शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

रोहयोवर ८० कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:17 IST

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेवर २०१७-१८ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात सुमारे ७९ कोटी ४७ लाख ३४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरोजगार पुरविण्यात जिल्ह्याचा सातवा क्रमांक : कामासाठी ससेहोलपट थांबली

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेवर २०१७-१८ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात सुमारे ७९ कोटी ४७ लाख ३४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. रोजगार हमी योजनेचे काम उपलब्ध करून देण्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील स्थिती अतिशय चांगली आहे. रोजगार पुरविण्यात गडचिरोली जिल्हा राज्यात सातव्या क्रमांकावर आहे.गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराचे शेतीव्यतिरिक्त रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने शेतीचा हंगाम संपल्यानंतर बेरोजगारीचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर यांच्याकडून रोजगार हमी योजनेच्या कामाची मोठ्या प्रमाणात मागणी होते. ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्टÑीय रोजगारर हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वर्षातून किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तेवढ्या दिवसांचा रोजगार उपलब्ध न झाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद आहे. शेतीचा हंगाम संपल्यानंतर येथील नागरिकांकडून रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी वाढते. त्यामुळे येथील प्रशासकीय यंत्रणा अगोदरच काम मंजूर करून ठेवतात. नागरिकांची मागणी होताच रोजगार उपलब्ध करून दिला जातो.२०१७-१८ या आर्थिक वर्षात एप्रिल ते १८ नोव्हेंबरपर्यंत मजुरांच्या मजुरीवर ४४ कोटी ५१ लाख ५३ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. साहित्य खरेदीवर ३१ कोटी १२ लाख रूपये खर्च झाले आहेत. प्रशासकीय यंत्रणा चालविण्यासाठी ३ कोटी ७५ लाख ७१ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. असे एकूण ७९ कोटी ४७ लाख ३४ हजार रूपये खर्च झाले आहेत. रोजगार हमी योजनेचे काम उपलब्ध झाल्यापासून ग्रामीण भागातील नागरिकांची रोजगारासाठी होणारी भटकंती काही प्रमाणात थांबण्यास फार मोठी मदत झाली आहे. यापूर्वी शेतीचा हंगाम संपताच हजारो मजूर नजिकच्या छत्तीसगड, तेलंगणा राज्यात रोजगारासाठी स्थलांतरीत होत होते. आता मात्र गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने स्थलांतरणाची समस्या कमी झाली आहे.कुशलचा निधी रखडलारोजगार हमी योजनेत अकुशल कामासाठी निधीची कमतरता नाही. संवर्ग विकास अधिकाºयांनी मस्टरला मान्यता देताच लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. मात्र साहित्याचा निधी उपलब्ध होण्यास बºयाचवेळा अडचण निर्माण होते. मागील तीन महिन्यांपासून साहित्याचे बिल निघाले नाही. सुमारे ३ कोटी ७५ लाख रूपये देणे शिल्लक आहे. अनेक ग्रामपंचायती व प्रशासकीय यंत्रणा उधारीवर साहित्य खरेदी करतात. मात्र बिले निघण्यास अडचण निर्माण होते.२० लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती२०१७-१८ या वर्षात १ लाख २६ हजार ८७५ मजुरांना २० लाख २१ हजार ६६९ मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. अहेरी तालुक्यात १ लाख ३७ हजार, आरमोरी तालुक्यात २ लाख ७० हजार, भामरागड तालुक्यात ३२ हजार ८०८, चामोर्शी तालुक्यात ३ लाख ७ हजार, देसाईगंज तालुक्यात १ लाख ७५ हजार, धानोरा तालुक्यात २ लाख १५ हजार, एटापल्ली तालुक्यात ५७ हजार ८०, गडचिरोली तालुक्यात २ लाख ४० हजार, कोरची तालुक्यात १ लाख ५६ हजार, कुरखेडा तालुक्यात २ लाख ५४ हजार, मुलचेरा तालुक्यात १ लाख २४ हजार, सिरोंचा तालुक्यात ५१ हजार २६० मनुष्यदिवस रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आठ महिन्यांच्या कालावधीत २ हजार ४२३ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.