शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

बिल्डकॉनच्या विरोधात रत्नापूरवासी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:09 IST

चार पदरी रस्त्याचे सिमेटीकरणाचे काम सुरु असून या रस्ताचे व पुलाच्या बांधकामादरम्यान रत्नापूर गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. दीड महिना लोटूनही कंत्राटदार दिलीप बिल्डकॉन कंपनीने ही पाईपलाईन दुरुस्त केली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सरपंच सरपंच शाहीन अयुबअली व बाजार समितीचे संचालक अयुबअली पटेल यांच्या नेतृत्वात रत्नापूर जवळ रविवारी रस्तारोको आंदोलन केले.

ठळक मुद्देगाड्या अडवून आंदोलन : दीड महिन्यापासून पाणीपुरवठा ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : चार पदरी रस्त्याचे सिमेटीकरणाचे काम सुरु असून या रस्ताचे व पुलाच्या बांधकामादरम्यान रत्नापूर गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. दीड महिना लोटूनही कंत्राटदार दिलीप बिल्डकॉन कंपनीने ही पाईपलाईन दुरुस्त केली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सरपंच सरपंच शाहीन अयुबअली व बाजार समितीचे संचालक अयुबअली पटेल यांच्या नेतृत्वात रत्नापूर जवळ रविवारी रस्तारोको आंदोलन केले. यावेळी बिल्डकॉन कंपनीचे वाहने अडवून कामही बंद पाडल्याने दोन दिवसात काम करण्याचे हमीपत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.वर्धा ते यवतमाळ या महामार्गाचे चौपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरु आहे. या रस्त्यालगत असलेले रत्नापूर हे गांव दोन भागात विभागाले असून चौपदरी रस्त्याच्या एका बाजुला जुन्या वस्तीत पाणी पुरवठ्याची विहीर आहे. तर दुसऱ्या बाजुला नवीन वस्तीत पाण्याची टाकी आहे. या टाकीत विहिरीवरुन पाणी जमा होतात. त्यानंतर गावाला पुरवठा केल्या जातो. पाणी पुरवठ्याची ही पाईपलाईन चौपदरी रस्त्यातून आरपार गेली असल्याने या रस्त्याच्या व पुलाच्या बांधकामात ती वारंवार फुटत आहे. मागील दीड महिन्यापूर्वी ही पाईपलाईन फुटल्याने बांधकाम करणाऱ्या बिल्डकॉन कंपनीने दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. शेतीच्या कामाच्या दिवसांमध्ये पाण्याकरिता महिलांना भटकंती करावी लागत असल्याने गावात संताप व्यक्त होत आहे. गावातील जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार सूचना करुनही कंपनीने लक्ष दिले नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी सकाळपासूनच या रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. कंपनीचे टिप्पर, जेसीबी, ट्रक, ट्रॅक्टर तसेच कर्मचारी व अधिकाऱ्यांची वाहने अडवून धरत उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. या कंपनीकडून नियम पायदळी तुडविले जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक सुरु असल्याने रस्त्यांची वाट लागली आहे. कंपनीकडून दबावतंत्राचा वापर होत असल्याने प्रशासनामध्येही हतबलता पाहवयास मिळत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. या आंदोलनात उपसरपंच शालीक मांगुळकर, ग्रा.प. सदस्य राधा कुडमथे, जयमाला खडसे, रंजना तोडासे, उमेश कुमरे, माजी सरपंच बाबाराव शेंदरे, शामराव खडसे, नंदा मांगुळकर व गावकºयांनी सहभाग घेवून प्रशासनाचे लक्ष वेधले.