल्या मिरवणुका डॉ. आंबेडकर चौकात एकवटल्या. हजारोच्या संख्येने बौद्ध बांधवांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. अनेकांनी मेणबत्ती लावून अभिवादन केले. उमेश म्हैसकर यांनी वैशाली नगरातून बाईक रॅली काढली. ही रॅली प्रबुद्ध नगरातून मार्गक्रमण करीत शहरातील मुख्य मार्गाने फिरवून डॉ. आंबेडकर चौकात दाखल होताच बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. या रॅलीत महिलावर्ग दुचाकीसह सहभागी झाल्या होत्या. रॅलीत निळे फेटे लावलेले भीमसैनिक लक्ष वेधून घेत होते.दिवसभर शहरातील विविध भागातून भीमसैनिकांनी बाईक रॅली काढल्या. हातात निळे झेंडे घेऊन शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत निघालेल्या या बाईक रॅली विशेष आकर्षण ठरल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने चार दिवस विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडले. यासाठी उत्सव समितीचे संयोजक प्रमोद राऊत, समितीचे अध्यक्ष विशाल रामटेके, महासचिव रत्नमाला साखरे, कोषाध्यक्ष सुरेंद्र पुनवटकर, सल्लागार समितीचे दिनेश सवाई, विजय आगलावे, निरज गुजर, डॉ. रवीदत्त कांबळे, अ‍ॅड. प्रेम ताकसांडे, शारदा झामरे, अतुल दिवे, अशोक खनाडे, अरविंद निकोसे, सफदर अली, अ‍ॅड. राजेश थुल, प्रकाश पाटील, अरविंद मेहरा, रवी जगताप, वसंत भगत. सोनू कांबळे, महेंद्र मुनेश्वर, उमेश जिंदे, बंटी गोस्वावी, मिलिंद ढाले, प्रवीण पोळके, जयकांत पाटील, रमेश जामलेकर, प्रवीण शेंडे, निशिकांत गोटे, दिनेश थुल, राहुल झामरे, अनिल खडतकर, विजय नगराळे, भास्कर भगत, धम्मपाल शंभरकर, प्रदीप भगत. प्रकाश कांबळे, शेख परवीन उपाध्यक्ष नितीश कुंभारे, बंडू फुलमाळी, पिंटू खंडारे, सलमान खान, सहसचिव सुरज बडगे, पंकज लभाने, अमित डांगे यांच्यासह राजू वैद्य, असिफ कुरेशी, प्रकाश कोरडे, संदेश भित्रे, धम्मा सेलकर, मंगेश सूर्यवंशी, दीपक कंजर, अहमद पठाण, आशिष सोनटक्के, संतीश इंगळे, कुणाल आगरकर, राहुल पिंपळकर, समाधान पाटील, सोनू सहारे, प्रशांत रामटेके, परवेज खान, सुमित गजभिये, संदीप नगराळे, विकास झंझाळ, बादल शेळके, अमर कांबळे, पप्पू लोहवे, विनय भगत, आनंद गायकवाड, चंदू डोफे, उमेश मेश्राम, आदित्य मांदाडे, अविनाश नागदेवे, अरविंद भगत, देवानंद तेलतुंबडे, अमोल थुल, मंगेश नगराळे, अक्षय फुलझेले, विशाल नगराळे, प्रणय ताकसांडे, प्रणित मानकर, आकाश पाझारे, मयूर डेकाटे, आशिष जांभुळकर, प्रशिल उके, अमरदीप कांबळे, चिंटु इंगळे, पंकज मून, राहुल पाटील, अभिनाथ वाघमारे, अमोल फुलझेले, आनंद गायकवाड, रमेश भगत, आकाश मंदाडे, जयशील पानबुडे, पवन धवमे, सिद्धांत मून, चिंटु गोटे, सौरभ होतोले व वैभव पाटील या सदस्यांनी हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता मागील १५ दिवसांपासून अहोरात्र परिश्रम घेतले.(जिल्हा प्रतिनिधी)