शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

सालदाराचे पॅकेज @ १.१५ लाख रुपये

By admin | Updated: March 26, 2017 01:04 IST

गुडीपाडवा आला की बळीराजाचा सालदाराचा शोध सुरू होतो. वर्षभराकरिता शेतीची कामे करण्याकरिता असलेल्या या सालदाराचे साल आता चांगलेच वधारल्याचे दिसत आहे.

बळीराजा अवाक् : सोबत महिन्याला ४० पायल्या गहूकिशोर तेलंग तळेगाव (टालाटुले)गुडीपाडवा आला की बळीराजाचा सालदाराचा शोध सुरू होतो. वर्षभराकरिता शेतीची कामे करण्याकरिता असलेल्या या सालदाराचे साल आता चांगलेच वधारल्याचे दिसत आहे. तळेगावात १.१५ लाख रुपये आणि महिन्याचे ४० पायल्या गहू या बोलीवर सालदार ठरविण्यात आला आहे. सालदार लाखाच्या वर जात असलेल्या या पॅकेजमुळे कामाकरिता सालदार ठेवावा की शेती करावी, अशी काहीशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. बी-बियाण्यांचे वाढत असलेले दर व दिवसागणिक पडत असलेले शेतमालाचे भाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. यातच कधी निसर्ग साथ देतो तर कधी हातचा घास हिसकावतो, यामुळे शेती करावी अथवा नाही, या विवंचनेत जिल्ह्यातील शेतकरी असल्याचे दिसत आहे.पाच वर्षांपूर्वी ४० ते ६० हजार रुपयांपर्यंत सालदाराचे साल होते; पण योग्य सालदाराच मिळत नसल्याने गत पाच वर्षांत यात दहा ते वीस हजार रुपयांची वाढ झाली. आज तर साल १ लाख १५ हजार रुपये व महिन्याच्या ४० पायल्या गहू एवढे ठरले आहे. दिवसेदिंवस निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गत चार वर्षांत सोयाबीन आणि कपाशीच्या उत्पन्नातही घट झाली आहे. झालेल्या उत्पदनाला भाव नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. यातच दिवसेंदिवस मजुरीचे दर गगणाला भिडत आहेत. रासायनिक खते आणि बियाण्यांचेही भाव वाढल्याने शेतकरी डबघाईस आला आहे. शेतकऱ्यांचे जीवन शेतीवर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना शेतीशिवाय पर्याय नाही. शेतीची मजुरी, निंदणाचा खर्च, कापूस वेचनी, खते तसेच शेतकऱ्यांना कृषी केंद्रातून उधारीवर घेतलेले व्याज, अशा अनेक बाबींमध्ये वाढ झाल्याने शेती शेतकऱ्याला विंवचनेत टाकणारी ठरत आहे. सध्या जरी यंत्राच्या माध्यमातून शेती केली जात असली तरी शेतीकरिता योग्य सालदार मिळावा, अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते. यामुळेच की काय, उत्तमोत्तम काम करणाऱ्या सालदाराला तळेगावात लाख रुपयांवर साल मिळाले असल्याचे दिसून येत आहे. सालदाराचेही तीन स्तरगावात तीन प्रकारचे सालदार आहेत. या सालदारांना ए बी आणि सी, अशी श्रेणीत विभागले जाते. जे मोठे व्यापारी व शेतकरी आहेत, ते ए श्रेणीतील सालदाराला पसंती देतात. त्याचे या वर्षाचे साल १ लाख १५ हजार रुपये आहे. बी श्रेणीच्या सालदाराला १ लाख ५ हजार रुपये आणि सी श्रेणीच्या सालदाराला ५५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत साल देण्यात येत आहे. या सालाव्यतिरिक्त गहु वेगळे, अशी पद्धत गावात रूढ आहे. महाशिवरात्री उत्सवात सालदार चर्चेतून ठरवितात साल गुडी पाडव्याला एक महिना वेळ असताना तळेगावात महाशिवरात्रीची यात्रा असते. याच दरम्यान सालदार हे एकमेकाचा विचार घेऊन यावर्षी आपण किती साल घ्यायचे, हे ठरवित असतात. बाहेर गावातूनही होते ेसालदाराची आयात गावातील सालदार परवडत नसल्याने काही शेतकरी बाहेर गावातून सालदार आणतात; पण तोही दुसऱ्या वर्षी गावाची प्रथा पाहून आपला भाव वाढवितो. असे असले तरी सालदाराच्या या वाढीव दरामुळे शेतकरी मात्र बेजार झाला आहे.