शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परवाना काढण्यासाठी आरटीओची दादागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:35 IST

उपप्रादेशिक परिवहन विभाग, वर्धा अंतर्गत परवाना काढण्यासाठी आष्टीला कॅम्प आयोजित करतात. पण, अधिकारी अवेळी उपस्थित राहतात. तसेच दलालाच्या माध्यमातून चिरीमिरी घेतल्याशिवाय कामच होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या या दादागिरीमुळे वाहनधारकांना चांगालच त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देदुपारी येतात अधिकारी : चिरीमिरी न दिल्यास करतात नापास

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : उपप्रादेशिक परिवहन विभाग, वर्धा अंतर्गत परवाना काढण्यासाठी आष्टीला कॅम्प आयोजित करतात. पण, अधिकारी अवेळी उपस्थित राहतात. तसेच दलालाच्या माध्यमातून चिरीमिरी घेतल्याशिवाय कामच होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या या दादागिरीमुळे वाहनधारकांना चांगालच त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत गुरुवारी राज्याच्या परिवहन आयुक्तांनाही लेखी तक्रार करण्यात आली आहे.प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दोन दिवस आधी आष्टीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने परवाना काढण्यासाठी कॅम्प आयोजित केल्या जातो. यानुसार २८ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृहात शंभरावर दुचाकीचालक व डझनभर चारचाकी चालक परीक्षा देण्यासाठी जमले होते. यावेळी परिवहन विभागाचे अधिकारी तथा कर्मचारी दुपारी २ वाजता हजर झाले. कमी वेळेत सर्वांना निकाली काढण्यासाठी घाईघाईने प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी आष्टीचे राहुल देशमुख चारचाकी गाडीच्या स्टेअरींगवर बसले. तेव्हा अधिकाºयांनी त्यांना गाडी चालू देण्याऐवजी ‘तुम्ही नापास झाले. माझ्याशी मुजोऱ्या करू नका. पुढच्या वेळी पास करुन देईल.’ अशी उत्तरे देवून वेळ मारुन नेली. येथे दुचाकीच्या परवान्यासाठी एक हजार रुपये तर चारचाकीसाठी दोन ते अडीच हजार रुपये चिरीमिरी घेतात. दिली नाही तर लिंक नसल्याचे कारण सांगून पतरवून लावत असल्याचे सांगण्यात आले....तर तुमच्यावर कारवाई करुवाहनचालकांच्या तक्रारीवरुन प्रतिनिधी तेथे गेले असता उपस्थित अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. तसेच फोटो काढू नका, परवानगी घेतली आहे का. अन्यथा तुमच्यावर कारवाई करु अशी भाषा वापरुन दमदाटी केली. यावरुन या अधिकारी व कर्मचाऱ्यांची किती मुजोरी वाढली हे दिसते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस