शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

शासनातर्फे ३.९९ कोटींची मदत : १५० जनावरांचा मृत्यू, ८५६० घरांची पडझड

By admin | Updated: August 4, 2016 00:22 IST

पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन केले जाते. जिल्हा प्रशासन कुठल्याही स्थितीसाठी तयार असते. असे असले तरी नुकसान मात्र होतेच. ...

गौरव देशमुख वर्धा पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन केले जाते. जिल्हा प्रशासन कुठल्याही स्थितीसाठी तयार असते. असे असले तरी नुकसान मात्र होतेच. गत तीन वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ४८ जणांना प्राण गमवावे लागले तर ५४ जण जखमी झाले. १५० जनावरांचा बळी गेला. शिवाय ८ हजार ५६० घरांची पडझड झाली. याची नुकसान भरपाईमुळे शासनाकडून नागरिकांना ३ कोटी ९८ लाख ९१ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्त हानीचे प्रमाण वाढत असल्याचे १ एप्रिल २०१३ ते १५ जुलै २०१६ पर्यंतची आकडेवारी लक्षात घेतल्यास दिसून येते. २०१३ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे २० जणांचा मृत्यू झाला. शासनामार्फत त्यांच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांची मदत देण्यात आली. जखमी २० जणांना १ लाख १२ हजार रुपयांची मदत करण्यात आली. ८५ गुरांचा बळी गेल्याने १३ लाख १४ हजार रुपयांची मदत संबंधितांना देण्यात आली. ४ हजार ८४६ घरांची अंशत: तर ५३९ घरांची पूर्णत: पडझड झाली. यात २ कोटी ४६ लाख १५ हजार रुपये बाधितांना देण्यात आली. २०१३ मध्ये एकूण २ कोटी ९० लाख ४१ हजार रुपयांची भरपाई शासनातर्फे देण्यात आली. २०१४ मध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले. यात शासनामार्फत १८ लाख रुपयांची मदत देण्यात आली. ५२ जनावरांचा बळी गेल्याने ५ लाख ४१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. १ हजार ५६२ घरांची अंशत: तर ७८ घरांची पूर्णत: पडझड झाली. यापोटी बाधितांना ३१ लाख ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. २०१४ या वर्षात एकूण ५४ लाख ४६ हजार रुपयांची मदत संबंधित कुटुंबीयांना देण्यात आली. २०१५ या वर्षात ९ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले. यात शासनामार्फत ३६ लाख रुपयांची मदत पिडीत कुटुंबीयांना देण्यात आली. पुरात वाहून गेल्याने व अन्य कारणांनी १३ गुरे दगावली. यापोटी ३ लाख २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. पावसामुळे १ हजार २५० घरांची अंशत: तर १३ घरांची पूर्णत: पडझड झाली. यासाठी भरपाई म्हणून १४ लाख ७९ हजार रुपये देण्यात आलेत. २०१५ या वर्षात एकूण ५४ लाख ४ हजार रुपयांची मदत शासनाकडून करण्यात आली. यावर्षी १५ जुलैपर्यंत ७ जणांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले. आतापर्यंत २७२ घरांची पडझड झाली असून यात ७ घरे पूर्णत: कोसळली. २०१६ मध्ये मृत्यू व नुकसानग्रस्त कुटुंबींयानाही मदत दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. गौरव देशमुख ल्ल वर्धा पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन केले जाते. जिल्हा प्रशासन कुठल्याही स्थितीसाठी तयार असते. असे असले तरी नुकसान मात्र होतेच. गत तीन वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ४८ जणांना प्राण गमवावे लागले तर ५४ जण जखमी झाले. १५० जनावरांचा बळी गेला. शिवाय ८ हजार ५६० घरांची पडझड झाली. याची नुकसान भरपाईमुळे शासनाकडून नागरिकांना ३ कोटी ९८ लाख ९१ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्त हानीचे प्रमाण वाढत असल्याचे १ एप्रिल २०१३ ते १५ जुलै २०१६ पर्यंतची आकडेवारी लक्षात घेतल्यास दिसून येते. २०१३ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे २० जणांचा मृत्यू झाला. शासनामार्फत त्यांच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांची मदत देण्यात आली. जखमी २० जणांना १ लाख १२ हजार रुपयांची मदत करण्यात आली. ८५ गुरांचा बळी गेल्याने १३ लाख १४ हजार रुपयांची मदत संबंधितांना देण्यात आली. ४ हजार ८४६ घरांची अंशत: तर ५३९ घरांची पूर्णत: पडझड झाली. यात २ कोटी ४६ लाख १५ हजार रुपये बाधितांना देण्यात आली. २०१३ मध्ये एकूण २ कोटी ९० लाख ४१ हजार रुपयांची भरपाई शासनातर्फे देण्यात आली. २०१४ मध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले. यात शासनामार्फत १८ लाख रुपयांची मदत देण्यात आली. ५२ जनावरांचा बळी गेल्याने ५ लाख ४१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. १ हजार ५६२ घरांची अंशत: तर ७८ घरांची पूर्णत: पडझड झाली. यापोटी बाधितांना ३१ लाख ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. २०१४ या वर्षात एकूण ५४ लाख ४६ हजार रुपयांची मदत संबंधित कुटुंबीयांना देण्यात आली. २०१५ या वर्षात ९ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले. यात शासनामार्फत ३६ लाख रुपयांची मदत पिडीत कुटुंबीयांना देण्यात आली. पुरात वाहून गेल्याने व अन्य कारणांनी १३ गुरे दगावली. यापोटी ३ लाख २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. पावसामुळे १ हजार २५० घरांची अंशत: तर १३ घरांची पूर्णत: पडझड झाली. यासाठी भरपाई म्हणून १४ लाख ७९ हजार रुपये देण्यात आलेत. २०१५ या वर्षात एकूण ५४ लाख ४ हजार रुपयांची मदत शासनाकडून करण्यात आली. यावर्षी १५ जुलैपर्यंत ७ जणांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले. आतापर्यंत २७२ घरांची पडझड झाली असून यात ७ घरे पूर्णत: कोसळली. २०१६ मध्ये मृत्यू व नुकसानग्रस्त कुटुंबींयानाही मदत दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.