शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

बिल्डकॉनच्या विरोधात रत्नापूरवासी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:09 IST

चार पदरी रस्त्याचे सिमेटीकरणाचे काम सुरु असून या रस्ताचे व पुलाच्या बांधकामादरम्यान रत्नापूर गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. दीड महिना लोटूनही कंत्राटदार दिलीप बिल्डकॉन कंपनीने ही पाईपलाईन दुरुस्त केली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सरपंच सरपंच शाहीन अयुबअली व बाजार समितीचे संचालक अयुबअली पटेल यांच्या नेतृत्वात रत्नापूर जवळ रविवारी रस्तारोको आंदोलन केले.

ठळक मुद्देगाड्या अडवून आंदोलन : दीड महिन्यापासून पाणीपुरवठा ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : चार पदरी रस्त्याचे सिमेटीकरणाचे काम सुरु असून या रस्ताचे व पुलाच्या बांधकामादरम्यान रत्नापूर गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. दीड महिना लोटूनही कंत्राटदार दिलीप बिल्डकॉन कंपनीने ही पाईपलाईन दुरुस्त केली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सरपंच सरपंच शाहीन अयुबअली व बाजार समितीचे संचालक अयुबअली पटेल यांच्या नेतृत्वात रत्नापूर जवळ रविवारी रस्तारोको आंदोलन केले. यावेळी बिल्डकॉन कंपनीचे वाहने अडवून कामही बंद पाडल्याने दोन दिवसात काम करण्याचे हमीपत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.वर्धा ते यवतमाळ या महामार्गाचे चौपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरु आहे. या रस्त्यालगत असलेले रत्नापूर हे गांव दोन भागात विभागाले असून चौपदरी रस्त्याच्या एका बाजुला जुन्या वस्तीत पाणी पुरवठ्याची विहीर आहे. तर दुसऱ्या बाजुला नवीन वस्तीत पाण्याची टाकी आहे. या टाकीत विहिरीवरुन पाणी जमा होतात. त्यानंतर गावाला पुरवठा केल्या जातो. पाणी पुरवठ्याची ही पाईपलाईन चौपदरी रस्त्यातून आरपार गेली असल्याने या रस्त्याच्या व पुलाच्या बांधकामात ती वारंवार फुटत आहे. मागील दीड महिन्यापूर्वी ही पाईपलाईन फुटल्याने बांधकाम करणाऱ्या बिल्डकॉन कंपनीने दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. शेतीच्या कामाच्या दिवसांमध्ये पाण्याकरिता महिलांना भटकंती करावी लागत असल्याने गावात संताप व्यक्त होत आहे. गावातील जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार सूचना करुनही कंपनीने लक्ष दिले नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी सकाळपासूनच या रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. कंपनीचे टिप्पर, जेसीबी, ट्रक, ट्रॅक्टर तसेच कर्मचारी व अधिकाऱ्यांची वाहने अडवून धरत उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. या कंपनीकडून नियम पायदळी तुडविले जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक सुरु असल्याने रस्त्यांची वाट लागली आहे. कंपनीकडून दबावतंत्राचा वापर होत असल्याने प्रशासनामध्येही हतबलता पाहवयास मिळत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. या आंदोलनात उपसरपंच शालीक मांगुळकर, ग्रा.प. सदस्य राधा कुडमथे, जयमाला खडसे, रंजना तोडासे, उमेश कुमरे, माजी सरपंच बाबाराव शेंदरे, शामराव खडसे, नंदा मांगुळकर व गावकºयांनी सहभाग घेवून प्रशासनाचे लक्ष वेधले.