शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सालदाराचे पॅकेज @ १.१५ लाख रुपये

By admin | Updated: March 26, 2017 01:04 IST

गुडीपाडवा आला की बळीराजाचा सालदाराचा शोध सुरू होतो. वर्षभराकरिता शेतीची कामे करण्याकरिता असलेल्या या सालदाराचे साल आता चांगलेच वधारल्याचे दिसत आहे.

बळीराजा अवाक् : सोबत महिन्याला ४० पायल्या गहूकिशोर तेलंग तळेगाव (टालाटुले)गुडीपाडवा आला की बळीराजाचा सालदाराचा शोध सुरू होतो. वर्षभराकरिता शेतीची कामे करण्याकरिता असलेल्या या सालदाराचे साल आता चांगलेच वधारल्याचे दिसत आहे. तळेगावात १.१५ लाख रुपये आणि महिन्याचे ४० पायल्या गहू या बोलीवर सालदार ठरविण्यात आला आहे. सालदार लाखाच्या वर जात असलेल्या या पॅकेजमुळे कामाकरिता सालदार ठेवावा की शेती करावी, अशी काहीशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. बी-बियाण्यांचे वाढत असलेले दर व दिवसागणिक पडत असलेले शेतमालाचे भाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. यातच कधी निसर्ग साथ देतो तर कधी हातचा घास हिसकावतो, यामुळे शेती करावी अथवा नाही, या विवंचनेत जिल्ह्यातील शेतकरी असल्याचे दिसत आहे.पाच वर्षांपूर्वी ४० ते ६० हजार रुपयांपर्यंत सालदाराचे साल होते; पण योग्य सालदाराच मिळत नसल्याने गत पाच वर्षांत यात दहा ते वीस हजार रुपयांची वाढ झाली. आज तर साल १ लाख १५ हजार रुपये व महिन्याच्या ४० पायल्या गहू एवढे ठरले आहे. दिवसेदिंवस निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गत चार वर्षांत सोयाबीन आणि कपाशीच्या उत्पन्नातही घट झाली आहे. झालेल्या उत्पदनाला भाव नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. यातच दिवसेंदिवस मजुरीचे दर गगणाला भिडत आहेत. रासायनिक खते आणि बियाण्यांचेही भाव वाढल्याने शेतकरी डबघाईस आला आहे. शेतकऱ्यांचे जीवन शेतीवर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना शेतीशिवाय पर्याय नाही. शेतीची मजुरी, निंदणाचा खर्च, कापूस वेचनी, खते तसेच शेतकऱ्यांना कृषी केंद्रातून उधारीवर घेतलेले व्याज, अशा अनेक बाबींमध्ये वाढ झाल्याने शेती शेतकऱ्याला विंवचनेत टाकणारी ठरत आहे. सध्या जरी यंत्राच्या माध्यमातून शेती केली जात असली तरी शेतीकरिता योग्य सालदार मिळावा, अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते. यामुळेच की काय, उत्तमोत्तम काम करणाऱ्या सालदाराला तळेगावात लाख रुपयांवर साल मिळाले असल्याचे दिसून येत आहे. सालदाराचेही तीन स्तरगावात तीन प्रकारचे सालदार आहेत. या सालदारांना ए बी आणि सी, अशी श्रेणीत विभागले जाते. जे मोठे व्यापारी व शेतकरी आहेत, ते ए श्रेणीतील सालदाराला पसंती देतात. त्याचे या वर्षाचे साल १ लाख १५ हजार रुपये आहे. बी श्रेणीच्या सालदाराला १ लाख ५ हजार रुपये आणि सी श्रेणीच्या सालदाराला ५५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत साल देण्यात येत आहे. या सालाव्यतिरिक्त गहु वेगळे, अशी पद्धत गावात रूढ आहे. महाशिवरात्री उत्सवात सालदार चर्चेतून ठरवितात साल गुडी पाडव्याला एक महिना वेळ असताना तळेगावात महाशिवरात्रीची यात्रा असते. याच दरम्यान सालदार हे एकमेकाचा विचार घेऊन यावर्षी आपण किती साल घ्यायचे, हे ठरवित असतात. बाहेर गावातूनही होते ेसालदाराची आयात गावातील सालदार परवडत नसल्याने काही शेतकरी बाहेर गावातून सालदार आणतात; पण तोही दुसऱ्या वर्षी गावाची प्रथा पाहून आपला भाव वाढवितो. असे असले तरी सालदाराच्या या वाढीव दरामुळे शेतकरी मात्र बेजार झाला आहे.