शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

रेती वाहतुकीने लागली रस्त्यांची वाट

By admin | Updated: December 23, 2014 23:09 IST

तालुक्यात एकूण १० रेतीघाट आहेत़ यातून शासनाला दरवर्षी ८ ते १० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो़ या महसुलातून रस्त्यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी निधी राखीव ठेवला जातो;

आष्टी (शहीद) : तालुक्यात एकूण १० रेतीघाट आहेत़ यातून शासनाला दरवर्षी ८ ते १० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो़ या महसुलातून रस्त्यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी निधी राखीव ठेवला जातो; पण गत पाच वर्षांपासून गौणखनिज विभागाने तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या मजबुती व डांबरीकरण कामासाठी छदामही दिला नाही़ यामुळे रेती वाहतुकीमुळे दुरवस्था झालेले रस्ते जैसे थे खितपत आहे़तालुक्यातील रेतीघाट असलेले सर्व गावे रस्त्यांच्या समस्येने त्रस्त झाले आहेत़ नागरिकांना जीवघेणे रस्ते दररोज मनस्ताप देत आहेत़ रेतीघाटातून दिवस-रात्र क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहतूक सुरू असते़ यामुळे काळ्या मातीत असणारे रस्ते पूर्णत: दबले आहेत़ रेतीमाफियांनी रस्त्याच्या वाहिन्याच बंद करून नागरिकांवर अन्याय केला आहे़ शिरसोली गावातील सर्व नागरिकांनी गतवर्षी रेतीघाट लिलावावर बंदी घातली होती़ सदर बंदी यंदाही कायम ठेवली आहे़ गोदावरी रस्ता २ किमी लांबीचा आहे़ या रस्त्यावर सर्वाधिक रेतीची वाहतूक होते़ रस्ता शेतातून गेल्याने व काळी माती असल्याने तो दबला आहे़ साधी बैलबंडीही या रस्त्यावरून चालविता येत नाही़ २००५-०६ मध्ये संपूर्ण ग्रामीण योजनेतून थोडेफार काम झाले़ नंतर शासनाकडून निधीच आला नाही़टेकोडा रस्ता एक किमी लांब आहे़ रस्त्यावरील डांबरीकरण मातीत दबले आहे़ रस्त्याला लागून काही अंतरावर कालवा आहे़ या कालव्याचे पाणी दोन्ही बाजुला पाझरत असल्याने शेतांचीही वाट लागली आहे़ भिष्णूर रस्त्यावर भिष्णूर व ईस्माइलपूर रेतीघाट आहे़ या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत़ यामुळे वाहनेही व्यवस्थित चालविता येत नाही़ रात्री पायी चालताना खोल खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातात वाढ झाली आहे़ शासनाने गौणखनिज प्राप्त झालेल्या गावांना निधी देण्याची घोषणा केली होती़ यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्तावही पाठविण्यात आले होते; पण गौणखनिज अधिकारी व नियोजन विकास अधिकाऱ्यांकडे सदर प्रस्ताव धूळखात आहे़ गरज नसताना भलत्याच ठिकाणी गौणखनिजाचा निधी खर्च होत असल्याचे दिसते़ यामुळे गावकऱ्यांनीच आवाज उठविला असून रस्त्याच्या दुरूस्तीचा निधी न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे़(प्रतिनिधी)