शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शासनातर्फे ३.९९ कोटींची मदत : १५० जनावरांचा मृत्यू, ८५६० घरांची पडझड

By admin | Updated: August 4, 2016 00:22 IST

पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन केले जाते. जिल्हा प्रशासन कुठल्याही स्थितीसाठी तयार असते. असे असले तरी नुकसान मात्र होतेच. ...

गौरव देशमुख वर्धा पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन केले जाते. जिल्हा प्रशासन कुठल्याही स्थितीसाठी तयार असते. असे असले तरी नुकसान मात्र होतेच. गत तीन वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ४८ जणांना प्राण गमवावे लागले तर ५४ जण जखमी झाले. १५० जनावरांचा बळी गेला. शिवाय ८ हजार ५६० घरांची पडझड झाली. याची नुकसान भरपाईमुळे शासनाकडून नागरिकांना ३ कोटी ९८ लाख ९१ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्त हानीचे प्रमाण वाढत असल्याचे १ एप्रिल २०१३ ते १५ जुलै २०१६ पर्यंतची आकडेवारी लक्षात घेतल्यास दिसून येते. २०१३ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे २० जणांचा मृत्यू झाला. शासनामार्फत त्यांच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांची मदत देण्यात आली. जखमी २० जणांना १ लाख १२ हजार रुपयांची मदत करण्यात आली. ८५ गुरांचा बळी गेल्याने १३ लाख १४ हजार रुपयांची मदत संबंधितांना देण्यात आली. ४ हजार ८४६ घरांची अंशत: तर ५३९ घरांची पूर्णत: पडझड झाली. यात २ कोटी ४६ लाख १५ हजार रुपये बाधितांना देण्यात आली. २०१३ मध्ये एकूण २ कोटी ९० लाख ४१ हजार रुपयांची भरपाई शासनातर्फे देण्यात आली. २०१४ मध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले. यात शासनामार्फत १८ लाख रुपयांची मदत देण्यात आली. ५२ जनावरांचा बळी गेल्याने ५ लाख ४१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. १ हजार ५६२ घरांची अंशत: तर ७८ घरांची पूर्णत: पडझड झाली. यापोटी बाधितांना ३१ लाख ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. २०१४ या वर्षात एकूण ५४ लाख ४६ हजार रुपयांची मदत संबंधित कुटुंबीयांना देण्यात आली. २०१५ या वर्षात ९ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले. यात शासनामार्फत ३६ लाख रुपयांची मदत पिडीत कुटुंबीयांना देण्यात आली. पुरात वाहून गेल्याने व अन्य कारणांनी १३ गुरे दगावली. यापोटी ३ लाख २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. पावसामुळे १ हजार २५० घरांची अंशत: तर १३ घरांची पूर्णत: पडझड झाली. यासाठी भरपाई म्हणून १४ लाख ७९ हजार रुपये देण्यात आलेत. २०१५ या वर्षात एकूण ५४ लाख ४ हजार रुपयांची मदत शासनाकडून करण्यात आली. यावर्षी १५ जुलैपर्यंत ७ जणांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले. आतापर्यंत २७२ घरांची पडझड झाली असून यात ७ घरे पूर्णत: कोसळली. २०१६ मध्ये मृत्यू व नुकसानग्रस्त कुटुंबींयानाही मदत दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. गौरव देशमुख ल्ल वर्धा पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन केले जाते. जिल्हा प्रशासन कुठल्याही स्थितीसाठी तयार असते. असे असले तरी नुकसान मात्र होतेच. गत तीन वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ४८ जणांना प्राण गमवावे लागले तर ५४ जण जखमी झाले. १५० जनावरांचा बळी गेला. शिवाय ८ हजार ५६० घरांची पडझड झाली. याची नुकसान भरपाईमुळे शासनाकडून नागरिकांना ३ कोटी ९८ लाख ९१ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्त हानीचे प्रमाण वाढत असल्याचे १ एप्रिल २०१३ ते १५ जुलै २०१६ पर्यंतची आकडेवारी लक्षात घेतल्यास दिसून येते. २०१३ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे २० जणांचा मृत्यू झाला. शासनामार्फत त्यांच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांची मदत देण्यात आली. जखमी २० जणांना १ लाख १२ हजार रुपयांची मदत करण्यात आली. ८५ गुरांचा बळी गेल्याने १३ लाख १४ हजार रुपयांची मदत संबंधितांना देण्यात आली. ४ हजार ८४६ घरांची अंशत: तर ५३९ घरांची पूर्णत: पडझड झाली. यात २ कोटी ४६ लाख १५ हजार रुपये बाधितांना देण्यात आली. २०१३ मध्ये एकूण २ कोटी ९० लाख ४१ हजार रुपयांची भरपाई शासनातर्फे देण्यात आली. २०१४ मध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले. यात शासनामार्फत १८ लाख रुपयांची मदत देण्यात आली. ५२ जनावरांचा बळी गेल्याने ५ लाख ४१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. १ हजार ५६२ घरांची अंशत: तर ७८ घरांची पूर्णत: पडझड झाली. यापोटी बाधितांना ३१ लाख ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. २०१४ या वर्षात एकूण ५४ लाख ४६ हजार रुपयांची मदत संबंधित कुटुंबीयांना देण्यात आली. २०१५ या वर्षात ९ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले. यात शासनामार्फत ३६ लाख रुपयांची मदत पिडीत कुटुंबीयांना देण्यात आली. पुरात वाहून गेल्याने व अन्य कारणांनी १३ गुरे दगावली. यापोटी ३ लाख २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. पावसामुळे १ हजार २५० घरांची अंशत: तर १३ घरांची पूर्णत: पडझड झाली. यासाठी भरपाई म्हणून १४ लाख ७९ हजार रुपये देण्यात आलेत. २०१५ या वर्षात एकूण ५४ लाख ४ हजार रुपयांची मदत शासनाकडून करण्यात आली. यावर्षी १५ जुलैपर्यंत ७ जणांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले. आतापर्यंत २७२ घरांची पडझड झाली असून यात ७ घरे पूर्णत: कोसळली. २०१६ मध्ये मृत्यू व नुकसानग्रस्त कुटुंबींयानाही मदत दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.