शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नॉमिनेशनसाठी होणार धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:07 IST

वर्धा लोकसभा मतदार संघात सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारपासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. २५ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

ठळक मुद्देधुलिवंदन व शनिवार-रविवारची सुटी : २०, २२ व २५ असे चारच दिवस शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघात सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारपासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. २५ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. परंतु, यादरम्यान तीन दिवस शासकीय सुटी असल्याने अर्ज भरण्यासाठी केवळ चार दिवस शिल्लक आहेत. तेव्हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना धावाधाव करावी लागणार आहे. राज्यात चार टप्प्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, वर्धा, यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर, या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदार संघांसाठी सोमवारपासून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. २१, २३ व २४ मार्चची सुटी आल्याने उमेदवारांना आता २०, २२ व २५ मार्च असे चारच दिवस मिळणार आहेत. नामनिर्देशनपत्र भरण्याची अंतिम तारीख २५ मार्च असून, उमेदवारांच्या अर्जाची छाननी २६ मार्च रोजी करण्यात येईल. २८ मार्चपर्यंत उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहे.आयोगाच्या नियमावलीचे काटेकोरपणे करावे लागेल पालनअर्ज दाखल करताना संबंधित उमेदवाराने नामनिर्देशनपत्र नमुना २ अ, नमुना २६ (नामनिेर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे शपथपत्र), शपथेचा किंवा दृएकथनाचा नमुना, छायाचित्राबाबतचे शपथपत्र, स्वाक्षरीचा नमुना आणि मतपत्रिकेतील नावाबाबत पत्र सादर करावयाचे आहे.या सर्व कागदपत्रांच्या माध्यमातून उमेदवारांची अपराधिक माहिती, उमेदवारांकडून कायद्याचे झालेले उल्लंघन, दोष सिद्ध ठरविले किंवा नाही याचा तपशील, मागील पाच वर्षांत आयकर विवरणपत्रात दर्शविलेले एकूण उत्पन्न, पॅन कार्ड क्रमांक, आयकर विवरण पत्र, भरल्याची स्थिती, फौजदारी खटले, खटल्याचा तपशील आदी माहिती सादर करावयाची आहे.राज्य व देशातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी अर्ज सादर करताना प्रस्तावक (सूचक) म्हणून एक व्यक्ती ग्राह्य धरली जाईल, तर स्वतंत्र (अपक्ष) उमेदवारास १० व्यक्ती प्रस्तावक म्हणून आवश्यक राहतील. ज्या लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज करणार आहेत त्याच मतदार संघातील प्रस्तावक असणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :Electionनिवडणूक