शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

इंधन दरवाढीविरोधात रायुकाँचा रस्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:13 IST

पेट्रोल व डिझेलमध्ये सातत्याने होणारी दरवाढ व पर्यायाने वाढणारी महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे असल्याने या विरूद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुलगाव बायपासवर बुधवारी प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात रस्तारोको आंदोलन करण्यात आला. सुमारे ४५ मिनीट चाललेल्या या रस्तारोकोमुळे बायपासवर ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला. यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

ठळक मुद्देसमीर देशमुखसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अटक व सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पेट्रोल व डिझेलमध्ये सातत्याने होणारी दरवाढ व पर्यायाने वाढणारी महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे असल्याने या विरूद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुलगाव बायपासवर बुधवारी प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात रस्तारोको आंदोलन करण्यात आला. सुमारे ४५ मिनीट चाललेल्या या रस्तारोकोमुळे बायपासवर ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला. यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.पेट्रोल व डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहे; पण सरकार यावर ठोस निर्णय घेताना दिसत नाही. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून आर्थिक बजेट कोलमडले आहे. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर पडल्याने जीवनावश्यक वस्तूचे दर वाढलेले आहे. असे असताना केंद्र व राज्य शासन सामान्यांना दिलासा मिळेल, असे पाऊल उचलताना दिसत नाही, असे समीर देशमुख यांनी सांगितले. वर्धा, सेलू, आर्वी, देवळी येथे याच मुद्यावर रायुकाँने आंदोलन केले. यात जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली. हे जनतेचे सरकार, असे मोदी सरकार म्हणते तर जनता बेहाल का, याचे उत्तर आम्हाला हवे आहे. मागील महिन्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने देवळी-पुलगाव क्षेत्रातील शेतकरी समस्यांवर देवळी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. कपाशीवर आलेली बोंडअळी व अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे पिकांचे नुकसान झाले. याची शासनाने अद्याप नुकसान भरपाई दिली नाही. तुरीची आॅनलाईन खरेदी व नोंदणी बंद झाल्याने शेतकºयांचे पिकांच्या दरामध्ये भाव कोसळले असल्याचेही त्यांनी सांगितले.पुलगाव पोलिसांनी समीर देशमुख, जिल्हाध्यक्ष संदीप किटे, जि.प. सदस्य संजय कामनापुरे, श्यामसुंदर देशमुख, अजित ठाकरे, राहुल घोडे, अजित ठाकरे, संजय बोबडे, डॉ. विजय राऊत, डॉ. प्रकाश काकडे, किशोर डांगे, सुभाष ढोले, महादेव भोयर, विजय भटकर, किरण टाके, प्रवीण ढांगे, गजानन भानखेडे, दत्तात्रय धांडे, विजय धोपटे, भालचंद्र पेटकर, संजय चौधरी, संजय सारासर यासह रायुकाँ कार्यकर्त्यांना ताब्यात घेत सोडून देण्यात आले. आंदोलनात कार्यकर्ते, शेतकरी व नागरिकांनीही सहभाग घेतला होता.