शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गिट्टीमुळे रस्ते झाले निसरडे

By admin | Updated: July 18, 2016 00:32 IST

उन्हाळ्यात करावयाच्या रस्ता डागडुजीच्या कामाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले.

वाहनांना अपघाताचा धोका : डागडुजी नंतरही समस्या कायमच वर्धा : उन्हाळ्यात करावयाच्या रस्ता डागडुजीच्या कामाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पावसाळ्याला सुरूवात होताच शहरातील रस्त्याचे अंतरंग उघडे पडले. पहिल्याच पावसानंतर शहरातील प्रमुख डांबरी रस्ते उखडले असून गिट्टी बाहेर पडली आहे. त्यामुळे सदर रस्ते निसरडे झाले आहे. यातून वाहन चालविताना चालकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावरील गिट्टीच्या कणांमुळे वाहनधारकांना वाहन चालविताना त्रास सहन करावा लागतो. अशात रस्त्यावरून एखादे मोठे वाहन गेल्यास धुळीचे लोट उडतात. शिवाजी चौक ते आर्वी नाका आणि आरती चौक ते धुनिवाले मठापर्यंतच्या रस्त्याची सध्या हीच स्थिती झाली आहे. या रस्त्याने वाहन चालविताना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. तसेच गिट्टीमुळे दुचाकी सारखे वाहन घसरून अपघाताचा धोका बळावला आहे. हे दोन्ही रस्ते वर्दळीचे असून या रस्त्यावर शाळा-महाविद्यालय, बँक, पतसंस्था, शासकीय कार्यालये आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने आहे. कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांची दिवसरात्र येथे वर्दळ असते. रस्त्याची दैनावस्था झाली असल्याने येथे दुर्घटनेचा धोका बळावला आहे. या रस्त्यांचे डांबरीकरण गरजेचे झाले आहे.(स्थानिक प्रतिनिधी) खड्ड्यांमध्ये विटांच्या चुरीचा होतोय वापर वर्धा-पवनार मार्गावर असलेले खोल खड्डे बुजविण्यासाठी विटांच्या चुरीचा वापर करण्यात आला आहे. पाऊस असताना खड्ड्यात टाकलेली चुरी पाण्यामुळे दबून होती. मात्र पावसाचा जोर ओसरताच ही चुरी वाळल्याने त्याचा रस्त्यावर धुराळा उडत आहे. अशातच एखादे जड वाहन गेल्यास मागाहुन येत असलेल्या दुचाकी चालकाला धुळीमुळे क्षणभर काही नजरेस पडत नाही.या मार्गाने शाळकरी मुलेही अधिक प्रमाणात ये-जा करतात. त्यांनाही या धुळीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे श्वसनाचे आजार जडण्याचा धोका आहे.