शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहनांच्या रांगा

By admin | Updated: September 11, 2016 00:41 IST

शहरातील आरती चौक परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाच्या मागे अवजड वाहनांच्या दुरूस्तीची काही दुकाने आहेत.

अपघाताचा धोका : वाहन दुरूस्तीच्या दुकानांसमोरच होते गर्दीवर्धा : शहरातील आरती चौक परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाच्या मागे अवजड वाहनांच्या दुरूस्तीची काही दुकाने आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या या दुकानांच्या समोर ट्रक, ट्रॅक्टर, ट्रेलर यासह अन्य मालवाहू वाहने उभी असतात. या वाहनांमुळे रस्ता संकुचित होत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दुकाने हटवून कारागिरांना बेरोजगार करू नये; पण किमान रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी सामान्यांतून होत आहे. शहरातील ‘सिव्हील लाईन एरिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरती चौक ते विश्राम गृहाकडे जाणाऱ्या मार्गावर सारखी वर्दळ असते. शिवाय पोस्ट आॅफीस चौक ते आरती चौक या मार्गाने बसेसची रहदारी सुरू असते. यातील नगर परिषद चौकामध्ये रस्त्याच्या कडेला काही वाहने दुरूस्ती करणाऱ्याची दुकाने आहेत. नगर परिषदेच्या जागेवर असलेली ही दुकाने वाहतुकीला अडथळा ठरत नसली तरी त्यांच्या दुकानांसमोर वा दुरूस्तीसाठी उभी राहणारी अवजड वाहने मात्र अपघातास कारणीभूत ठरत आहेत. पेट्रोल पंपाच्या मागील भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला शनिवारी ट्रक उभे होते. यामुळे समोरून येणारी वाहने दृष्टीस पडत नाही. शिवाय चौकामध्येही काही वाहने उभी करण्यात आली होती. या प्रकारामुळे अपघाताचा धोका बळावला होता. नगर परिषद कार्यालय असलेल्या या चोकात यापूर्वीही बरेच अपघात झाले आहे. अपघाताचा धोका ओळखून मार्गावर गतिरोधक निर्माण करण्यात आले; पण यामुळे केवळ वाहनांची गती कमी झाली. आजही अपघात होतातच. वाहन दुरूस्तीची दुकाने रस्त्याच्या कडेला असल्याने नादुरूस्त वाहने रस्त्याच्या कडेला दुकानांसमोर वा परिसरात उभी केली जातात. दुरूस्तीला विलंब झाल्यास ही वाहने दोन-दोन दिवस तेथेच उभी असतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देत किमान रस्त्यावरील अवजड वाहनांवर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)विद्यार्थ्यांची असते वर्दळआरती चौक ते विश्रामगृह याच मार्गावर यशवंत महाविद्यालय, सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आहे. यामुळे या मार्गावर नागरिक, विद्यार्थ्यांची सतत ये-जा असते. सकाळपासून विद्यार्थ्यांचीच अधिक गर्दी असते. याच मार्गावर रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी केली जात असल्याने अपघाताचा धोका बळावला आहे. शिवाय रस्त्यावरील खड्ड्यांमुळेही दुचाकी वाहनांना अधिक धोका असतो. आरती चौकातील पेट्रोल पंपाच्या मागे काही ट्रक, ट्रॅक्टर, ट्रेलर व अन्य जड वाहनांच्या दुरूस्तीची दुकाने आहेत. ही दुकाने रस्त्यावर नसली, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत नसला तरी त्यांच्या दुकानांसमोर होणारी वाहनांची गर्दी अपघाताला कारणीभूत ठरत आहे. या दुकानदारांवर कारवाई करून त्यांना बेरोजगार करणे, हा कुणाचाही हेतू नाही; पण किमान सदर दुकानदारांनी वाहने अन्यत्र उभी करण्याच्या सूचना कराव्या, अशी अपेक्षाही सामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.