शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

५८ लाखातून तीन तालुक्यात रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:10 IST

आर्वी, कारंजा व आष्टी या तीन तालुक्यातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी ५८ कोटींचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी माजी आमदार दादाराव केचे व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी सुमीत वानखेडे यांनी पाठपुरावा केला होता.

ऑनलाईन लोकमतआर्वी : आर्वी, कारंजा व आष्टी या तीन तालुक्यातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी ५८ कोटींचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी माजी आमदार दादाराव केचे व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी सुमीत वानखेडे यांनी पाठपुरावा केला होता.आर्वी तालुक्यातील रोहणा-दिघी-सायखेडा रस्त्याकरिता १९० लाख रुपये, पिंपळखुटा-दाणापूर-ब्राह्मणवाडा-खैरवाडा पुलाच्या बांधकामासह रस्त्यासाठी २०० लाख रुपये, सावळापूर-लहादेवी-पांजरा- दहेगावकरीता १८० लाख रुपये, काचनुर-तळेगाव-पानवाडी रस्त्यासाठी ८१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.आष्टी तालुक्यातील खडकी-खंबित-बेलोरा रस्त्याकरीता ५४३ लाख रुपये, वडाळा-साहूर- माणिकवाडा- सुसुंद्रा रस्त्यासाठी ५१८ लाख रुपये, नांदपूर-चिस्तुर-खडकी रस्त्यासाठी ३४७ लाख रुपये, पोरगव्हाण - पंचाळा रस्त्यासाठी २१० लाख रुपये, खडकी-खंबीत-बेलोरा रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी १५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.कारंजा तालुक्यातील हिंगणी-बोरधरण-गरमसुर-मेटहिरजी-धानोली-राहाटी-सावली रस्त्यासाठी ५९५ लाख रुपये, पिंपळखुटा- दाणापूर-खैरवाडा -ब्राह्मणवाडा रस्त्यासाठी ४१५ लाख रुपये, सुकळीबाई-बांगडापूर मार्गासाठी ४०२ लाख रुपये, पार्डी- सारवाडी-सावळी-चिंचोली-सेलगाव (उ)-उमरी-धावसा-कन्नमवारग्राम या मार्गासाठी ३९६ लाख रुपये, सुकळीबाई-बांगडापूर रस्त्यासाठी ३२५ लाख रुपये, वडाळा-साहूर-माणिकवाडा-सुसुंद्रा-काकडा-परसोडी -सेलगाव-ठाणेगाव रस्त्यासाठी ३२४ लाख रुपये, तसेच याच रस्त्यावरील अंतर २१ ते ३३ कि.मी. करीता २८४ लाख रुपये, कारंजा-मोर्शी- खरसखांडा मार्गासाठी २३६ लाख रुपये, काटोल-धर्ती-बोरी-ठाणेगाव या रस्त्याच्या बांधकामासाठी १७० लाख रुपये, ठाणेगाव-खरसखांडा- सावळी मार्गासाठी १०५ लाख रुपये, कारंजा (घा.)मधील बायपास करीता ७६ लाख रुपये, ढगा-ब्राह्मणवाडा या रस्त्याच्या दुरूस्तीकरिता ७६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.रस्त्यांची झाली होती चाळणीआर्वी, आष्टी व कारंजा (घा.) तालुक्यातील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळणी झाली होती. सदर मार्गांवरून ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांची समस्या लक्षात घेता माजी आमदार दादाराव केचे व सुमीत वानखेडे यांनी संबंधितांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानंतर अर्थसंकल्पात निधीची तरतुद करण्यात आली.