शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
2
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
4
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
5
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
6
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
7
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
8
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
9
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
10
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
11
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
12
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
13
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
14
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
15
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
16
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
17
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
18
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
19
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
20
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली

शासनातर्फे ३.९९ कोटींची मदत : १५० जनावरांचा मृत्यू, ८५६० घरांची पडझड

By admin | Updated: August 4, 2016 00:22 IST

पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन केले जाते. जिल्हा प्रशासन कुठल्याही स्थितीसाठी तयार असते. असे असले तरी नुकसान मात्र होतेच. ...

गौरव देशमुख वर्धा पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन केले जाते. जिल्हा प्रशासन कुठल्याही स्थितीसाठी तयार असते. असे असले तरी नुकसान मात्र होतेच. गत तीन वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ४८ जणांना प्राण गमवावे लागले तर ५४ जण जखमी झाले. १५० जनावरांचा बळी गेला. शिवाय ८ हजार ५६० घरांची पडझड झाली. याची नुकसान भरपाईमुळे शासनाकडून नागरिकांना ३ कोटी ९८ लाख ९१ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्त हानीचे प्रमाण वाढत असल्याचे १ एप्रिल २०१३ ते १५ जुलै २०१६ पर्यंतची आकडेवारी लक्षात घेतल्यास दिसून येते. २०१३ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे २० जणांचा मृत्यू झाला. शासनामार्फत त्यांच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांची मदत देण्यात आली. जखमी २० जणांना १ लाख १२ हजार रुपयांची मदत करण्यात आली. ८५ गुरांचा बळी गेल्याने १३ लाख १४ हजार रुपयांची मदत संबंधितांना देण्यात आली. ४ हजार ८४६ घरांची अंशत: तर ५३९ घरांची पूर्णत: पडझड झाली. यात २ कोटी ४६ लाख १५ हजार रुपये बाधितांना देण्यात आली. २०१३ मध्ये एकूण २ कोटी ९० लाख ४१ हजार रुपयांची भरपाई शासनातर्फे देण्यात आली. २०१४ मध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले. यात शासनामार्फत १८ लाख रुपयांची मदत देण्यात आली. ५२ जनावरांचा बळी गेल्याने ५ लाख ४१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. १ हजार ५६२ घरांची अंशत: तर ७८ घरांची पूर्णत: पडझड झाली. यापोटी बाधितांना ३१ लाख ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. २०१४ या वर्षात एकूण ५४ लाख ४६ हजार रुपयांची मदत संबंधित कुटुंबीयांना देण्यात आली. २०१५ या वर्षात ९ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले. यात शासनामार्फत ३६ लाख रुपयांची मदत पिडीत कुटुंबीयांना देण्यात आली. पुरात वाहून गेल्याने व अन्य कारणांनी १३ गुरे दगावली. यापोटी ३ लाख २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. पावसामुळे १ हजार २५० घरांची अंशत: तर १३ घरांची पूर्णत: पडझड झाली. यासाठी भरपाई म्हणून १४ लाख ७९ हजार रुपये देण्यात आलेत. २०१५ या वर्षात एकूण ५४ लाख ४ हजार रुपयांची मदत शासनाकडून करण्यात आली. यावर्षी १५ जुलैपर्यंत ७ जणांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले. आतापर्यंत २७२ घरांची पडझड झाली असून यात ७ घरे पूर्णत: कोसळली. २०१६ मध्ये मृत्यू व नुकसानग्रस्त कुटुंबींयानाही मदत दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. गौरव देशमुख ल्ल वर्धा पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन केले जाते. जिल्हा प्रशासन कुठल्याही स्थितीसाठी तयार असते. असे असले तरी नुकसान मात्र होतेच. गत तीन वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ४८ जणांना प्राण गमवावे लागले तर ५४ जण जखमी झाले. १५० जनावरांचा बळी गेला. शिवाय ८ हजार ५६० घरांची पडझड झाली. याची नुकसान भरपाईमुळे शासनाकडून नागरिकांना ३ कोटी ९८ लाख ९१ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्त हानीचे प्रमाण वाढत असल्याचे १ एप्रिल २०१३ ते १५ जुलै २०१६ पर्यंतची आकडेवारी लक्षात घेतल्यास दिसून येते. २०१३ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे २० जणांचा मृत्यू झाला. शासनामार्फत त्यांच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांची मदत देण्यात आली. जखमी २० जणांना १ लाख १२ हजार रुपयांची मदत करण्यात आली. ८५ गुरांचा बळी गेल्याने १३ लाख १४ हजार रुपयांची मदत संबंधितांना देण्यात आली. ४ हजार ८४६ घरांची अंशत: तर ५३९ घरांची पूर्णत: पडझड झाली. यात २ कोटी ४६ लाख १५ हजार रुपये बाधितांना देण्यात आली. २०१३ मध्ये एकूण २ कोटी ९० लाख ४१ हजार रुपयांची भरपाई शासनातर्फे देण्यात आली. २०१४ मध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले. यात शासनामार्फत १८ लाख रुपयांची मदत देण्यात आली. ५२ जनावरांचा बळी गेल्याने ५ लाख ४१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. १ हजार ५६२ घरांची अंशत: तर ७८ घरांची पूर्णत: पडझड झाली. यापोटी बाधितांना ३१ लाख ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. २०१४ या वर्षात एकूण ५४ लाख ४६ हजार रुपयांची मदत संबंधित कुटुंबीयांना देण्यात आली. २०१५ या वर्षात ९ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले. यात शासनामार्फत ३६ लाख रुपयांची मदत पिडीत कुटुंबीयांना देण्यात आली. पुरात वाहून गेल्याने व अन्य कारणांनी १३ गुरे दगावली. यापोटी ३ लाख २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. पावसामुळे १ हजार २५० घरांची अंशत: तर १३ घरांची पूर्णत: पडझड झाली. यासाठी भरपाई म्हणून १४ लाख ७९ हजार रुपये देण्यात आलेत. २०१५ या वर्षात एकूण ५४ लाख ४ हजार रुपयांची मदत शासनाकडून करण्यात आली. यावर्षी १५ जुलैपर्यंत ७ जणांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले. आतापर्यंत २७२ घरांची पडझड झाली असून यात ७ घरे पूर्णत: कोसळली. २०१६ मध्ये मृत्यू व नुकसानग्रस्त कुटुंबींयानाही मदत दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.