शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जामठ्यातील रुख्माई स्टोन क्रशर सील; 11 लाख 50 हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 22:30 IST

जिल्हाधिकारी यांच्या आकस्मिक तपासणी पथकातील जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दौड, तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळूताई भागवत यांच्यासह तलाठी व कोतवाल यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी जामठा शिवारातील पूजा चंद्रकांत दौड यांच्या नावे असलेल्या रुख्माई स्टोन क्रशरला भेट दिली. यावेळी विनापरवानगी दगडगोट्यांचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामध्ये अवैधरीत्या होत असलेल्या गौणखनिज उत्खननाला आळा घालण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी आकस्मिक तपासणी पथकाची निर्मिती केली आहे. या पथकाने पहिल्याच तपासणीत जामठा शिवारातील अवैधरीत्या सुरू असलेल्या रुख्माई स्टोन क्रशरला दणका दिला. हे स्टोन क्रशर सील केले असून, ११ लाख ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच ईटीएसव्दारे मोजमाप करून आणखी दंडात वाढ होण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी यांच्या आकस्मिक तपासणी पथकातील जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दौड, तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळूताई भागवत यांच्यासह तलाठी व कोतवाल यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी जामठा शिवारातील पूजा चंद्रकांत दौड यांच्या नावे असलेल्या रुख्माई स्टोन क्रशरला भेट दिली. यावेळी विनापरवानगी दगडगोट्यांचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या ठिकाणाहून दोन ट्रक व एक पोकलेन जप्त करण्यात आला. त्यानंतर आज शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वत: या घटनास्थळी पाहणी केली. जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच ईटीएस मोजमाप करून अवैध उत्खननाचे परिणाम निश्चित करून दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे दोन ट्रककरिता चार लाख आणि एका पोकलेनकरिता सात लाख ५० हजार असा ११ लाख ५० हजारांचा दंड ठोठावला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अवैधरीत्या सुरू असलेले स्टोन क्रशरही सील करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दौड, तहसीलदार रमेश कोळपे, तलाठी देवेंद्र राऊत आदींची उपस्थिती होती. या कारवाईमुळे गौणखनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

खदानींना तारेचे कुंपण अत्यावश्यक-    खदानमालकांनी अवैधरीत्या खोदकाम करून गौणखनिजांचे उत्खनन केले आहे. त्यामुळे खदान परिसरात मोठमोठे खड्डे तयार झाले आहे. या खड्ड्यांमध्ये काही ठिकाणी अपघातही झाले आहेत. हे अपघात टाळण्यासाठी  खदानीच्या तारेचे कुंपण करून घेण्याचे निर्देश आहे. परंतु जिल्ह्यात याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कर्डिले यांनी पुन्हा सर्व खदान मालकांनी तारेचे कुंपण करणे अत्यावश्यक असल्याचे निर्देश दिले आहे.

याही परिसरात तपासणी करण्याची गरज-    जिल्ह्यामध्ये गौणखनिजाचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत असल्याचे दिसून येत आहे. वर्ध्यालगतच्या पिंपरी (मेघे), सिंदी (मेघे) व उमरी (मेघे) परिसरातील टेकड्यांवर उत्खनन केले जात आहे. शिवाय सेलू तालुक्यातील येळाकेळी व खेरडा परिसरातही मोठ्या प्रमाणात खदानी असून, येथेही अवैधरीत्या खोदकाम करून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. हे खड्डे रस्त्यालगत असून, जीवघेणे ठरणारे आहे. तसेच देवळी तालुक्यातील देवळी, पुलगाव, गुंजखेडा, आगरगाव यासह सेलू, हिंगणघाट, आर्वी व आष्टी तालुक्यातील खदानींवरही अशीच परिस्थिती असल्याने या सर्व खदानीवर लक्ष केंद्रित करून धडक कारवाईच्या माेहिमेला आखणी गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी