शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

ग्रामीण भागाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 01:49 IST

ग्रामीण भागाच्या विकासासाठी अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. अभियंत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार रामदास तडस यांनी दिले.

ठळक मुद्देरामदास तडस : समस्या निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करणार

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : ग्रामीण भागाच्या विकासासाठी अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. अभियंत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार रामदास तडस यांनी दिले.येथील बा. दे. अभियांत्रिकी महाविद्यालयात जि.प. अभियंता संघटनेची राज्यस्तरीय विशेष बैठक रविवारी पार पडली. या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर आ. समीर कुणावार, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू शिंदे, महासचिव सुहास धारासुरकर, कार्याध्यक्ष सतीश मार्बते, बा.दे. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उगेमुगे, रावसाहेब पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.खा. तडस पुढे म्हणाले, पाच वर्षांत सरकारने विकास साधला आहे. ग्रामीण भाग शहराशी जोडल्या गेला पाहिजे. शासनाचा सर्व निधी ग्रामीण भागात पोहचविणे आणि चांगल्या प्रकारे काम करण्याची जबाबदारी अभियंत्यांची असते. शिवाय, ते चांगल्या प्रकारे कार्य करतात. मागील सरकारपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार गतीने काम करीत आहे. वर्धा ही महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असल्याने या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे. तुमच्या मागण्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.पंचायत राजमध्ये अभियंत्यांना विविध प्रकारची आणि योजनेची कामे करावी लागतात. ग्रामीण भागात काम करीत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपणही प्रयत्न करू, असे जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यावेळी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान हिंगोली येथील प्रज्ञा कुळकर्णी लिखित ‘शब्द राणी’या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संजय उगेमुगे तर संचालन अविनाश गोहाड यांनी केले. बैठकीला २८ जिल्ह्यातील १५० पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.मुंबई दरबारी प्रश्न मांडणार -समीर कुणावारसंघटनेच्या माध्यमातून प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केल्या जातात. अभियंता हा विकासातील महत्त्वाचा घटक आहे. आम्ही निधी आणतो. शासन उपलब्ध करून देते; पण प्रत्यक्षात कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम अभियंता करीत असतात. म्हणून लोकविकाच्या कामात आणि सेवा देण्यात अभियंता महत्त्वाचा आहे. त्यांच्या समस्या निकाली निघाव्या म्हणून आपण हा विषय येत्या अधिवेशनादरम्यान विधिमंडळात मांडू, असे आश्वासन आ. समीर कुणावार यांनी याप्रसंगी दिले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस