शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

इंधन दरवाढीविरोधात रायुकाँचा रस्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:13 IST

पेट्रोल व डिझेलमध्ये सातत्याने होणारी दरवाढ व पर्यायाने वाढणारी महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे असल्याने या विरूद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुलगाव बायपासवर बुधवारी प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात रस्तारोको आंदोलन करण्यात आला. सुमारे ४५ मिनीट चाललेल्या या रस्तारोकोमुळे बायपासवर ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला. यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

ठळक मुद्देसमीर देशमुखसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अटक व सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पेट्रोल व डिझेलमध्ये सातत्याने होणारी दरवाढ व पर्यायाने वाढणारी महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे असल्याने या विरूद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुलगाव बायपासवर बुधवारी प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात रस्तारोको आंदोलन करण्यात आला. सुमारे ४५ मिनीट चाललेल्या या रस्तारोकोमुळे बायपासवर ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला. यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.पेट्रोल व डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहे; पण सरकार यावर ठोस निर्णय घेताना दिसत नाही. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून आर्थिक बजेट कोलमडले आहे. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर पडल्याने जीवनावश्यक वस्तूचे दर वाढलेले आहे. असे असताना केंद्र व राज्य शासन सामान्यांना दिलासा मिळेल, असे पाऊल उचलताना दिसत नाही, असे समीर देशमुख यांनी सांगितले. वर्धा, सेलू, आर्वी, देवळी येथे याच मुद्यावर रायुकाँने आंदोलन केले. यात जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली. हे जनतेचे सरकार, असे मोदी सरकार म्हणते तर जनता बेहाल का, याचे उत्तर आम्हाला हवे आहे. मागील महिन्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने देवळी-पुलगाव क्षेत्रातील शेतकरी समस्यांवर देवळी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. कपाशीवर आलेली बोंडअळी व अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे पिकांचे नुकसान झाले. याची शासनाने अद्याप नुकसान भरपाई दिली नाही. तुरीची आॅनलाईन खरेदी व नोंदणी बंद झाल्याने शेतकºयांचे पिकांच्या दरामध्ये भाव कोसळले असल्याचेही त्यांनी सांगितले.पुलगाव पोलिसांनी समीर देशमुख, जिल्हाध्यक्ष संदीप किटे, जि.प. सदस्य संजय कामनापुरे, श्यामसुंदर देशमुख, अजित ठाकरे, राहुल घोडे, अजित ठाकरे, संजय बोबडे, डॉ. विजय राऊत, डॉ. प्रकाश काकडे, किशोर डांगे, सुभाष ढोले, महादेव भोयर, विजय भटकर, किरण टाके, प्रवीण ढांगे, गजानन भानखेडे, दत्तात्रय धांडे, विजय धोपटे, भालचंद्र पेटकर, संजय चौधरी, संजय सारासर यासह रायुकाँ कार्यकर्त्यांना ताब्यात घेत सोडून देण्यात आले. आंदोलनात कार्यकर्ते, शेतकरी व नागरिकांनीही सहभाग घेतला होता.