शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

रेती वाहतुकीने लागली रस्त्यांची वाट

By admin | Updated: December 23, 2014 23:09 IST

तालुक्यात एकूण १० रेतीघाट आहेत़ यातून शासनाला दरवर्षी ८ ते १० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो़ या महसुलातून रस्त्यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी निधी राखीव ठेवला जातो;

आष्टी (शहीद) : तालुक्यात एकूण १० रेतीघाट आहेत़ यातून शासनाला दरवर्षी ८ ते १० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो़ या महसुलातून रस्त्यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी निधी राखीव ठेवला जातो; पण गत पाच वर्षांपासून गौणखनिज विभागाने तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या मजबुती व डांबरीकरण कामासाठी छदामही दिला नाही़ यामुळे रेती वाहतुकीमुळे दुरवस्था झालेले रस्ते जैसे थे खितपत आहे़तालुक्यातील रेतीघाट असलेले सर्व गावे रस्त्यांच्या समस्येने त्रस्त झाले आहेत़ नागरिकांना जीवघेणे रस्ते दररोज मनस्ताप देत आहेत़ रेतीघाटातून दिवस-रात्र क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहतूक सुरू असते़ यामुळे काळ्या मातीत असणारे रस्ते पूर्णत: दबले आहेत़ रेतीमाफियांनी रस्त्याच्या वाहिन्याच बंद करून नागरिकांवर अन्याय केला आहे़ शिरसोली गावातील सर्व नागरिकांनी गतवर्षी रेतीघाट लिलावावर बंदी घातली होती़ सदर बंदी यंदाही कायम ठेवली आहे़ गोदावरी रस्ता २ किमी लांबीचा आहे़ या रस्त्यावर सर्वाधिक रेतीची वाहतूक होते़ रस्ता शेतातून गेल्याने व काळी माती असल्याने तो दबला आहे़ साधी बैलबंडीही या रस्त्यावरून चालविता येत नाही़ २००५-०६ मध्ये संपूर्ण ग्रामीण योजनेतून थोडेफार काम झाले़ नंतर शासनाकडून निधीच आला नाही़टेकोडा रस्ता एक किमी लांब आहे़ रस्त्यावरील डांबरीकरण मातीत दबले आहे़ रस्त्याला लागून काही अंतरावर कालवा आहे़ या कालव्याचे पाणी दोन्ही बाजुला पाझरत असल्याने शेतांचीही वाट लागली आहे़ भिष्णूर रस्त्यावर भिष्णूर व ईस्माइलपूर रेतीघाट आहे़ या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत़ यामुळे वाहनेही व्यवस्थित चालविता येत नाही़ रात्री पायी चालताना खोल खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातात वाढ झाली आहे़ शासनाने गौणखनिज प्राप्त झालेल्या गावांना निधी देण्याची घोषणा केली होती़ यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्तावही पाठविण्यात आले होते; पण गौणखनिज अधिकारी व नियोजन विकास अधिकाऱ्यांकडे सदर प्रस्ताव धूळखात आहे़ गरज नसताना भलत्याच ठिकाणी गौणखनिजाचा निधी खर्च होत असल्याचे दिसते़ यामुळे गावकऱ्यांनीच आवाज उठविला असून रस्त्याच्या दुरूस्तीचा निधी न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे़(प्रतिनिधी)