शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

संतांनी कधीही चमत्कार मानले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:20 IST

महाराष्ट्राला सुधारणावादी संतांची परंपरा लाभली आहे. या संतांच्या कार्याचा वा साहित्याचा नीट अभ्यास केला असता त्यांनी कधीही चमत्कार मानला नाही वा आपल्या साहित्यात तसा उल्लेखही केला नाही.

ठळक मुद्देसंजय इंगळे तिगावकर : ‘संत साहित्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन’वर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्राला सुधारणावादी संतांची परंपरा लाभली आहे. या संतांच्या कार्याचा वा साहित्याचा नीट अभ्यास केला असता त्यांनी कधीही चमत्कार मानला नाही वा आपल्या साहित्यात तसा उल्लेखही केला नाही. याउलट सर्वच संतांनी लोकांची जडणघडण वैज्ञानिक दृष्टीकोनातून करण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन अ.भा. अंनिसचे राज्य पदाधिकारी संजय इंगळे तिगावकर यांनी केले.अनेकांत साध्याय मंदिर येथे डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृत्यर्थ सोमवारी ३७० वा अभ्यास वर्ग पार पडला. यात ‘संत साहित्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन’ विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. इंगळे पूढे म्हणाले की, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, चार्वाक, मुक्ताबाई, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज आदी संतांनी चातुवर्ण व्यवस्थेवर आसूड ओढत लोकशाहीची बिजे रोवण्याचे काम केले; पण काही पोटभरू लोकांनी या संतांच्या मागे चमत्काराच्या कथा जोडून संतांचे समतावादी कार्य मात्र दूर ठेवले. लोकांनीही संतांचे चमत्कार लक्षात ठेवले व त्यांचे खरे कार्य विसरले. यामुळे आज या संतांचे खरे कार्य समजून घेण्याची गरज आहे. संत तुकारामांचा छळ करणारे व त्यांचा खून करून त्यांचा विचार संपवू पाहणाºया त्या वेळच्या व आजच्या धर्म ठेकेदारांपासून सावध राहून संतांचा वैज्ञानिक दृष्टीकोन समजून घेत त्यांची प्रबोधनाची परंपरा पूढे नेण्याचा प्रयत्न परविर्तनवादी कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. काही अभंग व वचनांचे दाखलेही त्यांनी उपस्थितांसमोर ठेवले. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे अरुण चवडे, गजेंद्र सुरकार व रवींद्र कडू उपस्थित होते.संजय भगत यांनी क्रांतीगीते सादर केली. संचालन सुनील ढाले यांनी, परिचय व प्रास्ताविक प्रकाश कांबळे यांनी केले तर आभार नरेंद्र कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. अजय सावरकर, सुधाकर मिसाळ, अनिल मुर्डीव, अ‍ॅड. भास्कर नेवारे, पांडुरंग राजरत्न, सुनील सावध, अ‍ॅड. गोडघाटे, डॉ. भेले आदींनी सहकार्य केले.