शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

५८ लाखातून तीन तालुक्यात रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:10 IST

आर्वी, कारंजा व आष्टी या तीन तालुक्यातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी ५८ कोटींचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी माजी आमदार दादाराव केचे व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी सुमीत वानखेडे यांनी पाठपुरावा केला होता.

ऑनलाईन लोकमतआर्वी : आर्वी, कारंजा व आष्टी या तीन तालुक्यातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी ५८ कोटींचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी माजी आमदार दादाराव केचे व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी सुमीत वानखेडे यांनी पाठपुरावा केला होता.आर्वी तालुक्यातील रोहणा-दिघी-सायखेडा रस्त्याकरिता १९० लाख रुपये, पिंपळखुटा-दाणापूर-ब्राह्मणवाडा-खैरवाडा पुलाच्या बांधकामासह रस्त्यासाठी २०० लाख रुपये, सावळापूर-लहादेवी-पांजरा- दहेगावकरीता १८० लाख रुपये, काचनुर-तळेगाव-पानवाडी रस्त्यासाठी ८१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.आष्टी तालुक्यातील खडकी-खंबित-बेलोरा रस्त्याकरीता ५४३ लाख रुपये, वडाळा-साहूर- माणिकवाडा- सुसुंद्रा रस्त्यासाठी ५१८ लाख रुपये, नांदपूर-चिस्तुर-खडकी रस्त्यासाठी ३४७ लाख रुपये, पोरगव्हाण - पंचाळा रस्त्यासाठी २१० लाख रुपये, खडकी-खंबीत-बेलोरा रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी १५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.कारंजा तालुक्यातील हिंगणी-बोरधरण-गरमसुर-मेटहिरजी-धानोली-राहाटी-सावली रस्त्यासाठी ५९५ लाख रुपये, पिंपळखुटा- दाणापूर-खैरवाडा -ब्राह्मणवाडा रस्त्यासाठी ४१५ लाख रुपये, सुकळीबाई-बांगडापूर मार्गासाठी ४०२ लाख रुपये, पार्डी- सारवाडी-सावळी-चिंचोली-सेलगाव (उ)-उमरी-धावसा-कन्नमवारग्राम या मार्गासाठी ३९६ लाख रुपये, सुकळीबाई-बांगडापूर रस्त्यासाठी ३२५ लाख रुपये, वडाळा-साहूर-माणिकवाडा-सुसुंद्रा-काकडा-परसोडी -सेलगाव-ठाणेगाव रस्त्यासाठी ३२४ लाख रुपये, तसेच याच रस्त्यावरील अंतर २१ ते ३३ कि.मी. करीता २८४ लाख रुपये, कारंजा-मोर्शी- खरसखांडा मार्गासाठी २३६ लाख रुपये, काटोल-धर्ती-बोरी-ठाणेगाव या रस्त्याच्या बांधकामासाठी १७० लाख रुपये, ठाणेगाव-खरसखांडा- सावळी मार्गासाठी १०५ लाख रुपये, कारंजा (घा.)मधील बायपास करीता ७६ लाख रुपये, ढगा-ब्राह्मणवाडा या रस्त्याच्या दुरूस्तीकरिता ७६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.रस्त्यांची झाली होती चाळणीआर्वी, आष्टी व कारंजा (घा.) तालुक्यातील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळणी झाली होती. सदर मार्गांवरून ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांची समस्या लक्षात घेता माजी आमदार दादाराव केचे व सुमीत वानखेडे यांनी संबंधितांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानंतर अर्थसंकल्पात निधीची तरतुद करण्यात आली.