शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

२० वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा

By admin | Updated: February 15, 2017 02:16 IST

बोरगाव (मेघे) येथील नागरिकांना गत २० ते २५ वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

बोरगाव (मेघे) येथील नागरिक त्रस्त : एक महिन्याचा दिला अल्टिमेटम वर्धा : बोरगाव (मेघे) येथील नागरिकांना गत २० ते २५ वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. २००४ मध्ये खडीकरण केलेल्या रस्त्याचे अद्याप मजबुतीकरण करण्यात आले नाही. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. संबंधित विभागाने एक महिन्याच्या आत रस्त्याचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रा.पं. सदस्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. गत २० ते २५ वर्षांपासून बोरगाव (मेघे) भागात राहणारे नागरिक रस्त्याची मागणी करीत आहे. ही बाब लक्षात घेत २००४ मध्ये या रस्त्याचे २४० मीटर लांब व ३ मीटर रूंद खडीकरण करण्यात आले. यानंतर लगेच मजबुतीकरण होईल, अशी अपेक्षा होती; पण ते करण्यात आले नाही. याबाबत वारंवार निवेदने देण्यात आलीत; पण कुठलीही कार्यवाही झाली नाही. या रस्त्याने दररोज १०० ते १५० दुचाकी, चारचाकी, तीन चाकी, शाळकरी मुलांची ने-आण करणारी वाहने, आॅटो दररोज ये जा करीत असतात. रस्त्यावरील धूळ घरांमध्ये जाते. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावरील पूल नादुरूस्त असल्याने अपघात होतात. या रस्त्यावर दुचाकी धारकांचे नेहमीच अपघात होतात. ग्रा.पं. निवडणूक काळात रस्ता मजबुतीकरणाची ग्वाही देण्यात आली होती; पण अडीच वर्षे लोटूनही रस्ता झाला नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी दीड महिन्यात तीन मीटर रूंदीचे सिमेंटीकरण करून द्यावे. एक महिन्यात काय कार्यवाही केली, याचा अहवाल द्यावा, अन्यथा ग्रा.पं. सदस्य पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ६३ नागरिकांनी सह्यांसह ग्रा.पं. सदस्य व जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)