शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

‘सुपर कम्युनिकेशन वे’ बाबत भूमिका अस्पष्ट

By admin | Updated: August 17, 2016 00:52 IST

नागपूर ते मुंबई हा ७५० कि़मी. लांबीचा सुपर कम्युनिकेशन वे २२ जिल्ह्यातून जात आहे

शेतकऱ्यांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सेलू : नागपूर ते मुंबई हा ७५० कि़मी. लांबीचा सुपर कम्युनिकेशन वे २२ जिल्ह्यातून जात आहे. शिवाय २१ टाऊनशिपचा यामध्ये समावेश आहे. यात सेलू तालुक्यातील सेलडोह, येळाकेळी, पुलगावचा समावेश आहे. याकरिता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र शासनाची याबाबत भूमिका स्पष्ट नसल्याने सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. याबाबत निर्णय घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदनात बाजारभावापेक्षा चारपट मोबदला मिळावा, शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. भूमि अधिग्रहण कायद्यांसंदर्भात संपूआ आघाडीने जी भूमिका घेतली ती या सरकारने घ्यावी, अशा विविध मागण्या करण्यात आला आहे. रायुकाँचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सेलू तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. या महामार्गाला विरोध नाही. मात्र शासनाची भूमिका संदिग्ध आहे, असे निवेदनात नमुद केले आहे. शिवाय शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी या निवेदनातून मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. याबाबत समीर देशमुख म्हणाले की, सूपर कम्युनिकेशन वे ची संकल्पना चांगली आहे. विकासाबाबत आमची भूमिका सदैव सहकार्याची आहे. मात्र हे करताना कुणावरही अन्याय होऊ नये. आज तालुक्यातील शेतकरी संभ्रमात आहे. शासनाने खुलेपणाने शेतकऱ्यांशी चर्चा करावी यासाठी हे निवेदन देण्यात येत असल्याचेही नमुद केले आहे. यावेळी तहसीलदार रवींद्र होळी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. निवेदन देताना तालुकाध्यक्ष मिलिंद हिवलेकर, बाजार समितीचे सभापती विद्याधर वानखेडे, हरिभाऊ झाडे, मोरेश्वर नाखले, कोटंबकार, महानाम रामटेके, श्याम वानखेडे, नितीन फासगे, उल्हास रणनवरे, दिलीप ठाकरे, रामु पवार, अनिल जिकार, दिलीप गावंडे, नरेश खोबे, शुभम झाडे व शेतकरी बांधव उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)