शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 01:49 IST

ग्रामीण भागाच्या विकासासाठी अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. अभियंत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार रामदास तडस यांनी दिले.

ठळक मुद्देरामदास तडस : समस्या निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करणार

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : ग्रामीण भागाच्या विकासासाठी अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. अभियंत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार रामदास तडस यांनी दिले.येथील बा. दे. अभियांत्रिकी महाविद्यालयात जि.प. अभियंता संघटनेची राज्यस्तरीय विशेष बैठक रविवारी पार पडली. या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर आ. समीर कुणावार, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू शिंदे, महासचिव सुहास धारासुरकर, कार्याध्यक्ष सतीश मार्बते, बा.दे. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उगेमुगे, रावसाहेब पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.खा. तडस पुढे म्हणाले, पाच वर्षांत सरकारने विकास साधला आहे. ग्रामीण भाग शहराशी जोडल्या गेला पाहिजे. शासनाचा सर्व निधी ग्रामीण भागात पोहचविणे आणि चांगल्या प्रकारे काम करण्याची जबाबदारी अभियंत्यांची असते. शिवाय, ते चांगल्या प्रकारे कार्य करतात. मागील सरकारपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार गतीने काम करीत आहे. वर्धा ही महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असल्याने या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे. तुमच्या मागण्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.पंचायत राजमध्ये अभियंत्यांना विविध प्रकारची आणि योजनेची कामे करावी लागतात. ग्रामीण भागात काम करीत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपणही प्रयत्न करू, असे जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यावेळी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान हिंगोली येथील प्रज्ञा कुळकर्णी लिखित ‘शब्द राणी’या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संजय उगेमुगे तर संचालन अविनाश गोहाड यांनी केले. बैठकीला २८ जिल्ह्यातील १५० पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.मुंबई दरबारी प्रश्न मांडणार -समीर कुणावारसंघटनेच्या माध्यमातून प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केल्या जातात. अभियंता हा विकासातील महत्त्वाचा घटक आहे. आम्ही निधी आणतो. शासन उपलब्ध करून देते; पण प्रत्यक्षात कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम अभियंता करीत असतात. म्हणून लोकविकाच्या कामात आणि सेवा देण्यात अभियंता महत्त्वाचा आहे. त्यांच्या समस्या निकाली निघाव्या म्हणून आपण हा विषय येत्या अधिवेशनादरम्यान विधिमंडळात मांडू, असे आश्वासन आ. समीर कुणावार यांनी याप्रसंगी दिले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस