शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

रोहयोवर ८० कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:17 IST

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेवर २०१७-१८ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात सुमारे ७९ कोटी ४७ लाख ३४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरोजगार पुरविण्यात जिल्ह्याचा सातवा क्रमांक : कामासाठी ससेहोलपट थांबली

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेवर २०१७-१८ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात सुमारे ७९ कोटी ४७ लाख ३४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. रोजगार हमी योजनेचे काम उपलब्ध करून देण्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील स्थिती अतिशय चांगली आहे. रोजगार पुरविण्यात गडचिरोली जिल्हा राज्यात सातव्या क्रमांकावर आहे.गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराचे शेतीव्यतिरिक्त रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने शेतीचा हंगाम संपल्यानंतर बेरोजगारीचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर यांच्याकडून रोजगार हमी योजनेच्या कामाची मोठ्या प्रमाणात मागणी होते. ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्टÑीय रोजगारर हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वर्षातून किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तेवढ्या दिवसांचा रोजगार उपलब्ध न झाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद आहे. शेतीचा हंगाम संपल्यानंतर येथील नागरिकांकडून रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी वाढते. त्यामुळे येथील प्रशासकीय यंत्रणा अगोदरच काम मंजूर करून ठेवतात. नागरिकांची मागणी होताच रोजगार उपलब्ध करून दिला जातो.२०१७-१८ या आर्थिक वर्षात एप्रिल ते १८ नोव्हेंबरपर्यंत मजुरांच्या मजुरीवर ४४ कोटी ५१ लाख ५३ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. साहित्य खरेदीवर ३१ कोटी १२ लाख रूपये खर्च झाले आहेत. प्रशासकीय यंत्रणा चालविण्यासाठी ३ कोटी ७५ लाख ७१ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. असे एकूण ७९ कोटी ४७ लाख ३४ हजार रूपये खर्च झाले आहेत. रोजगार हमी योजनेचे काम उपलब्ध झाल्यापासून ग्रामीण भागातील नागरिकांची रोजगारासाठी होणारी भटकंती काही प्रमाणात थांबण्यास फार मोठी मदत झाली आहे. यापूर्वी शेतीचा हंगाम संपताच हजारो मजूर नजिकच्या छत्तीसगड, तेलंगणा राज्यात रोजगारासाठी स्थलांतरीत होत होते. आता मात्र गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने स्थलांतरणाची समस्या कमी झाली आहे.कुशलचा निधी रखडलारोजगार हमी योजनेत अकुशल कामासाठी निधीची कमतरता नाही. संवर्ग विकास अधिकाºयांनी मस्टरला मान्यता देताच लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. मात्र साहित्याचा निधी उपलब्ध होण्यास बºयाचवेळा अडचण निर्माण होते. मागील तीन महिन्यांपासून साहित्याचे बिल निघाले नाही. सुमारे ३ कोटी ७५ लाख रूपये देणे शिल्लक आहे. अनेक ग्रामपंचायती व प्रशासकीय यंत्रणा उधारीवर साहित्य खरेदी करतात. मात्र बिले निघण्यास अडचण निर्माण होते.२० लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती२०१७-१८ या वर्षात १ लाख २६ हजार ८७५ मजुरांना २० लाख २१ हजार ६६९ मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. अहेरी तालुक्यात १ लाख ३७ हजार, आरमोरी तालुक्यात २ लाख ७० हजार, भामरागड तालुक्यात ३२ हजार ८०८, चामोर्शी तालुक्यात ३ लाख ७ हजार, देसाईगंज तालुक्यात १ लाख ७५ हजार, धानोरा तालुक्यात २ लाख १५ हजार, एटापल्ली तालुक्यात ५७ हजार ८०, गडचिरोली तालुक्यात २ लाख ४० हजार, कोरची तालुक्यात १ लाख ५६ हजार, कुरखेडा तालुक्यात २ लाख ५४ हजार, मुलचेरा तालुक्यात १ लाख २४ हजार, सिरोंचा तालुक्यात ५१ हजार २६० मनुष्यदिवस रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आठ महिन्यांच्या कालावधीत २ हजार ४२३ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.