शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

शासनातर्फे ३.९९ कोटींची मदत : १५० जनावरांचा मृत्यू, ८५६० घरांची पडझड

By admin | Updated: August 4, 2016 00:22 IST

पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन केले जाते. जिल्हा प्रशासन कुठल्याही स्थितीसाठी तयार असते. असे असले तरी नुकसान मात्र होतेच. ...

गौरव देशमुख वर्धा पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन केले जाते. जिल्हा प्रशासन कुठल्याही स्थितीसाठी तयार असते. असे असले तरी नुकसान मात्र होतेच. गत तीन वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ४८ जणांना प्राण गमवावे लागले तर ५४ जण जखमी झाले. १५० जनावरांचा बळी गेला. शिवाय ८ हजार ५६० घरांची पडझड झाली. याची नुकसान भरपाईमुळे शासनाकडून नागरिकांना ३ कोटी ९८ लाख ९१ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्त हानीचे प्रमाण वाढत असल्याचे १ एप्रिल २०१३ ते १५ जुलै २०१६ पर्यंतची आकडेवारी लक्षात घेतल्यास दिसून येते. २०१३ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे २० जणांचा मृत्यू झाला. शासनामार्फत त्यांच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांची मदत देण्यात आली. जखमी २० जणांना १ लाख १२ हजार रुपयांची मदत करण्यात आली. ८५ गुरांचा बळी गेल्याने १३ लाख १४ हजार रुपयांची मदत संबंधितांना देण्यात आली. ४ हजार ८४६ घरांची अंशत: तर ५३९ घरांची पूर्णत: पडझड झाली. यात २ कोटी ४६ लाख १५ हजार रुपये बाधितांना देण्यात आली. २०१३ मध्ये एकूण २ कोटी ९० लाख ४१ हजार रुपयांची भरपाई शासनातर्फे देण्यात आली. २०१४ मध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले. यात शासनामार्फत १८ लाख रुपयांची मदत देण्यात आली. ५२ जनावरांचा बळी गेल्याने ५ लाख ४१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. १ हजार ५६२ घरांची अंशत: तर ७८ घरांची पूर्णत: पडझड झाली. यापोटी बाधितांना ३१ लाख ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. २०१४ या वर्षात एकूण ५४ लाख ४६ हजार रुपयांची मदत संबंधित कुटुंबीयांना देण्यात आली. २०१५ या वर्षात ९ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले. यात शासनामार्फत ३६ लाख रुपयांची मदत पिडीत कुटुंबीयांना देण्यात आली. पुरात वाहून गेल्याने व अन्य कारणांनी १३ गुरे दगावली. यापोटी ३ लाख २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. पावसामुळे १ हजार २५० घरांची अंशत: तर १३ घरांची पूर्णत: पडझड झाली. यासाठी भरपाई म्हणून १४ लाख ७९ हजार रुपये देण्यात आलेत. २०१५ या वर्षात एकूण ५४ लाख ४ हजार रुपयांची मदत शासनाकडून करण्यात आली. यावर्षी १५ जुलैपर्यंत ७ जणांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले. आतापर्यंत २७२ घरांची पडझड झाली असून यात ७ घरे पूर्णत: कोसळली. २०१६ मध्ये मृत्यू व नुकसानग्रस्त कुटुंबींयानाही मदत दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. गौरव देशमुख ल्ल वर्धा पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन केले जाते. जिल्हा प्रशासन कुठल्याही स्थितीसाठी तयार असते. असे असले तरी नुकसान मात्र होतेच. गत तीन वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ४८ जणांना प्राण गमवावे लागले तर ५४ जण जखमी झाले. १५० जनावरांचा बळी गेला. शिवाय ८ हजार ५६० घरांची पडझड झाली. याची नुकसान भरपाईमुळे शासनाकडून नागरिकांना ३ कोटी ९८ लाख ९१ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्त हानीचे प्रमाण वाढत असल्याचे १ एप्रिल २०१३ ते १५ जुलै २०१६ पर्यंतची आकडेवारी लक्षात घेतल्यास दिसून येते. २०१३ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे २० जणांचा मृत्यू झाला. शासनामार्फत त्यांच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांची मदत देण्यात आली. जखमी २० जणांना १ लाख १२ हजार रुपयांची मदत करण्यात आली. ८५ गुरांचा बळी गेल्याने १३ लाख १४ हजार रुपयांची मदत संबंधितांना देण्यात आली. ४ हजार ८४६ घरांची अंशत: तर ५३९ घरांची पूर्णत: पडझड झाली. यात २ कोटी ४६ लाख १५ हजार रुपये बाधितांना देण्यात आली. २०१३ मध्ये एकूण २ कोटी ९० लाख ४१ हजार रुपयांची भरपाई शासनातर्फे देण्यात आली. २०१४ मध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले. यात शासनामार्फत १८ लाख रुपयांची मदत देण्यात आली. ५२ जनावरांचा बळी गेल्याने ५ लाख ४१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. १ हजार ५६२ घरांची अंशत: तर ७८ घरांची पूर्णत: पडझड झाली. यापोटी बाधितांना ३१ लाख ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. २०१४ या वर्षात एकूण ५४ लाख ४६ हजार रुपयांची मदत संबंधित कुटुंबीयांना देण्यात आली. २०१५ या वर्षात ९ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले. यात शासनामार्फत ३६ लाख रुपयांची मदत पिडीत कुटुंबीयांना देण्यात आली. पुरात वाहून गेल्याने व अन्य कारणांनी १३ गुरे दगावली. यापोटी ३ लाख २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. पावसामुळे १ हजार २५० घरांची अंशत: तर १३ घरांची पूर्णत: पडझड झाली. यासाठी भरपाई म्हणून १४ लाख ७९ हजार रुपये देण्यात आलेत. २०१५ या वर्षात एकूण ५४ लाख ४ हजार रुपयांची मदत शासनाकडून करण्यात आली. यावर्षी १५ जुलैपर्यंत ७ जणांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले. आतापर्यंत २७२ घरांची पडझड झाली असून यात ७ घरे पूर्णत: कोसळली. २०१६ मध्ये मृत्यू व नुकसानग्रस्त कुटुंबींयानाही मदत दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.