शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पथकर बंद; पण वास्तू कायम

By admin | Updated: April 26, 2015 01:35 IST

करार संपलेले, रस्त्यासाठी लागलेला निधी कधीचाच वसूल झाल्याच्या कारणातून राज्यातील अनेक टोलनाके बंद करण्यात आले़ ...

सेलू : करार संपलेले, रस्त्यासाठी लागलेला निधी कधीचाच वसूल झाल्याच्या कारणातून राज्यातील अनेक टोलनाके बंद करण्यात आले़ यामुळे वाहन चालकांना टोल वसुलीपासून मुक्ती मिळाली खरी; पण येळाकेळी येथील टोलनाका आजही वाहन चालकांत धास्ती निर्माण करताना दिसतो़ येथील पथकर वसुली बंद होऊन मोठा कालावधी लोटला; पण नाक्याची इमारत अद्यापही कायम आहे़ ही इमारत जैसे थे ठेवण्यामागे प्रशासनाचा हेतू काय, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे़ येळाकेळी येथील टोलनाका गत काही वर्षांपूर्वी बंद झाला; पण या मार्गावर टोल वसूल केला जात होता, साक्ष आजही ती इमारत देत आहे़ सदर इमारत उभी ठेवण्यामागचे नेमके कारण काय, हा संशोधनाचा विषय ठरू पाहत आहे. वर्धा ते आर्वी मार्गावर येळाकेळी गावानजीक रस्त्याच्या मधोमध ही टोल नाक्याची वास्तू उभी आहे. याच टोलनाक्यावर गत १२ ते १५ वर्षांपूर्वी वाहन धारकांकडून पथकर वसूल केला जात होता; पण ही वसुली गत काही वर्षांत बंद करण्यात आली आहे़ यानंतर येळाकेळी येथील धाम नदीवर नवीन पुलाचे बांधकाम झाले. आर्वीकडे जाणाऱ्या मार्गाचे रूंदीकरण व नव्याने डांबरीकरण करण्यात आले; पण या टोलनाक्याची वास्तू हटविण्यात आली नाही. याच रस्त्यावर जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते़ या वास्तूच्या दोन्ही बाजूने असलेले अरूंद रस्ते वाहतुकीला अडचणीचे ठरत आहे.वर्धा ते नागपूर मार्गावरील महाबळा नजीकचा टोलनाका बंद होताच अवघ्या दोन महिन्यांत ती वास्तू धाराशाही करण्यात आली़ यामुळे येथे काहीच नव्हते, असा भास होतो; पण येळाकेळी येथील ही वास्तू प्रदीर्घ काळानंतरही ताठ मानेने आजही उभी आहे़ यामुळे पुन्हा कधीतरी याच इमारतीतून पथकर वसूल करण्याचे उद्दिष्ट तर नाही ना, असा संशयही व्यक्त केला जात आहे. रस्त्याच्या मधोमध असणारी ही वास्तू कशासाठी, हा प्रश्न सर्वांनाच बुचकाळ्यात टाकणारा आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाचे या वास्तूवरील प्रेम कमी का होत नाही, हा प्रश्नही चर्चिला जात आहे़ टोलनाक्याच्या या अवशेषामुळे वाहतुकीला मात्र अडचण निर्माण झाली आहे़ ही वास्तू हटविण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व वाहन धारक करीत आहेत़(शहर प्रतिनिधी)