शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या नियमांची सर्रास पायमल्ली

By admin | Updated: May 25, 2014 23:47 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे बसेसमध्ये अंध, अपंग, पत्रकार, महिला, आमदार, खासदार यांच्यासाठी जागा राखीव असतात. प्रत्यक्षात या राखीव जागेच्या सीटमागे कुणासाठी राखीव असे लिहिलेले असते.

तळेगाव (श्या) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे बसेसमध्ये अंध, अपंग, पत्रकार, महिला, आमदार, खासदार यांच्यासाठी जागा राखीव असतात. प्रत्यक्षात या राखीव जागेच्या सीटमागे कुणासाठी राखीव असे लिहिलेले असते. परंतु बसचा वाहक या निर्णयाची अंमलबजावणी करीत नसल्याने अंध-अपंगासह महिला प्रवाशांना राखीव जागेऐवजी उभे राहून प्रवास करावा लागत असल्याने या नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे.

राज्य महामंडळाच्या प्रवासी बसमध्ये ठराविक आसन हे राखीव आहे. या आसनांमागे त्या कोणत्या व्यक्तीकरिता राखीव आहे, हे नमूद आहे. तसेच ज्या आसनामागे नाव नसेल ती सर्व आसने सर्वसामान्य प्रवाशासाठी उपलब्ध आहेत असे समजण्यात येते. राज्य परिवहन महामंडळाद्वारे याच उदात्त हेतूने बसमध्ये राखीव जागा ठेवल्या असल्या तरी वाहकाद्वारे अमंलबजावणी होत नसल्याने महामंडळाच्या उद्देशाला केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचे दिसते.

सध्या लग्नसराईची धूम आहे. बसस्थानकावर प्रवाशांची झुंबड उडत असते. बसस्थानकावर बस येताच मिळेल ती जागा बळकावण्याकरिता प्रवाशांची बरीच धावपळ होते. विशेष म्हणजे आबालवृद्धांना डावलत तरुणतुर्क जागा मिळविण्यासाठी धडपड करतात. बसमध्ये खिडकीमधून रुमाल, दुपट्टा व कॅरीबॅग टाकून ती जागा जणू आरक्षित झाली या अविर्भावाने प्रवासी वावरतात. अंध, अपंग व महिलांना गर्दीमधून वाट काढत जागा मिळविणे शक्य होत नाही. परिणामी महामंडळाद्वारा त्यांची हक्काची जागादेखील त्यांना बसायला मिळत नाही.

आमदार व खासदार या बसमध्ये प्रवास करीत नाही हे प्रवाश्यांनाही कळून चुकले आहे. त्यामुळे या राखीव आसनावर प्रवाशी बिनदिक्कतपणे बसतात. वाहकांना माहिती असताना ते देखील नियमाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

अंध अपंगांसाठी राखीव जागा असने गरजेचे आहे. तशी ती देण्यातही आली आहे. शासनाने त्यांच्यासाठी विशेष सुविधा दिली असली तरी त्यांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. नियमानुसार बसमध्ये राखीव आसन असलेल्या जागी सदर व्यक्तीला बसायला मिळणे अवश्यक आहे. परंतु तसे होताना दिसत नाही.एखादे वेळी कुणी नियमाला बोट धरून वाद घातल्यास हा वाद विकोपाला जातो. प्रसंगी हाणामारीच्या घटना बसमध्ये नव्या राहिल्या नसल्याचे प्रवासी सांगत असतात. त्याचप्रकारे सुट्या पैशातूनही नियमित विवाद होण्याच्या घटना वाढल्या आहे. याकडे महामंडळाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)