शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

घातक कीटकनाशकांची विक्री बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:21 IST

शेतात कीटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात १९ शेतकºयांचा मृत्यू झाला. शिवाय वर्धा जिल्ह्यातही शेतकºयांना विषबाधा झाल्याच्या घटना आहेत.

ठळक मुद्देकृषी विभागाची सजगता : पथकांच्या माध्यमातून होतेय कृषी केंद्रांची पाहणी

विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : शेतात कीटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात १९ शेतकºयांचा मृत्यू झाला. शिवाय वर्धा जिल्ह्यातही शेतकºयांना विषबाधा झाल्याच्या घटना आहेत. यामुळे कृषी विभागाने कृषी केंद्रांच्या तपासणीची मोहीमच हाती घेतली आहे. यात घातक ठरू शकणाºया किटकनाशकांवर विक्री बंदीचे आदेश काढण्यात आले आहेत.कृषी विभागाकडून कृषी केंद्रांची पाहणी करण्यात येत आहे. यासाठी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पथके कृषी केंद्रांची पाहणी करीत आहेत. यात विक्रीचे आदेश नसलेले तथा कंपनीचे शिफारस पत्र नसलेले कीटकनाशक आढळल्यास त्यांची विक्री करू नये, असे आदेश केंद्र संचालकांना दिले जात आहेत. कपाशीवर फवारणी करण्यासाठी बाजारात काही जहाल कीटकनाशक उपलब्ध आहेत; पण कंपनीकडून त्यांना शिफारस पत्र दिले जात नाही. असे असले तरी त्या किटकनाशकांची सर्रास विक्री होत आहे. यामुळेच औषध फवारणी करताना पोटात गेल्याने वा अंगावर उडाल्याने बाधा होत असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात हा प्रकार होऊ नये म्हणून कृषी विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे.कीटकनाशकामुळे फवारणी करणाºया व्यक्तीचे आरोग्य धोक्यात येत आहे. डोळ्यांना त्रास होणे, अंगाची आग होणे आदी घटना घडत आहेत. यामुळे शेतकºयांना मार्गदर्शन केले जात आहे. यासाठी कृषी वार्ताफलक तथा ग्रा.पं. व कृषी केंद्रांमध्ये पत्रके लावण्यात आली आहेत. शेतकºयांनी शेतात फवारणी करणाºया व्यक्तीला रेनकोट, डोळ्याच्या संरक्षणासाठी गॉगल तर काही ठिकाणी हेल्मेट वापरण्यास सुरूवात झाल्याचेही दिसून आले आहे. ज्या कीटकनाशकाची ज्या पिकासाठी शिफारस केली आहे, तेच कीटकनाशक खरेदी करून त्याच पिकावर फवारणी करावी. अधिक प्रमाणात किटकनाशकाचा वापर करू नये, असे आवाहन केले जात आहे. शेतकºयांना फवारणीबाबत मार्गदर्शन कृशी सहायकाकडून मार्गदर्शन केले जात आहे. कृषीवार्ता फलकावर याबाबत सूचना देण्यात येणार असून त्याप्रमाणे शेतकºयांनी फवारणी करण्याचे सुचविले जात आहे.सेलू तालुक्यातील कृषी केंद्रांची केली पाहणीसेलू तालुक्यात तालुका कृषी अधिकारी बाबूराव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पथकामार्फत कृषी केंद्रांची पाहणी करण्यात आलेली आहे. यात विक्रीचे आदेश नसलेल्या कीटकनाशकांची विक्री कृषी केंद्र चालकांनी करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. पथकाने सेलू तालुक्यातील बहुतांश कृषी केंद्रांना भेटी दिल्या असून पाहणी करण्यात आलेली आहे. यात बहुतांश कृषी केंद्रांना विक्रीबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत.कृषी वार्ता फलकाच्या माध्यमातून शेतकºयांना याबाबत सूचनाही देण्यात येत आहेत. शिवाय ग्रामपंचायत तथा कृषी केंद्रांमध्ये कागदी पत्रके लावून फवारणी तथा कीटकनाशकाच्या वापराबाबत शेतकºयांमध्ये सजगता निर्माण करण्याचे प्रयत्नही कृषी विभागाकडून केले जात आहेत.कृषी केंद्रांच्या तपासणीकरिता जिल्ह्यात पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकाºयांमार्फत पाहणी केली जात आहे. ज्या-ज्या कीटकनाशकांना कंपनीचे शिफारस पत्र नाही, त्या कीटकनाशकांना विक्री बंदीचे आदेश देण्यात येत आहेत. यासाठी कीटकनाशकांमध्ये ठराविक कंटेंट किती प्रमाणात आहेत, हे तपासण्यात येत आहे.- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.