शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वृक्षतोडीमुळे ऋतूत परिवर्तन

By admin | Updated: July 16, 2015 00:10 IST

बेसुमार व अवैध वृक्षतोड होत असल्यामुळे नैसर्गिक वातावरणात बराच बदल घडत

पावसाची प्रतीक्षा : पर्यावरणपूरक योजना ठरतात नाममात्रसेलू : बेसुमार व अवैध वृक्षतोड होत असल्यामुळे नैसर्गिक वातावरणात बराच बदल घडत असल्याचे दिसून येत आहे. असे तज्ज्ञ सांगतात. याचे थेट परिणाम ऋतुचक्रावर होत असल्याने अनियमित पर्जन्यमान याचा फटका मानवाला सहन करावा लागत आहे. जुलै महिन्यात पंधरवाडा लोटला तरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे.वातावरणातील कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण वाढू नये म्हणून केंद्र आणि राज्य शासन शतकोटी वृक्ष लागवड योजना राबवित आहे. या योजनेसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. मात्र त्या योजनेच्या निकषानुसार अंमलबजावणी करण्यास संबंधित प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने ही योजना नाममात्र ठरते. या योजनेतून वृक्षांचे संवर्धन बोटावर मोजण्या इतपत झाले असल्याचे बोलले जाते. शेत शिवारात असलेल्या वृक्षाची कत्तल होत असून याला आळा घालणे गरजेचे झाले आहे.ग्रामीण भागातील शेत शिवार विरळ होत आहेत. हल्ली चाललेले हे सर्व प्रकार बघून नागरिकांसमोर एकच प्रश्न उपस्थित होते की, यावेळी जिल्ह्यात व तालुक्यात वन विभागाचे अस्तीत्व आहे किंवा नाही. पर्यावरण प्रदुषणामुळे सध्या अस्तीत्वात असलेले जीव जंतू यावेळी बऱ्याच कठीण गंभीर समस्यांचा सामना करीत आहेत. वातावरणाच्या फेरबदलामुळे सर्वच प्रभावित आहे.शेतात असणाऱ्या वृक्षांच्या संख्येप्रमाणेच गाववस्तीत वृक्षांची संख्या पुरेशी होती. त्यामुळे जिकडे-तिकडे हिरवेगार वातावरण उत्पन्न होवून सर्व ऋतु ठराविक मर्यादेप्रमाणे होत असत. मात्र आता कोणतेही ऋतु वेळेवर येत नसून हा काळ उन्हाहाच आहे. असे नागरिकांना जाणवत आहे. पूर्वी सर्व ऋतु वेळेवर व सुरळीत असायचे मात्र आता एकच ऋतु म्हणजे उन्हाळाच असल्याचा भास होत आहे. ही अवैध वृक्षतोड थांबविण्यात वन विभागाला अपयश येत असल्याचे दिसते. यावर प्रतिबंध घालण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)