शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

इंधन दरवाढीविरोधात रायुकाँचा रस्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:13 IST

पेट्रोल व डिझेलमध्ये सातत्याने होणारी दरवाढ व पर्यायाने वाढणारी महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे असल्याने या विरूद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुलगाव बायपासवर बुधवारी प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात रस्तारोको आंदोलन करण्यात आला. सुमारे ४५ मिनीट चाललेल्या या रस्तारोकोमुळे बायपासवर ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला. यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

ठळक मुद्देसमीर देशमुखसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अटक व सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पेट्रोल व डिझेलमध्ये सातत्याने होणारी दरवाढ व पर्यायाने वाढणारी महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे असल्याने या विरूद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुलगाव बायपासवर बुधवारी प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात रस्तारोको आंदोलन करण्यात आला. सुमारे ४५ मिनीट चाललेल्या या रस्तारोकोमुळे बायपासवर ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला. यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.पेट्रोल व डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहे; पण सरकार यावर ठोस निर्णय घेताना दिसत नाही. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून आर्थिक बजेट कोलमडले आहे. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर पडल्याने जीवनावश्यक वस्तूचे दर वाढलेले आहे. असे असताना केंद्र व राज्य शासन सामान्यांना दिलासा मिळेल, असे पाऊल उचलताना दिसत नाही, असे समीर देशमुख यांनी सांगितले. वर्धा, सेलू, आर्वी, देवळी येथे याच मुद्यावर रायुकाँने आंदोलन केले. यात जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली. हे जनतेचे सरकार, असे मोदी सरकार म्हणते तर जनता बेहाल का, याचे उत्तर आम्हाला हवे आहे. मागील महिन्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने देवळी-पुलगाव क्षेत्रातील शेतकरी समस्यांवर देवळी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. कपाशीवर आलेली बोंडअळी व अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे पिकांचे नुकसान झाले. याची शासनाने अद्याप नुकसान भरपाई दिली नाही. तुरीची आॅनलाईन खरेदी व नोंदणी बंद झाल्याने शेतकºयांचे पिकांच्या दरामध्ये भाव कोसळले असल्याचेही त्यांनी सांगितले.पुलगाव पोलिसांनी समीर देशमुख, जिल्हाध्यक्ष संदीप किटे, जि.प. सदस्य संजय कामनापुरे, श्यामसुंदर देशमुख, अजित ठाकरे, राहुल घोडे, अजित ठाकरे, संजय बोबडे, डॉ. विजय राऊत, डॉ. प्रकाश काकडे, किशोर डांगे, सुभाष ढोले, महादेव भोयर, विजय भटकर, किरण टाके, प्रवीण ढांगे, गजानन भानखेडे, दत्तात्रय धांडे, विजय धोपटे, भालचंद्र पेटकर, संजय चौधरी, संजय सारासर यासह रायुकाँ कार्यकर्त्यांना ताब्यात घेत सोडून देण्यात आले. आंदोलनात कार्यकर्ते, शेतकरी व नागरिकांनीही सहभाग घेतला होता.